एक्स्प्लोर

Assam Flood : आसाममध्ये दरवर्षी 2 हजार गावांना बसतो पुराचा फटका, तर दरवर्षी आठ हजार हेक्टरील जमिनीची होते धूप

दरवर्षी येणाऱ्या पुरामुळं आठ हजार हेक्टरवरील जमिनीचं नुकसान होत असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. तर दरवर्षी किमान 2000 गावांना तरी पुराचा फटका बसत असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Assam Flood : आसाममध्ये सध्या पुराचा तांडव सुरुच आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेघर झाले आहेत. आतापर्यंत आसाममधील 35 पैकी 32 जिल्ह्यांतील 5 हजार 577 गावांना फटका बसला आहे. या पुरामुळं  सुमारे 55.42 लाख लोक बाधित झाले आहेत. दरम्यान, दरवर्षी येणाऱ्या पुरामुळं आठ हजार हेक्टरवरील जमिनीचं नुकसान होत असल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. तर दरवर्षी किमान 2000 गावांना तरी पुराचा फटका बसत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पुरामुळे 1.20 लाखांहून अधिक घरांचं नुकसान

दरम्यान, आत्तापर्यंत आसाममध्ये पूर आणि भूस्खलनामुळं 117 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 1 लाख 8 हजार 306 हेक्टरील शेतजमीन पुराच्या तडाख्यात सापडली आहे. पुरामुळं 7 हजार 636 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. पुरामुळे 1.20 लाखांहून अधिक घरांचं पूर्ण किंवा अंशत: नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालानुसार आसाममधील कोपली नदी रेड अलर्टवर आहे, तर ब्रह्मपुत्रा, बराक, कुशियारा, कटखल नद्या वेगवेगळ्या ठिकाणी धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत.


Assam Flood : आसाममध्ये दरवर्षी 2 हजार गावांना बसतो पुराचा फटका, तर दरवर्षी आठ हजार हेक्टरील जमिनीची होते धूप

अल्पावधीतच भरपूर पाऊस पडतो. त्यामुळं पूरस्थिती

आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अहवालानुसार, आसाममधील जवळपास सर्वच नद्या पुरासाठी ओळखल्या जातात. आसाममध्ये अल्पावधीतच भरपूर पाऊस पडतो. त्यामुळं पूरस्थिती निर्माण होते.  परंतु पुरामुळे सर्वाधिक नुकसान ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांचे झाले आहे. या नद्यांमुळे आसाममधील जमिनीचा ऱ्हास झपाट्याने वाढत आहे. आसाममधील ब्रह्मपुत्रा खोऱ्याला पुराच्या दृष्टिकोनातून देशातील प्रमुख धोकादायक क्षेत्र मानले जाते. येथे सुमारे 40 टक्के जमिनीचे (3.2 दशलक्ष हेक्टर) नुकसान झाले आहे.


Assam Flood : आसाममध्ये दरवर्षी 2 हजार गावांना बसतो पुराचा फटका, तर दरवर्षी आठ हजार हेक्टरील जमिनीची होते धूप

राष्ट्रीय पूर आयोगाच्या अहवाल

दरम्यान, राष्ट्रीय पूर आयोगाच्या अहवालानुसार, आसाममध्ये एकूण भूभागाच्या 31.05 लाख हेक्टर (39.58%) पूरप्रवण क्षेत्र आहे. जे देशाच्या एकूण पूरप्रवण क्षेत्राच्या 10.2 टक्के आहे. आसाममध्ये 1953 पासून दरवर्षी पूर येतो. दरवर्षी किमान 2000 गावांना तरी पुराचा फटका बसत असल्याचे या अहवालात सांगण्यात आलं आहे. जलसंसाधनावरील संसदीय समितीच्या 2020-21 च्या अहवालात यावर तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. राष्ट्रीय पूर आयोगाच्या हवाल्यानं अहवालात म्हटले आहे की, 1954 पासून आसाममध्ये 4 लाख 27 हजार हेक्टर जमिनीची धूप झाली आहे. ही जमिन राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे 7 टक्के आहे. दरवर्षी  8,000 हेक्टर जमिनीची धूप होते. गेल्या शतकात ब्रह्मपुत्रा नदीचे क्षेत्रफळ जवळपास दुप्पट झाल्याचेही या अहवालात आश्चर्यकारक आहे. म्हणजेच जमिनीचा मोठा भाग ब्रह्मपुत्रेत गेला आहे.


Assam Flood : आसाममध्ये दरवर्षी 2 हजार गावांना बसतो पुराचा फटका, तर दरवर्षी आठ हजार हेक्टरील जमिनीची होते धूप

दरम्यान, संसदीय समितीने केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाला आसाममध्ये येणाऱ्या पुरासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे, अशी विचारणा केली होती. मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले की, पुराच्या समस्येवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी नद्या आणि त्यांच्या उपनद्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी साठवणुकीची व्यवस्था करावी लागेल. तसेच ब्रह्मपुत्रेवरील बंधारे खूप जुने असल्याने नवीन बंधारे बांधावे लागणार आहेत. संसदीय समितीनं अरुणाचल प्रदेशातील जल प्रकल्पांमुळे आसाममधील पुराची समस्या वाढली आहे का, असे विचारले असता केंद्रीय मंत्रालयाने उत्तर दिले की हा आसाम आणि अरुणाचल प्रदेश सरकारमधील विषय आहे. तो खूपच गुंतागुंतीचा आहे आणि केंद्र सरकारच भूमिका बजावू शकते. मध्यस्थाची भूमिका. कारण धरणाचीच अडचण असती तर भाक्रा किंवा दामोदरसारखी धरणे बांधलीच नसती.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Embed widget