एक्स्प्लोर

एकाच वेळी 21 बँकांचं विलीनीकरण, सरकार ऐतिहासिक निर्णयाच्या तयारीत

देशातील सरकारी बँकांची संख्या लवकरच 21 हून 11 किंवा 12 वर येऊ शकते. कारण सरकार देशातील सरकारी बँकांचं विलीनीकरण करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

नवी दिल्ली : देशातील सरकारी बँकांची संख्या लवकरच 21 हून 11 किंवा 12 वर येऊ शकते. कारण सरकार देशातील सरकारी बँकांचं विलीनीकरण करण्याच्या तयारीत आहे. देशात 5 ते 6 पेक्षा जास्त सरकारी बँकांची गरज नाही, असं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकार 21 बँकांचं विलीनीकरण करुन जागतिक दर्जाच्या 3 ते 4 बँका तयार करण्याच्या विचारात आहे. सरकारी बँकांच्या योजनेवर गेल्या 15 वर्षांपासून विचार सुरु आहे. भारतीय बँक संघटनेने (आयबीए) 2003-04 साली तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आदेशानुसार एक प्रस्ताव तयार केला होता. सरकारने पुन्हा एकदा या प्रस्तावावर काम सुरु केलं आहे. सरकारी बँकांच्या विलीनीकरणावर सक्रियपणे काम करत आहे, असं अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गेल्या आठवड्यात म्हटलं होतं. त्यानंतरच या विलीनीकरणाचे संकेत मिळाले. मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. बँकांचं विलीनीकरण कसं होईल? पहिल्या टप्प्यात 21 सरकारी बँकांची संख्या 12 वर आणण्याच्या प्रस्तावावर काम सुरु आहे. अधिग्रहणाचा ताबा घेण्यासाठी पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक आणि बँक ऑफ इंडिया या बँकांशी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. विलीनीकरणात बँकांचे कर्ज, मनुष्यबळ, भौगोलिक रचना यांचा विचार केला जाईल. एकाच प्रकारचं तंत्रज्ञान वारणाऱ्या बँकांचं विलीनीकरण एकाच वेळी केलं जाऊ शकतं, ज्यामुळे विलीनीकरणाला अडथळा येणार नाही आणि प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. पंजाब अँड सिंध बँक, आंध्रा बँक या प्रादेशिक बँकांची ओळक स्वतंत्र राहिल, असंही वृत्त आहे. तर मध्यम स्वरुपातील काही बँकाही कायम ठेवल्या जातील. एकूण तीन टप्प्यांमध्ये देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आकाराच्या 3-4 बँका असतील. स्टेट बँक ऑफ इंडियाचं यशस्वी विलीनीकरण केंद्र सरकारने 1 एप्रिल 2017 रोजी स्टेट बँक इंडियाच्या पाच सहयोगी बँका आणि महिला बँकेचं विलीनीकरण केलं. यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाचा जगभरातील टॉप 50 बँकांच्या यादीत समावेश झाला. त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने इतर बँकांचं विलीनीकरण करणार आहे. ग्राहकांवर काय परिणाम? भविष्यात तुमच्याही बँकेचा विलीनीकरणात समावेश झाला तर जी बँक तुमच्या बँकेच अधिग्रहण करणार आहे, त्यामध्ये तुमचा खाते क्रमांक आपोआप ट्रान्सफर केला जाईल. बँकेकडून तुम्हाला याची माहिती अगोदरच दिली जाईल. यावर ग्राहकांचं मतही मागितलं जातं. एखाद्या ग्राहकाला आक्षेप असेल तर त्याला मत मांडण्याचाही अधिकार आहे. विलीनीकरणाला बँक संघटनांचा विरोध देशातील सरकारी बँकांच्या विलीनीकरणाला अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेसह इतर 9 संघटनांनी विरोध केला आहे. या संघटनांनी 22 ऑगस्टला आंदोलन आणि 15 सप्टेंबरला दिल्लीत रॅली काढण्याचाही इशारा दिला आहे. सरकार एकीकडे सरकारी बँकांचं विलीनीकरण करत आहे, तर दुसरीकडे खाजगी कंपन्यांना बँकिंग लायसन्स दिले जात आहेत, यावर संघटनांचा आक्षेप आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर खाजगी कंपन्यांना ताबा येईल, असं संघटनांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारकडून सरकारी बँकांना आवश्यक तेवढे पैसे दिले जात नाहीत आणि त्यांचा व्यवहार मर्यादित केला जातोय. खाजगी छोट्या बँका, ऑनलाईन पेमेंट बँका सुरु करण्यासाठी त्यांना भरघोस निधी दिला जात आहे. गेल्या एका वर्षात सरकारने 19 खाजगी बँकांना बँकिंग लायसन्स दिलं आहे. त्यामुळे सरकारी बँका वाचवण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं बँक संघटनांचं म्हणणं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

West Bengal Assam Election Results 2026 Live Updates : बंगाल-आसामध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
बंगाल-आसामध्ये बदल होणार? बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला, आसामध्ये काँग्रेसला कमबॅकची आशा
धक्कादायक! धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी, चेन्नई विमानतळावर घडली घटना, नेमकं काय घडलं?
धक्कादायक! धावत्या विमानातून प्रवाशाने मारली उडी, चेन्नई विमानतळावर घडली घटना, नेमकं काय घडलं?
Assam Election : आसाममध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
आसाममध्ये भाजपची हॅट्रिक की काँग्रेसचा उलटफेर? काहीच वेळात होणार फैसला
Tamil Nadu : सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?
सुपरस्टार विजयच्या एन्ट्रीनं कोणाला चिंता? दक्षिणेत सट्टाबाजार नेमकं कुणाच्या बाजूनं?

व्हिडीओ

Special Report on Marathwada Disel Crisis : मराठवाड्यात आधी पाणीटंचाई, आता इंधन तुटवडा
Pune Nasarapur Case Special Report : नसरापूरच्या घटनेनं महाराष्ट्राचं काळीज हेलावलंय, शिक्षा कधी?
Mahayuti Issue 2029 Election Special Report : ३ वर्षांनंतरची निवडणूक; स्वबळाची भाषा, २०२९ ची दिशा?
New Labour Code Salary Rule : दरमहा 50,000 पगार असेल तर हातात किती रक्कम येणार?
Devendra Fadnavis on Nasrapur : नसरापूर प्रकरणातील आरोपीला मृत्युदंडाची शिक्षा देणार- फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
आपत्कालीन गेट उघडून धावत्या विमानातून एकानं उडी मारल्याने एकच खळबळ; एअरपोर्टवर लँडिग करतानाच थरकाप
Kerala Elections : आमदार झाल्यासारखं वाटतंय,निकाल जाहीर होण्याआधीच भाजप नेत्याकडून 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
भाजप नेत्याकडून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच 1 कोटींची पैज लावण्याचं चॅलेंज,नेमकं काय म्हणाला?
EPFO :  पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता, सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
पीएफ खात्यात व्याज कधी जमा होणार? जाणून घ्या महत्त्वाची अपडेट, केंद्र सरकार ईपीएस पेन्शन 7500 रुपये करण्याची शक्यता
Rajasthan Royals New Owner : आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, लक्ष्मी मित्तल बनले नवे मालक, किती पैसे खर्च केले?
आयपीएल सुरु असतानाच मोठी घडामोड, राजस्थान रॉयल्सच्या नव्या मालकाची घोषणा, किती कोटींना झाली डील?
Vinesh Phogat Brij Bhushan Singh: 'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
'बृजभूषण शरण सिंहच्या लैंगिक शोषणाची मी सुद्धा पीडित, माझ्यासोबत काही चुकीचं घडल्यास..' विनेश फोगटचा गंभीर आरोप
West Bengal Election: बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
बंगाली अस्मितेवर कोणाची 'ममता'? घनघोर लढाईत कोण बाजी मारणार, वाढलेला टक्का कोणाला झटका देणार??
Kharegaon Toll Naka : खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
खारेगाव टोलनाका नऊ वर्षांनी पुन्हा सुरू होणार; प्रवास वेगवान पण ठाणे-मुंबईकरांवर टोलचा भुर्दंड
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
प्रादेशिक अस्मितेत कोणाला विजयी गुलाल लागणार? 5 राज्यांच्या निकालात ममता दीदींचा बंगाली गड ते स्टॅलिन, विजयनपर्यंत; या राज्यांमध्ये बहुमताचा आकडा, पक्षीय बलाबल नेमकं आहे तरी कसं?
Embed widget