एक्स्प्लोर

भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधकांची वज्रमूठ

मोदी हे शेतकरी विरोधी आहेत. त्यांनी घटनात्मक संस्थांचा ऱ्हास केला. देशात अघोषित आणीबाणी आली आहे. मोदींनी सबका साथ घेऊन सबका विनाश केला, असे घणाघाती शाब्दिक हल्ले आज कोलकात्यातील विरोधकांच्या या मेळाव्यातून पंतप्रधान मोदींवर करण्यात आले.

कोलकाता: 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांनी एकत्र वज्रमूठ बांधली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शनिवारी कोलकाता येथे भाजप विरोधकांना एकत्र आणणारी ‘भारतीय एकता सभा’ आयोजित केली. ही सभा भाजपविरोधातील आघाडीचा आणखी एक प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, फारुख अब्दुल्ला, शरद यादव, अरविंद केजरीवाल, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल अशा विविध पक्षाची नेतेमंडळी उपस्थित होती. या विरोधकांसह भाजपचे बंडखोर शत्रुघ्न सिन्हा आणि यशवंत सिन्हा हे देखील महारॅलीला उपस्थित होते. या सभेत सर्वच विरोधकांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी हे शेतकरी विरोधी आहेत. त्यांनी घटनात्मक संस्थांचा ऱ्हास केला. देशात अघोषित आणीबाणी आली आहे. मोदींनी सबका साथ घेऊन सबका विनाश केला, असे घणाघाती शाब्दिक हल्ले आज कोलकात्यातील विरोधकांच्या या मेळाव्यातून पंतप्रधान मोदींवर करण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी आणि भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधक एकाच मंचावर आले आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात भारतीय एकता सभेचं आयोजन केलं होतं. ही सभा भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्यासाठीचा नवा प्रयत्न असल्याचं मानलं जातं आहे. ममता यांनी आयोजित केलेल्या या सभेत देशभरातील 22 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले. यात देशभरातील प्रादेशिक पक्षांचा सहभाग अधिक आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मात्र या सभेला गैरहजर राहिले. मात्र काँग्रेसकडून मल्लिकार्जून खर्गे, अभिषेक मनु सिंघवी उपस्थित होते. विरोधकांसह भाजपचे बंडखोर नेते यशवंत सिन्हा आणि शत्रुघ्न सिन्हादेखील उपस्थित राहिले. मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली : ममता बॅनर्जी   मोदी सरकारची ‘एक्सपायरी डेट’आता संपली आहे. भाजप भगाओ - देश बचाओ या नाऱ्याला प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यावेळी म्हणाल्या. तसेच पंतप्रधान पदाचा आमचा उमेदवार निवडणुकीनंतर घोषित केला जाईल, असेही त्या म्हणाल्या. राजकारणात शिष्टता असते मात्र भाजप त्याचे पालन करत नाही. जे भाजपसोबत नाहीत त्यांना चोर समजले जाते. आपल्याला एकत्रित येऊन काम करायला हवे, असेही बॅनर्जी म्हणाल्या. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले : अब्दुल्ला मी मुस्लीम आहे, पण मी देखील भारतातील एक भाग आहे. जम्मू- काश्मीरमध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भारतासोबत रहायचे आहे, असे त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देशासमोर एक नवीन आव्हान निर्माण झाले आहे. धर्माच्या आधारे लोकांचे विभाजन केले जात असून आता देशाचे रक्षण करायचे असल्यास सर्वांनी पुन्हा एकत्र येणे गरजेचे आहे. भाजपाला संपवण्यासाठी विरोधी पक्षांनी आगामी निवडणुकीत एकत्र आले पाहिजे, असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
देशाची राजधानी हादरली! दिल्ली आणि जम्मू काश्मीरसह अनेक राज्यात भूकंपाचे धक्के, घरं सोडून नागरिक रस्त्यावर 
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?
नोकरी सोडल्यानंतर किती दिवसात मिळणार तुमचे पैसे? काय सांगतो नवीन कामगार कायद्याचा नियम?
AAP : योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
योगेंद्र यादव ते स्वाती मालीवाल, आम आदमी पक्षाची स्थापना झाल्यापासून पक्षाची साथ कोणी कोणी सोडली? पुढचा नंबर कोणाचा? 
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा
पाकिस्तानमध्ये इंधन दरवाढीचा भडका; पेट्रोल 458 तर डिझेल 520 रुपये लिटर, नागरिकांचा संताप, पंपावर रांगा

व्हिडीओ

Baramati Bypolls : बारामतीचा लढा, मविआत तिढा? काँग्रेसच्या भूमिकेमुळे मोठा ट्विस्ट Special Report
Ashok kharat Minister Connection : दमानियांचा कॉल बॉम्ब, कुणाला फुटणार घाम? Special Report
Ashok Kharat Property : खरातची खाती,काळ्या करामती; 130 खात्यांमधून 60 कोटींचे व्यवहार Special Report
BMC School Manache Shlok : मनाचे श्लोक, वादाचे टोक; एमआयएचा विरोध Special Report
Anjali Damania on Rupali Chakankar | रुपाली चाकणकरांचे Ashok Kharat ला 177 कॉल!, दमानियांचा दावा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Bailgada Sharyat: कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
कोल्हापूरात बैलगाडा शर्यतीवेळी थरारक घटना, मोटारसायकल आडवी आली, बैलांनी अंगावर उडी मारली
Yuvraj Singh: बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
बापानं वारंवार टोकलं अन् शेवटी लेकानं सावरलं, युवराजला थेट धोनी आणि कपिल देवची माफी मागावी लागली; नेमकं इतकं घडलं तरी काय?
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
नाही म्हणजे नाही! इकडं लढाऊ विमाने पडत असल्याने अमेरिकेला धडकी भरली असतानाच तिकडं इराणचा ट्रम्पना आणखी एक गर्भित इशारा; चौफेर कोंडीने लष्करी रसद तोडण्याची तयारी
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
इराणी लष्कर, एअरफोर्स संपवल्याच्या वल्गना करणाऱ्या ट्रम्प अन् अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात भयावह 'ब्लॅक फ्रायडे'! कुवेतपासून इराणपर्यंत एकाच दिवसात किती विमाने पाडली? त्या पायलटांचं काय झालं??
Nagpur PNG Connection: नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
नागपूरकरांसाठी आनंदवार्ता! बुटीबोरीमध्ये पीएनजी गॅसचा पुरवठा सुरु, उपराजधानीचीही एलपीजी सिलेंडरच्या कटकटीपासून मुक्तता होणार, वाचा A to Z माहिती
NCP Sunetra Pawar Letter: सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या 'त्या' पत्रामुळे पार्थ पवार अडचणीत, नेमकं काय घडलं?
Nashik Accident News: रात्रीच्या अंधारात कार खोल विहिरीत बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
रात्रीच्या अंधारात कार खोल विहिरीत बुडत गेली, पाणी नाकातोंडात जाऊन सहा लहानग्यांचा करुण अंत, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Piyush Mishra: दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
दारूच्या नशेत महिलांना अश्लील फोन केले; आईला शिवीगाळ; बॉलीवूड अभिनेत्यांनं सगळंच सांगितलं, म्हणाला..
Embed widget