एक्स्प्लोर

उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप

उत्तर प्रदेशातील 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप गुरुवारी करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. तर त्यांचा गौरव केल्याचं सांगितलं. तसेच आपल्या सरकारने 86 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील 7574 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप करण्यात आलं आहे. यानंतर आता 5 सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रभारी मंत्र्यांद्वारे कर्जमाफीची पत्रे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील. लखनऊच्या स्मृती पार्कमध्ये कर्जमाफी पत्राचं वाटप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, अर्थमंत्री राजेश अग्रवाल, कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, आम्ही त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. उलट त्यांचा गौरवच केला आहे. गेल्या 15 वर्षांत राज्यात केवळ जातीचं राजकारण झालं. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिला राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.'' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''आम्ही शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या मंत्रिमंडळानेही सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचाच घेतला. यासाठी केंद्र सरकारच्या अनुरुप एक योजना तयार केली. यापूर्वी शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं वेळेत मिळत नव्हते. पण पंतप्रधान मोदींनी खतांच्या किमती कमी केल्यानंतर, जवळपास 70 लाखाहून जास्त शेतकऱ्यांची पडताळणी करुन, पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''शेतकऱ्यांसाठी आम्ही सातत्यानं काम करत आहोत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं लक्ष्य आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्याला अडतीतून मुक्त केलं. यातून आम्ही शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान परत केला आहे.''

महत्त्वाच्या बातम्या

आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
CAMIT : पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
पेट्रोल- डिझेल कॅन किंवा डबकीमध्ये दिल्यास पंपाचा परवाना रद्द होणार, सरकारच्या निर्णयाला कॅमीट संघटनेचा तीव्र विरोध, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेपाची मागणी
Cockroach Janta Party Abhijeet Dipke: मोठी बातमी: कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश
कॉकरोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाला पोलिसांची परवानगी, अभिजीत दिपकेंनी भारतात पाऊल ठेवताच मोठं यश

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
बीडमध्ये शेतकऱ्याने मोसंबी बागेवर फिरवला जेसीबी; पाण्याअभावी वाळून गेली बाग, जाळून केली खाक
Monsoon Rain Maharashtra: मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार? हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, परिस्थिती पोषक, देवगडमध्ये..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
आचारसंहिता म्हणजे शोलेचा गब्बरसिंग, कॉकरोच जनता पार्टीबद्दलही बोलले सुधीर मुनगंटीवार; म्हणाले, सामान्य माणसांचं मन..
Suryakumar Yadav : टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI च्या निर्णयानं सगळे चक्रावले...
टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मासोबत जे घडलं, तेच सूर्यकुमार यादव सोबत झालं, BCCI चा मोठा निर्णय
Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
माघार अन् हकालपट्टीनंतर बाळ मानेंचे लागोपाठ दुसऱ्या दिवशी 'ते' स्टेटस चर्चेत; कोकणच्या राजकारणात तर्कवितर्कांना वेग, रोख नेमका कुणाकडे?
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
छगन भुजबळांना राज्यसभा अन् समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद? राष्ट्रवादीचे नेते फडणवीसांना भेटले, महत्त्वाच्या घोषणेची शक्यता
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होते का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल
Devendra Fadnavis and Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
सुप्रिया सुळेंच्या घोडेबाजाराच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले, 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात'
Embed widget