एक्स्प्लोर

नाणार प्रकल्पाला हळूहळू सगळे समर्थन करतील : धर्मेंद्र प्रधान

“नाणार प्रकल्प भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचा आहे. तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रालाच होईल. महाराष्ट्रातल्या रोजगाराला, औद्योगिकीकरणला मोठी चालना मिळेल.”

नवी दिल्ली : नाणार प्रकल्प महाराष्ट्राच्या हिताचा आहे. महाराष्ट्रातल्या रोजगाराला आणि औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळेल, असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले. रत्नागिरीत होऊ घातलेल्या नाणार प्रकल्पाबाबत एबीपी माझाने धर्मेंद्र प्रधान यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाणार प्रकल्प महाराष्ट्रासह भारताच्या हिताचा “नाणार प्रकल्प भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने हिताचा आहे. तीन लाख कोटींच्या गुंतवणुकीचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्रालाच होईल. महाराष्ट्रातल्या रोजगाराला, औद्योगिकीकरणला मोठी चालना मिळेल.”, असे धर्मेंद्र प्रधान म्हणाले. हळूहळू सगळेजण नाणारला समर्थन करतील शिवसेनेचा नाणार प्रकल्पाला विरोध आहे, यासंदर्भात ज्यावेळी एबीपी माझाने धर्मेंद्र प्रधान यांना विचारले, त्यावर ते म्हणाले, “मला विश्वास आहे, सर्वसहमतीने हळूहळू सगळेजण या प्रकल्पाचं समर्थन करतील.” तसेच, शिवसेनेचा विरोध हळूहळू मावळेल, अशी आशाही धर्मेंद्र प्रधानांनी व्यक्त केली. विरोध डावलून नाणारचा मार्ग मोकळा शिवसेनेचा विरोध डावलून फडणवीस सरकारने रत्नागिरीतल्या नाणार प्रकल्पाचा मार्ग मोकळा केला आहे. रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स या तेलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये सौदी अरेबियाची अरामको ही मोठी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. या संदर्भातल्या सामंजस्य करारावर काल नवी दिल्लीत सह्या झाल्या. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प रत्नागिरीजवळ असलेल्या नाणारमध्ये उभारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रारंभिक करारावर स्वाक्षऱ्या झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली असून सविस्तर बोलणी सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या या प्रकल्पामुळे सौदीच्या खनिज तेलाची मागणी कायम राहील, तसंच भारताला कमी खर्चामध्ये इंधनाची उपलब्धता होईल असं सांगण्यात येत आहे. पेट्रोल व डिझेलच्या बाबतीत भारत हा संवेदनशील देश असून कच्च्या तेलाची किंमत 50 डॉलर प्रति पिंप असल्यास ते भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आश्वासक असेल. असे मत धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केलं. नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता प्रति दिन 12 लाख पिंप इतकी असणार असून अरमाकोनं तत्वत: या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी दर्शवली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ती एक अफवा पसरली अन्...10 हजार लोकांची परवानगी असताना 50 हजार जमले, 16 महिला, 10 मुलांसह 40 जणांचा चिरडून जीव गेला, 51आयसीयूत; थलपती विजयच्या रॅलीत आतापर्यंत काय काय घडलं?
ती एक अफवा पसरली अन्...10 हजार लोकांची परवानगी असताना 50 हजार जमले, 16 महिला, 10 मुलांसह 40 जणांचा चिरडून जीव गेला, 51आयसीयूत; थलपती विजयच्या रॅलीत आतापर्यंत काय काय घडलं?
हस्तांदोलन टाळल्यानंतर टीम इंडियाचा फायनलआधी आणखी एक निर्णय; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी काय घडलं?
हस्तांदोलन टाळल्यानंतर टीम इंडियाचा फायनलआधी आणखी एक निर्णय; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी काय घडलं?
Upcoming Cars : 10 लाखांपर्यंत कार घ्यायचीय? लवकरच मार्केटमध्ये येताय हायब्रिड इंजिन अन् सनरूफसह जबरदस्त SUVs; पाहा संपूर्ण यादी
10 लाखांपर्यंत कार घ्यायचीय? लवकरच मार्केटमध्ये येताय हायब्रिड इंजिन अन् सनरूफसह जबरदस्त SUVs; पाहा संपूर्ण यादी
Mithun Manhas: रथी महारथींची नावे मागे पडली, कोणाला माहीत नसलेल्या मिथुन मन्हास यांनी बीसीसीआय अध्यक्षपदी बाजी मारली!
रथी महारथींची नावे मागे पडली, कोणाला माहीत नसलेल्या मिथुन मन्हास यांनी बीसीसीआय अध्यक्षपदी बाजी मारली!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ती एक अफवा पसरली अन्...10 हजार लोकांची परवानगी असताना 50 हजार जमले, 16 महिला, 10 मुलांसह 40 जणांचा चिरडून जीव गेला, 51आयसीयूत; थलपती विजयच्या रॅलीत आतापर्यंत काय काय घडलं?
ती एक अफवा पसरली अन्...10 हजार लोकांची परवानगी असताना 50 हजार जमले, 16 महिला, 10 मुलांसह 40 जणांचा चिरडून जीव गेला, 51आयसीयूत; थलपती विजयच्या रॅलीत आतापर्यंत काय काय घडलं?
हस्तांदोलन टाळल्यानंतर टीम इंडियाचा फायनलआधी आणखी एक निर्णय; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी काय घडलं?
हस्तांदोलन टाळल्यानंतर टीम इंडियाचा फायनलआधी आणखी एक निर्णय; भारत-पाकिस्तानच्या सामन्याआधी काय घडलं?
Upcoming Cars : 10 लाखांपर्यंत कार घ्यायचीय? लवकरच मार्केटमध्ये येताय हायब्रिड इंजिन अन् सनरूफसह जबरदस्त SUVs; पाहा संपूर्ण यादी
10 लाखांपर्यंत कार घ्यायचीय? लवकरच मार्केटमध्ये येताय हायब्रिड इंजिन अन् सनरूफसह जबरदस्त SUVs; पाहा संपूर्ण यादी
Mithun Manhas: रथी महारथींची नावे मागे पडली, कोणाला माहीत नसलेल्या मिथुन मन्हास यांनी बीसीसीआय अध्यक्षपदी बाजी मारली!
रथी महारथींची नावे मागे पडली, कोणाला माहीत नसलेल्या मिथुन मन्हास यांनी बीसीसीआय अध्यक्षपदी बाजी मारली!
India vs Pakistan Asia Cup 2025 Final: पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!
पाकिस्तानी कॅप्टन सलमान आगाकडून 'आग' लावण्याचे उद्योग सुरुच; म्हणाला, मग आमच्या हातात राहणार तरी काय!
Kolhapur News: कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
कोल्हापुरात सर्किट बेंचसमोर महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्यावर लिक्विड कोट मारला, पण गायी म्हशीच्या तुप लोण्यापेक्षा कमी वेळात विरघळून गेला!
Navdurga 2025 : शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; शेतीतील नवदुर्गा शुभांगी कारे, विद्या पानसरे करतायत लाखोंची उलाढाल
शेतीपूरक व्यवसायातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल; शेतीतील नवदुर्गा शुभांगी कारे, विद्या पानसरे करतायत लाखोंची उलाढाल
Ajit Pawar on Laxman Hake : लक्ष्मण हाकेंचा बारामती बँकेवर अन् दादांवर गंभीर आरोप, अजितदादांकडून खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात...
लक्ष्मण हाकेंचा बारामती बँकेवर अन् दादांवर गंभीर आरोप, अजितदादांकडून खरपूस समाचार; म्हणाले, तसलं आमच्या मनात...
Embed widget