एक्स्प्लोर

व्हीआयपी सुरक्षेतून NSG कवच पूर्णत: हटवण्याचा सरकारचा निर्णय

एनएसजीची स्थापना 1984 मध्ये झाली होती. तेव्हा या पथकाच्या मूळ कामात व्हीआयपी सुरक्षेचा समावेश नव्हता. एनएसजी कमांडो सध्या 'झेड-प्लस' कवच असलेल्या 13 हायप्रोफाईल व्यक्तींना सुरक्षा देतात.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने व्हीआयपी सुरक्षेमधून एनएसजी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड) कवच हटवण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच गांधी कुटुंबाचं एसपीजी कवच हटवल्यानंतर आणि व्हीआयपी सुरक्षेत कपात केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. दहशतवादविरोधी विशेष पथकातील जवान अर्थात 'ब्लॅक कॅट' कमांडोंना सुमारे दोन दशकानंतर व्हीआयपी सुरक्षा ड्यूटीवरुन हटवण्यात येईल.

एनएसजीची स्थापना 1984 मध्ये झाली होती. तेव्हा या पथकाच्या मूळ कामात व्हीआयपी सुरक्षेचा समावेश नव्हता. एनएसजी कमांडो सध्या 'झेड-प्लस' कवच असलेल्या 13 हायप्रोफाईल व्यक्तींना सुरक्षा देतात. या सुरक्षा कवचामध्ये अत्याधुनिक शस्त्रांसह सज्ज सुमारे दोन डझन कमांडो प्रत्येक व्हीआयपीच्या सुरक्षेसाठी तैनात असतात.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, "ही जबाबदारी लवकरच निमलष्करी दलाकडे सोपवण्यात येईल. गृहमंत्रालयाचं मत आहे की, एनएसजीचं मूळ काम हे दहशतवाद रोखणं, विमान अपहरणाविरोधात अभियान राबवणं हे आहे. मात्र व्हीआयपींच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांच्या निर्धारित आणि विशिष्ट क्षमतांवर ओझं आहे. व्हीआयपींचं एनएसजी कवच काढण्याच्या निर्णयामागे हेच कारण आहे."

कोणाकोणाला एनएसजी कवच आहे? संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे एनएसजी कवच आहे. याशिवाय उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनाही एनएसजी कवच आहे.

मुक्त झालेल्या एनएसजी जवानांना नव्या ठिकाणी नियुक्ती व्हीआयपी सुरक्षेमधून एनएसजी कवच हटवल्यानंतर सुमारे 450 कमांडो त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होणार आहेत. त्यांना दुसऱ्या ठिकाणी तैनात केलं जाईल. देशातील एनएसजीच्या पाच तळांमध्ये त्यांची नियुक्ती होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. एनएसजी कवच हटल्यानंतर, संबंधित व्हीआयपींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ आणि सीआयएसएफला दिली जाऊ शकते. हे दोन्ही दल 130 प्रमुख लोकांना संयुक्तरित्या सुरक्षा देतात.

सीआरपीएफ-सीआयएसएफकडे अनेक व्हीआयपींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे नुकतीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि त्यांच्या पत्नी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या पाचही जणांना यापूर्वी एसपीजी सुरक्षा होती. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याही सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे आहे. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह अन्य प्रमुख व्यक्तींच्या सुरक्षेची जबाबदारी सीआयएसएफकडे आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीहून आला आणि तरुणीवर अत्याचार केला, बदलापुरात धक्कादायक घटना
ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीहून आला आणि तरुणीवर अत्याचार केला, बदलापुरात धक्कादायक घटना
मनी लाँड्रिंग प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई, 3 हजार 716 कोटी रुपयांचे घऱ जप्त
मनी लाँड्रिंग प्रकरणी उद्योगपती अनिल अंबानींविरुद्ध ईडीची मोठी कारवाई, 3 हजार 716 कोटी रुपयांचे घऱ जप्त
Donald Trump on Operation Sindoor: 'भारताबरोबरच्या युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान ठार झाले असते' ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा दावा
'भारताबरोबरच्या युद्धात पाकिस्तानचे पंतप्रधान ठार झाले असते' ऑपरेशन सिंदूरबाबत अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा मोठा दावा
मोदी सरकारचा मोठा निर्णय, केरळ राज्याचे नाव बदलले, आता नवीन नाव काय असणार? 
मोदी सरकारचा मोठा निर्णय, केरळ राज्याचे नाव बदलले, आता नवीन नाव काय असणार? 

व्हिडीओ

Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
Pankja Munde Mumbai : प्रीतम मुंडे राज्यसभेवर जाणार? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या..
Bhigwan Kidnapping Case : मला आईकडे जायचं आहे, इंदापूरजवळच्या भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India semi final Scenario : 75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
75 धावांनी विजय किंवा 10 षटकांत पाठलाग...; टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये जाण्यासाठी नक्की काय करावं लागेल?, समजून घ्या नेट रनरेटचं गणित
Gadchiroli : गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
गडचिरोलीत बिबट्यापासून बचावासाठी व्हिडीओ दाखवत असतानाच बिबट्याचा हल्ला, तर अहिल्यानगरमध्ये बैलगाडी भरून पत्रं
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 फेब्रुवारी 2026 | बुधवार
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
'रणनीती आणि प्लेइंग इलेव्हनचा पुनर्विचार करण्याची गरज' टीम इंडियाच्या माजी हेडमास्तरांचं मोठं विधान! करा किंवा मरा सामन्यापूर्वी गंभीर आणि सूर्यकुमारला सुद्धा अप्रत्यक्ष इशारा
काही करून न्यूझीलंड हारला पाहिजे आणि श्रीलंका जिंकली पाहिजे! टीम इंडियानंतर पाकिस्तान सुद्धा भलत्याच धर्मसंकटात; आज काय होणार?
काही करून न्यूझीलंड हारला पाहिजे आणि श्रीलंका जिंकली पाहिजे! टीम इंडियानंतर पाकिस्तान सुद्धा भलत्याच धर्मसंकटात; आज काय होणार?
Ramdas Athawale : राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य
राज्यसभेत निवडून जाणार हे माहिती, पण लोकसभा लढण्याची इच्छा; रामदास आठवले यांचे स्पष्ट वक्तव्य
इंग्लंड सेमीफायनल गाठून देणाऱ्या कॅप्टन ब्रूकने असाही इतिहास रचला! पाकिस्तानी बाबर आझमच्या नावावर स्वत:लाच लाज वाटेल असा पराक्रम
इंग्लंड सेमीफायनल गाठून देणाऱ्या कॅप्टन ब्रूकने असाही इतिहास रचला! पाकिस्तानी बाबर आझमच्या नावावर स्वत:लाच लाज वाटेल असा पराक्रम
Mumbai feriwala BMC Budget 2026: मुंबईतील फेरीवाल्यांसाठी BMC चा महत्त्वाचा निर्णय, फेरीवाल्यांना QR Code आधारित प्रमाणपत्र देणार
Mumbai feriwala BMC Budget 2026: मुंबईतील फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी, BMC चा महत्त्वाचा निर्णय, रस्त्यावर दुकान मांडायचं असेल तर काय करावं लागणार?
Embed widget