एक्स्प्लोर

 Government Jobs :  देशातील बेरोजगारीचा उच्चांक, 8 वर्षात नोकऱ्यासाठी 22 कोटी अर्ज, मिळाल्या 7 लाख नोकऱ्या

 Government Jobs :  शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून देशातील करोडो तरुण प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन स्वतःला तयार करत आहेत. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल की नाही असा प्रश्न पडलाय?

Government Jobs :  केंद्रातील मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा आम्ही दोन कोटी नोकऱ्या देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र हे आश्वासन पुर्णतः हवेत विरल्याचे केंद्र सरकारच्याच आकडेवारीने उघड झाले आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारकडून देण्यात आलेली आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे. आठ वर्षात नोकऱ्यांसाठी देशातील 22 कोटी तरुणांनी अर्ज केले, मात्र केवळ सात लाख 22 हजार एवढ्याच नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे बेरोजगारीने उच्चांक गाठलाय. 

शासकीय नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून देशातील करोडो तरुण प्रतिकूल परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन स्वतःला तयार करत आहेत. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होईल की नाही असा प्रश्न पडलाय? कारण ही तसेच आहे. देशात एकीकडे उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे शासकीय नोकऱ्या कमी होत आहेत. 22 कोटींच्या अर्जामागे मागच्या 8 वर्षात केवळ 7 लाख 22 हजार एवढ्याच नोकऱ्या सरकार देऊ शकलंय.  हे आम्ही सांगत नाही तर लोकसभेत केंद्रीय पीएमओ, कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकभेत एका लेखी उत्तरात ही आकडेवारी दिली आहे. देशातील मागच्या 8 वर्षातील आकडेवारी पाहुयात 

वर्ष                    नोकऱ्या                  अर्ज 

२०१४-१५      १ लाख ३० हजार      २ कोटी ३२ लाख
२०१५-१६.    १ लाख ११ हजार       २ कोटी ९५ लाख  
२०१६-१७      १ लाख १ हजार         २ कोटी २८ लाख
२०१७-१८      ७६ हजार १४७          3 कोटी ९५ लाख
२०१८-१९.     ३८ हजार १००.          ५ कोटी ९ लाख
२०१९-२०.      १ लाख ४७ हजार.     १ कोटी ७८ लाख

२०२०-२१.      ७८ हजार ५५५.        १ कोटी ८० लाख

२०२१-२२.      ३८ हजार ८५०.        १ कोटी ८७ लाख

एकूण नोकऱ्या 7 लाख 22 हजार आणि अर्ज 22 कोटी 5  लाख

आज देशात आणि राज्यात असंख्य ऊचाशिक्षित तरुण घरदार सोडून, पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहून अत्यंत बिकट परिस्थितीत कुणी पोलीस भरतीची, कुणी आरोग्य भरतीची, कुणी सरळ सेवा, कुणी रेल्वेसाठी तयारी करतोय दिवसरात्र त्यासाठीच हे तरुण तरुणी मेहनत घेत आहेत. त्यातच एवढं शिक्षण घेऊन शेवटी नोकऱ्या नसल्याने मुलींना तर लग्न करून संसाराला लागावे लागते. तर तरुणांना उच्च शिक्षण घेऊन हि मिळेल ते काम करावे लागतेय ही शोकांतिका आहे.  दरम्यान एकीकडे राज्यातील तसेच केंद्र सरकारच्या असंख्य कार्यालयामधील अधिकारी, कर्मचारी निवृत्तीनंतर जागा न भरल्या गेल्याने तिथे काम करत असलेल्या अधिकाऱ्यांवर कामाचा बोजा वाढत चाललाय तर दुसरीकडे सरकार भरती प्रक्रिया राबवत नसल्याने करोडो तरुण तरुणी बेरोजगार राहत आहेत. काही आत्महत्या करत आहेत त्यामुळे आता तरी सरकारने याचा गांभीर्याने विचार करून भरती प्रक्रिया राबवून या तरुणांना न्याय देणं गरजेचं आहे.. 

ही दोन उदाहरणे पाहाच - 

परभणीच्या पुर्णा तालुक्यातील निखिल धुमाळे हा मागच्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय घरी 2 एकर शेत आहे. शेतात ही पाणी पाणी झाले आहे. घरून शेतकरी आईवडील जमेल तेवढे पैसे पाठवतात. त्यात निखिल काही तास काम करून शासकीय नोकरी मिळवण्यासाठी धडपडतोय. मात्र दोन वर्षांपासून जागाच निघत नाहीयेत. त्यामुळे आत्महत्येचा विचार डोक्यात येतोय असे तो सांगतो. 

खान्देशमधील धुळ्याच्या निलेश पवारची अवस्था ऐकून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल अशीच आहे..वडिलांचे छत्र हरवले, आई मोलमजुरी करते, 2 भाऊ खाजगी काम करतात. किमान निखिलला नोकरी लागेल, घरची परिस्थिती बदलेल या आशेने दोन्ही भावांनी निखिलला सांभाळले, शिकवले आणि आताही त्याला काही पैसे पाठवतात. पण आता जागाच निघत नसल्याने निखिल हताश झालाय. काय करावे हे त्याला कळत नाहीये...सध्या तर स्पर्धा परीक्षा केंद्र चालवणारेच त्याचा सांभाळ करताहेत.. 

महत्त्वाच्या बातम्या

महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
महिलांसाठी गुड न्यूज! आता तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठीही मिळणार 365 दिवसांची रजा, 'या' सरकारनं घेतला मोठा निर्णय 
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Bangladesh : भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
भारतावर जळणारा बांगलादेश अंधारात, मदतीसाठी भारताकडे याचना; परराष्ट्र मंत्रालय म्हणाले, आमच्या गरजा लक्षात घेऊन...
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 
तुम्हाला UPSC तयारी करायचीय? मुख्य परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किती लागतात गुण? गेल्या तीन वर्षातील कट ऑफ किती? 

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget