एक्स्प्लोर

'देव' देतो, 'जात' नेते, सचिनने दिलेला कोटीचा निधी जातीत अडकला!

मुंबई : 'दैव देतं आणि कर्म नेतं' याचा प्रत्यय औरंगाबादमधील एका गावात आला आहे. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरने 2014 साली औरंगाबाद जिल्ह्यातील वाकला या दुष्काळग्रस्त गावाला एक कोटी रुपये निधी देण्याचं जाहीर केलं होतं. पण या निधीचं वितरण जातीनुसार कसं करायचं अशा अडचणीत हा निधी अडकल्याचं एका अहवालात समोर आलं आहे.   गावकऱ्यांना निधीचं वितरण कसं अपेक्षित आहे आणि निविदा प्रक्रिया कशी ठरवायची त्यासाठी आता सचिन तेंडुलकरच्या कार्यालयानेच पुढाकार घेतला आहे. अहवालातील या माहितीनंतर सचिनच्या कार्यालयाकडून गावकऱ्यांना एका बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आलं आहे. या बैठकीत गावकऱ्यांच्या मागणीवर चर्चा होणार आहे.   ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन (ओआरएफ) नावाच्या खासगी संस्थेने ‘ड्रॉट ऑफ मराठवाडा बिकेम अ स्टोरी ऑफ पास्ट’ नावाचे एक संशोधन केले आहे, त्यात हे किस्से समोर आले आहेत.     'देव' देतो, जात नेते वाकाला गावातील लोक जात, धर्म आणि राजकारणामध्ये अडकले आहेत. त्यामुळे एकत्र येऊन गावकरी कुठलंही चांगलं काम करण्यापासून वंचित आहेत. निधीची निविदा प्रक्रिया कशी असेल याबाबत गावकरी काहीही निर्णय घेऊ शकलेले नाहीत, परिणामी जाहीर केलेला निधी अजूनही गावाला मिळू शकलेला नाही, असं अहवालात नमूद केलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या देवाने तर दिलं पण जातीच्या विळख्याने माघारी नेलं, असाच प्रत्यय वाकाला गावात येत आहे.     गटबाजीमुळे विकास प्रक्रिया ठप्प ओआरएफच्या एका टीमने काही दिवसांपूर्वी वाकाला गावाला भेट दिली होती. वाकाला गावात विकासाची कोणतीही प्रक्रिया अजून सुरु झाली नसल्याचं आश्चर्यचकित करणारं निरीक्षण टीमने नोंदवलं आहे. वाकाला गाव गटबाजीच्या राजकरणाला बळी पडल्यामुळे लाखो रुपयांचा निधी पडून आहे, पण विकासाची प्रक्रिया सुरु नसल्याचं गावातील काही सुशिक्षित तरुणांनी ओआरएफच्या टीमला सांगितलं.   दरम्यान, ग्रामपंचायत सदस्य हत्तेसिंह चौधरी यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. आमचं गाव कोणत्याही जातीत विभागलं गेलेलं नाही, गावात सर्वकाही अलबेल असल्याचं चौधरी यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांपूर्वी गटबाजीच्या राजकारणात गाव अडकलं होतं. पण आता नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली असून सर्व गावकरी एकजूट आहेत. गावकऱ्यांनी सचिन तेंडुलकरला मदतीसाठी पुन्हा एकदा संपर्क साधल्याचं चौधरी यांनी सांगितलं.     जातीच्या राजकारणामुळे शासकीय योजनांनाही हरताळ शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानालाही गावातील वातावरणाचा चांगलाच फटका बसल्याचं अहवालात दिसून आलं आहे. वाकाला गावातील दोन गटातील राजकारणामुळे जलयुक्त शिवारअंतर्गत काहीही कामं झालेली नाहीत. जात-पात, गटबाजीचं राजकारण आणि ठराविक राजकीय पक्षावरील निष्ठा यामुळे दुष्काळ निवारणासाठी उपयुक्त अशा योजनांनाही पाहिजे तशा प्रमाणात वेग आलेला दिसत नाही, असं ओआरएफच्या अहवालाचे सहलेखक आणि निरीक्षक नितीश बाणे यांनी सांगितलं.     राज्य सरकारची दुष्काळाबद्दलची उदासीनता राज्य दुष्काळ जाहीर करण्यासाठी अजूनही ब्रिटीशकालीन नियमांचा वापर होत आहे, असं अहवालात म्हटलं आहे. वाकाला गावात पुरेसा पाऊस पडला असल्याचं दाखवलेलं आहे. पण बाजूच्या इतर गावांच्या तुलनेत वाकालामध्ये कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेकदा गाव दुष्काळग्रस्त जाहीर करायला किंवा शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवायला उशीर होत आहे, असं अहवालात म्हटलं आहे.   हा अहवाल दुष्काळ निवारणासाठी असलेली एकात्मता आणि शासकीय यंत्रणेच्या गोंधळाकडेही लक्ष आकर्षित करतो. विविध भागातील पाण्याची उपलब्धता, पाण्याचे स्रोत याबद्दल माहितीचा सरकारी यंत्रणांतच दोष आहे. गरजेच्या ठिकाणी तांत्रिक पद्धतीचा वापर केला जात नाही, असंही या अहवालात म्हटलं आहे.     दुष्काळ निवारणासाठी स्वतंत्र विभागाची गरज शेतकऱ्यांना दुष्काळी मदत करण्यासाठी, विविध शासकीय संस्थांचा समन्वय राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र विभाग असावा, अशी मागणी सुद्धा या अहवालात केली आहे.  दुष्काळ हा केवळ पाण्याच्या कमतरतेमुळे नाही तर वेगवेगळ्या ऐतिहासिक, सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे पडला आहे. त्यामुळे शासनाने दुष्काळप्रिय आणि दुष्काळापासून नफा मिळवू पाहणारी ही उदासीन यंत्रणा संपवली पाहिजे, असं अहवालात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी : कोचिंग क्लासच्या भीषण अग्नीतांडवात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, लखनौमधील थरारक घटना
मोठी बातमी : कोचिंग क्लासच्या भीषण अग्नीतांडवात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू, लखनौमधील थरारक घटना
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
कोचिंग सेंटरला आग; विद्यार्थ्यांनी पहिल्या मजल्यावरून उड्या मारल्या; एक जण लोखंडी ग्रीलवर पडला, अनेक होरपळले, 12 जण अद्यापही अडकल्याची भीती
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं
'माझ्या खात्यातील पैशातून चौघांवर अंत्यसंस्कार करा...' पहिल्यांदा विष घालत अख्खं कुटुंब संपवलं, नंतर टीव्ही स्क्रीनवर थरारक आणि हृदयद्रावक नोट लिहित तरुणानं स्वत:ला सुद्धा संपवलं

व्हिडीओ

Vidhan Parishad : विजयासाठी सेटिंग, क्रॉस व्होटिंग, पाच जागांवर मविआची मतं फुटली | Special Report
Opration Tiger : ऑपरेशनचा सिक्सर 2029 वर नजर, ऑपरेशन टायगर कशासाठी? | Special Report
Aditya Thackeray On Operation Tiger : आम्ही त्यांना प्रेमच दिलं, पण ओमराजेंचं वागणं दु:खद- ठाकरे
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story
Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
5 जुलैपासून आमरण उपोषणाला बसणार, फडणवीस सरकारला इशारा; फुटीर खासदारांवरही भडकले अण्णा हजारे
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
...अन्यथा कुणाला दवाखान्यात, कुणाला स्मशानात जावं लागेल; संजय दिना पाटलांचा ठाकरेंच्या शिवसैनिकांना इशारा
भारत इलेक्ट्रॉनिक्सला रडार, एव्हिओनिक्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
BEL ला रडार, एव्हिओनिक्स, कम्युनिकेशन सिस्टीमसाठी रु 1,081 कोटींच्या कामाची ऑर्डर, शेअरमध्ये तेजी
Share Market: सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
सेन्सेक्स आणि निफ्टीत पुन्हा तेजी सुरु, निफ्टी 24 हजारांच्या पार, गुंतवणूकदारांची 3 लाख कोटींची कमाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जून 2026 | सोमवार
Gokul Gite : महायुतीत डॅमेज कंट्रोल, नाशिकला शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाडलं, गोकुळ गीते मुंबईत आले आणि सेनेचेच सहयोगी सदस्य बनले
शिवसेनेच्या दराडेंना पाडून गोकुळ गीते निवडणूक जिंकले, मुंबईत आले आणि सेनेचे सहयोगी सदस्य बनले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
भास्कर जाधव किती दिवस ठाकरेंसोबत राहतील माहित नाही; संजय शिरसाटांचे वक्तव्य, व्हायरल व्हिडिओवरही बोलले
Vaibhav Sooryavanshi: वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
वैभवसाठी गुरुजींचे ते चार शब्द आणि श्रीलंकन संघाची धुळदाण! ऋषीकेश कानिटकरांनी कोणता संदेश दिला?
Embed widget