एक्स्प्लोर

ज्येष्ठ पर्यावरणवादी प्रा. जी. डी. अग्रवाल यांचं उपोषणादरम्यान निधन

गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी गेल्या 111 दिवसांपासून प्रा. जी. डी. अग्रवाल उपोषण करत होते.

हरिद्वार (उत्तराखंड) : जेष्ठ पर्यावरणवादी प्रोफेसर जी.डी अग्रवाल उर्फ स्वामी सानंद यांचं उपोषणादरम्यान निधन झालं आहे. गंगा स्वच्छतेच्या मागणीसाठी गेल्या 111 दिवसांपासून ते उपोषण करत होते. पोलिसांनी उपोषणस्थळावरुन उचलल्यानंतर त्यांनी जलत्याग केला होता. हरिद्वारमधील ऋषीकेशच्या एम्स रुग्णालयात प्रा. अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला. गंगा नदी परिसरात अवैध खाणकाम, धरणं, गंगेची स्वच्छता अशा गंगेसंबंधित विविध मुद्द्यांवर प्रा. जी. डी. अग्रवाल 22 जून 2018 पासून उपोषणाला बसले होते. त्यांनी गंगेच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध मुद्दे अनेकदा सरकार दरबारी सुद्धा मांडले होते. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून गंगेसाठी वेगळा कायदा बनवण्याची मागणीही त्यांनी केली होती. मात्र कुठूनच योग्य प्रतिसाद न आल्याने त्यांनी 22 जूनपासून उपोषणाचा मार्ग अवलंबला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उमा भारती यांनी त्यांना उपोषण थांबवण्याची विनंती केली होती. मात्र गंगेसाठी उपोषणावर ठाम राहण्याची भूमिका प्रा. जी. डी. अग्रवाल यांनी घेतली होती.

याआधीही प्रा. जी. डी. अग्रवाल गंगेच्या स्वच्छतेसाठी आमरण उपोषणावर बसले होते. 2012 सालीही त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला होता. त्यावेळी मागण्यांवर सरकारने सकारत्मक भूमिका घेतल्याने प्रा. अग्रवाल यांनी उपोषण मागे घेतलं होतं.

आयआयटी प्राध्यापक ते स्वामी ग्यान स्वरुप सानंद, गंगेला वाहिलेल्या आयुष्याचा करुण अंत

स्वच्छ गंगेसाठी गेल्या 111 दिवसांपासून हरिद्वारमध्ये उपोषणावर असलेल्या प्रा. जी डी अग्रवाल यांचं आज निधन झालंय. 22 जूनपासून म्हणजे जवळपास गेल्या चार महिन्यांपासून ते उपोषणावर होते. कालच त्यांची प्रकृती बिघडायला लागल्यानंतर पोलिसांनी त्यांना ऋषिकेशच्या एम्स हाँस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पण अग्रवाल यांनी अन्नत्यागानंतर, जलत्यागही सुरु केला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडत जाऊन हाँस्पिटलमध्येच त्यांचा मृत्यू झालाय.
केंद्र सरकारनं स्वच्छ गंगेसाठी गंगा कायदा लागू करावा, गंगेच्या काठावर कुठलाही जलविद्युत प्रकल्प उभारला जाऊ नये या आणि अशा इतर अनेक मागण्यांसाठी त्यांनी उपोषण आंदोलन सुरु केलं होतं. स्वच्छ गंगेसाठी भाषणं अनेक होतात, पण त्यासाठी आपले प्राण वेचण्याची तयारी जी डी अग्रवाल यांनी उपोषणाला बसतानाचा दाखवली होती. धक्कादायक म्हणजे इतके दिवस उपोषण सुरु असताना एकही केंद्रीय मंत्री त्यांना भेटायला गेला नव्हता. अविरल गंगेसंदर्भात काल केंद्र सरकारनं नोटिफिकेशन काढून यात जी डी अग्रवाल यांच्या बऱ्याच मागण्यांचा समावेश असल्याचा दावा केला होता. पण त्यांच्या उपोषणाचं काय याबद्दल मात्र फारसं कुणी बोलायला तयार नव्हतं.
आयआयटी प्रोफेसर ते महंत असा एक विलक्षण प्रवास त्यांच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळाला. 2011 साली त्यांनी हिंदू धर्मातलं गंगेचं महत्व जाणून महंतपदाची दीक्षा घेतली. स्वामी ग्यानस्वरुप सानंद असं त्यांचं नामाभिधान त्यानंतर झालेलं होतं. उपोषणाच्या दरम्यानच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देशाच्या इतिहासात 1952 मध्ये घडली होती. पोट्टी श्रीरामलु यांनी स्वतंत्र आंध्राच्या मागणीसाठी आंदोलनातच आपलं बलिदान दिलं होतं. त्यानंतर हे आंदोलन चिघळलं आणि आंध्रप्रदेशची मागणीही पूर्ण झाली.
  • प्रो. जी डी अग्रवाल 86 वर्षांचे होते, 1932 मध्ये उत्तरप्रदेशातल्या मुझ्झफरनगर जिल्ह्यात त्यांचा जन्म
  • देशाच्या पर्यावरण आभियांत्रिकी क्षेत्रातलं मोठं नाव
  • आयआयटी रुरकी मधून त्यांनी सिव्हिल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं, त्यानंतर पर्यावरण अभियांत्रिकीमध्येही शिक्षण, कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी
  • मध्यप्रदेशातल्या चित्रकूटमध्ये ते सध्या राहत होते
  • गांधी विचारशैलीचं जीवनपद्धती त्यांनी स्वीकारली होती
  • चित्रकूटमध्ये दोन खोलीच्या झोपड्यांमध्येच त्यांचं वास्तव्य असायचं
  • स्वत:च झाडलोट करायची, स्वत:चे कपडे स्वत: धुवायचे, स्वत:चा स्वयंपाकही ते स्वत:च करायचे
  • प्रा. जी. डी. अग्रवाल हे पं. मदन मोहन मालविय यांनी 1905 साली स्थापन केलेल्या ‘गंगा महासभे’चे ज्येष्ठ कार्यकर्ते होते.
  • जी. डी. अग्रवाल हे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य होते.
  • मध्य प्रदेशातील महात्मा गांधी चित्रकोट ग्रामोद्योग विश्वविद्यालयात पर्यावरणशास्त्र हा विषयही त्यांनी काही काळ शिकवला.   

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
NEET PG 2026: परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
परीक्षा एकाच सत्रात, प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ, घराजवळ केंद्र निवडण्याची मुभा; NEET PG 2026 परीक्षेसाठी नियमांमध्ये मोठा बदल
Guhagar Kasturi Cat rare: गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
गुहागरच्या शाळेत जंगलातील दुर्मिळ कस्तुरी मांजर शिरलं, सगळेच अवाक झाले
Embed widget