एक्स्प्लोर
Advertisement
मोदींच्या शपथविधीसाठी पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांना निमंत्रण
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमधील हिंसाचारात जवळपास 50 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमधील हिंसाचारात मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी निमंत्रण देण्यात आले आहे. उद्या(ता. 30) संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना पाहायला मिळाल्या. या हिंसाचाराच्या घटनांमध्ये जवळपास 50 भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना मोदींच्या शपथविधीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला आहे. पश्चिम बंगालमधील 42 पैकी 18 जागा भाजपने जिंकल्या आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पश्चिम बंगालमध्ये फक्त 2 जागा जिंकता आल्या होत्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत. लोकसभा प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी आणि मोदी यांच्यात बरेच आरोप प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र हा एक औपचारिक कार्यक्रम असल्याने आपण या कार्यक्रमाला हजेरी लावणार असल्याचं ममता यांनी म्हटलं आहे.Midnapore: Kin of BJP workers (who were killed in West Bengal in political violence) invited to the swearing-in ceremony of PM Narendra Modi. Son of Late Manu Hansda says,"My father was killed by TMC goons. We are happy that we are going to Delhi. There's peace in our area now." pic.twitter.com/P0uR6bBLXp
— ANI (@ANI) May 29, 2019
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
बॉलीवूड
वर्ल्डकप
बॉलीवूड
Advertisement