एक्स्प्लोर

दिवाळीपूर्वी परकीय चलन साठ्यात घट, तर सोन्याचा साठाही कमी, जाणून घ्या काय आहे कारण

Forex Reserves : डॉलरच्या तुलनेत वेगाने घसरणाऱ्या रुपयाला सावरणासाठी आरबीआयने परकीय चलन साठ्याचा वापर केला आहे. त्याचा परिणाम देशाच्या चलन साठ्यावर झाला. 

नवी दिल्ली : दिवाळी सुरुवातीलाच देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाली आहे. 14 ऑक्टोबर 2022 रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन 4.50  अब्ज डॉलरने घसरून 528.37 अब्ज डॉलर झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आज जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.

गेल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 204 दशलक्षने वाढून 532.868 अब्ज झाला होता. या वर्षी ऑगस्टनंतर प्रथमच परकीय चलनाच्या साठ्यात एका आठवड्यात वाढ झाली आहे. एक वर्षापूर्वी ऑक्टोबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलनाचा साठा 645 अब्ज डॉलर इतका सर्वकालीन उच्चांकी स्थानी गेला.

गेल्या काही आठवड्यांपासून देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सातत्याने घट होत आहे. किंबहुना वेगाने बदलणाऱ्या जागतिक परिस्थितीत, आरबीआयने या परकीय चलनाच्या गंगाजळीचा एक भाग डॉलरच्या तुलनेत वेगाने घसरणाऱ्या रुपयाला हाताळण्यासाठी वापरला आहे.

विदेशी चलन मालमत्ता 2.828 अब्जने कमी 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन मालमत्ता (FCA) 2.828 अब्ज डॉलरने घसरून 468.668 अब्ज डॉलर झाली आहे. एफसीए प्रत्यक्षात एकूण साठ्याचा मोठा भाग बनवतात. डॉलरमध्ये नामांकित परकीय चलन मालमत्तेमध्ये परकीय चलनाच्या साठ्यामध्ये असलेल्या युरो, पौंड आणि येन सारख्या इतर विदेशी चलनांच्या मूल्यात वाढ किंवा घट होण्याचा परिणाम देखील समाविष्ट असतो.

सोन्याचा साठाही कमी 
 
सात ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याच्या साठ्याचे मूल्य 1.35 अब्ज डॉलरने वाढले होते, तर 14 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात ते 1.502 अब्ज डॉलरने घसरून 37.453 अब्ज झाले होते. स्पेशल ड्रॉइंग राइट (एसडीआर) 149 दशलक्षने कमी होऊन 17.433 अब्ज झाला आहे. त्याच वेळी, IMF मधील देशाची राखीव स्थिती अहवाल आठवड्यात 23 दशलक्षने कमी होऊन 4.813 अब्ज झाली असल्याचं  आरबीआयने म्हटले आहे

जगात सध्या मंदीचं संकट घोंगावतं आहेत अशातच भारतासाठी हा साठा कमी होणं परवडणारं नाही त्यामुळे 1991 साली आलेल्या जागतिक मंदीची आठवण जागी होते आहे,

1991 ची जागतिक मंदी...भारताने सोने गहाण ठेवले होतं

1990-91 मध्ये आखाती युद्धानंतर हे आर्थिक संकट आले. यासाठी केवळ युद्ध जबाबदार नव्हते. अमेरिकन बँकांची वाईट स्थिती आणि स्कॅन्डिनेव्हियन देशांच्या ढासळत्या बँकिंग प्रणालीनेही जगाला आर्थिक संकटात टाकण्यात मोठा हातभार लावला. त्याचा भारतावर खूप वाईट परिणाम झाला. 1991 मध्ये भारताच्या आर्थिक संकटाचे सर्वात मोठे कारण पेमेंटचे संकट होते. देशाचा व्यापार समतोल बिघडला. सरकार प्रचंड वित्तीय तुटीवर चालत होते. भारतीच्या परकीय चलन साठ्यात केवळ तीन आठवड्यांची आयात शिल्लक होती. सरकार कर्ज फेडण्यास असमर्थ ठरत होते. जागतिक बँक आणि आयएमएफनेही त्यांची मदत बंद केली. पेमेंटमध्ये चूक होऊ नये म्हणून सरकारला देशाचे सोने गहाण ठेवावे लागले.

 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Kareena Kapoor Khan On NEET Paper Leak Row: 'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
'गेल्या काही दिवसांपासून मी विचार करतच होते, पण...'; अखेर करिना कपूरनं मौन सोडलं, विद्यार्थी आंदोलनावर थेटच भाष्य
High Court on Alimony: पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली
पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा अधिक असल्यास पोटगीचा हक्क नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, उच्चशिक्षित महिलेची याचिका फेटाळली

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Modi: 'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल
'मिस्टर मोदी सुमार दर्जाच्या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अपमान करू नका, माफी मागा'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्लाबोल
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
Embed widget