'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) मध्ये फोनवरुन संभाषण झाला.

नवी दिल्ली : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देशावासीयांना संबोधित करताना पुन्हा एकदा पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिला आहे. दहशवादाच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड केली जाणार नाही. पाकिस्तानसोबत (Pakistan) चर्चा होईल ती फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीर या मुद्द्यांवरच होईल, असे मोदींनी ठणकावून सांगितले. तर, दुसरीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) मध्ये फोनवरुन संभाषण झाला. त्यानुसार, पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून (Indian army) सांगण्यात आलं आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन शस्त्रसंधीची जाहीर केल्याची माहिती दिली होती. मात्र, त्यानंतर काही तासांतच सीमारेषेवर गोळीबार सुरू झाला होता. त्यावरुन,पु्न्हा एकदा दोन्ही देशांत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीबाबत सायंकाळी 5 वाजता चर्चा झाली. दोन्ही देशांच्या डीजीएमओ (DGMOs) मध्ये फोनवरुन संभाषण झाला. त्यानुसार, पुन्हा एकदा शस्त्रसंधीवर एकमत झाल्याचे भारतीय सैन्य दलाकडून सांगण्यात आलं आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या चर्चेनुसार दोन्ही देशांच्या सीमारेषेवर एकाही बंदुकीतून गोळी सुटणार नाही. सीमारेषेवर आणि पुढील भागातून तत्काळ दोन्ही देशांनी आपलं सैन्य कमी करण्यासंदर्भातही या संभाषणात चर्चा झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे, यापुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी कायम असणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा पाकिस्तान ठणकावत जगाला संदेश दिला आहे. ऑपरेशन सिंदूर संपलं नसून त्यास स्थगिती देण्यात आल्याचे मोदींनी म्हटलं.
माता-भगिनींचं कुंकू पुसणाऱ्यांना दाखवून दिलं
22 एप्रिल रोजी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निष्पाप भारतीयांना धर्म विचारुन ठार मारले. दहशवाद्याचा (Terrorist) हा विभत्स चेहरा आहे. दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी आपण भारतीय सैन्य दलास संपूर्ण मोकळीक दिली होती. आमच्या आया-बहिणीचं कुकूं पुसण्याचा परिणाम काय होतो, हे आम्ही दाखवून दिलं, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूरचं वर्णन केलं.
Talks between DGMOs (of India and Pakistan) were held at 5:00 PM, 12 May 2025. Issues related to continuing the commitment that both sides must not fire a single shot or initiate any aggressive and inimical action against each other were discussed. It was also agreed that both… pic.twitter.com/o2Oajr9v14
— ANI (@ANI) May 12, 2025
























