एक्स्प्लोर

उत्तर प्रदेशात 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप

उत्तर प्रदेशातील 7000 हून जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप गुरुवारी करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. तर त्यांचा गौरव केल्याचं सांगितलं. तसेच आपल्या सरकारने 86 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ केलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

लखनऊ : उत्तर प्रदेशातील 7574 शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पत्राचं वाटप करण्यात आलं आहे. यानंतर आता 5 सप्टेंबरपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रभारी मंत्र्यांद्वारे कर्जमाफीची पत्रे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येतील. लखनऊच्या स्मृती पार्कमध्ये कर्जमाफी पत्राचं वाटप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ, उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, दिनेश शर्मा, अर्थमंत्री राजेश अग्रवाल, कृषीमंत्री सूर्य प्रताप शाही यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य उपस्थित होते. कर्जमाफीबद्दल बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, ''शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन, आम्ही त्यांच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. उलट त्यांचा गौरवच केला आहे. गेल्या 15 वर्षांत राज्यात केवळ जातीचं राजकारण झालं. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्वात पहिला राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला.'' मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ''आम्ही शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या मंत्रिमंडळानेही सर्वात पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या हिताचाच घेतला. यासाठी केंद्र सरकारच्या अनुरुप एक योजना तयार केली. यापूर्वी शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं वेळेत मिळत नव्हते. पण पंतप्रधान मोदींनी खतांच्या किमती कमी केल्यानंतर, जवळपास 70 लाखाहून जास्त शेतकऱ्यांची पडताळणी करुन, पुढील प्रक्रिया सुरु केली आहे.'' ते पुढे म्हणाले की, ''शेतकऱ्यांसाठी आम्ही सातत्यानं काम करत आहोत. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आमचं लक्ष्य आहे. बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्याला अडतीतून मुक्त केलं. यातून आम्ही शेतकऱ्यांना त्यांचा सन्मान परत केला आहे.''

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Maharashtra Live News Updates: सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
Delhi Police : पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
Supreme Court : 'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण
'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण, कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
शिक्षण सचिवांची बदली करत पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली ज्यांच्यावर कित्येक कोटींच्या गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप, हा देशातील तरुणांचा अपमान, अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
ऐकावं ते नवल, परभणीत चक्क बोकड देतंय दररोज पाऊल लिटर दूध; पशुवैद्यक तज्ज्ञांनी सांगितलं कारण
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Embed widget