एक्स्प्लोर

First EVM Election: देशात पहिल्यांदा EVM वर मतदान कधी झालेलं? वेगळ्या कारणानं निवडणूक झालेली रद्द, पराभूत उमेदवार फेरनिवडणुकीत झालेला विजयी...

First EVM Election: भारतात निवडणुकीत ईव्हीएमचा वापर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर कधी झाला जाणून घेऊयात.

First EVM Election नवी दिल्ली : भारतात प्रत्येक मोठ्या निवडणुकीनंतर भारतीय निवडणूक आयोग आणि इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM) बद्दलची चर्चा सुरु होते. नुकत्याच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, लोकांनी पुन्हा एकदा भारतातील EVM च्या वापराच्या इतिहासावर चर्चा सुरू केली आहे. भारतात पहिल्यांदा EVM चा वापर कधी झाला हे जाणून घेऊयात.

First EVM Election : ईव्हीएमचा पहिल्यांदा वापर कधी?

भारतात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर सर्वात आधी मे 1982 मध्ये केरळमधील परावूर विधानसभा क्षेत्रात झालेल्या पोटनिवडणुकीदरम्यान करण्यात आला होता. तथापि, त्यावेळी ईव्हीएमचा वापर पूर्णपणे लागू करण्यात आला नव्हता. त्या विधानसभा क्षेत्रातील एकूण 123 मतदान केंद्रांपैकी 50 बूथवर EVM चा वापर फक्त एक प्रयोग म्हणून करण्यात आला होता.

सुप्रीम कोर्टात पोहोचली निवडणूक

1982 चा हा प्रयोग लगेचच वादात सापडला. निवडणुकीनंतर हरलेल्या उमेदवाराने, ए. सी. जोस यांनी कोर्टात EVM च्या वापराला आव्हान दिले. 1984 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीचे निकाल रद्द केले. याचे कारण कोणतीही तांत्रिक समस्या नसून, कायदेशीर तरतुदींची कमतरता होती. त्यावेळी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये फक्त मतपत्रिकेचा उल्लेख होता आणि त्यात इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे मतदान करण्याची परवानगी देणारी कोणतीही तरतूद नव्हती.

नंतर पारंपरिक मतपत्रिका वापरून पुन्हा निवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे, जो उमेदवार यापूर्वी निवडणूक हरला होता, तो या निवडणुकीत जिंकला.

EVM कसे बनले कायदेशीर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, सरकारने इलेक्ट्रॉनिक वोटिंगला अधिकृतपणे कायदेशीर दर्जा देण्याच्या दिशेने पाऊल उचलले. 1988 मध्ये संसदेने लोकप्रतिनिधित्व कायद्यात सुधारणा करत कलम 61A जोडले. याने निवडणुकीत EVM ला अधिकृतपणे मान्यता दिली.

1998 मध्ये पुन्हा वापर

भारतात जरी EVM चा वापर प्रथम 1982 मध्ये समोर झाला, तरी मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर पुन्हा होण्यास खूप वेळ लागला. 1998 मध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्लीमधील 25 विधानसभा जागांवर EVM चे यशस्वी परीक्षण करण्यात आले.

संपूर्ण राज्यात आणि देशात वापर कधी झाला?

ईव्हीएमचा वापर पूर्णपणे करण्यात आलेली निवडणूक 1999 मध्ये झाली होती. 1999 ची गोवा विधानसभा निवडणूक ईव्हीएम मतदानावर झाली होती. या यशस्वी प्रयोगानंतर, निवडणूक आयोगाने ईव्हीएमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढवला. अखेर, पहिली लोकसभा निवडणूक जी पूर्णपणे EVM द्वारे सर्व 543 जागांवर घेण्यात आली, ती 2004 ची सार्वत्रिक निवडणूक होती. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget