एक्स्प्लोर

Pakistan Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? दिल्ली, मुंबईसह हे शहर पाकच्या रडारवर

Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया होत असतात. येथेच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत, जी हा देश धोकादायक असल्याचे सिद्ध करतात.

Nuclear Weapons: पाकिस्तानकडे भारतापेक्षा जास्त अण्वस्त्रे आहेत का? पाकिस्तानच्या भूमीवर दहशतवादी कारवाया होत असतात. येथेच ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता. याशिवाय अशी अनेक प्रकरणे आहेत, जी हा देश धोकादायक असल्याचे सिद्ध करतात. पाकिस्तानकडे अशी शस्त्रे देखील आहेत, जी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकतात. भारताकडेही अण्वस्त्रे आहेत, पण भारताचे धोरण हे आहे की, ते आधी अण्वस्त्रे डागणार नाहीत. पण पाकिस्तानमध्ये असे कोणतेही धोरण किंवा नियम बनवण्यात आले नाही. 

अलीकडेच न्यूज एजन्सी रॉयटर्सने स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानकडे 100 ते 120 अण्वस्त्रे आहेत. जे लढाऊ विमाने आणि क्षेपणास्त्रांद्वारे डागता येऊ शकतात. त्याचबरोबर भारताकडे 90 ते 110 अण्वस्त्रे आहेत. पण फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) नुसार, पाकिस्तानकडे 165 आणि भारताकडे 160 अण्वस्त्रे आहेत. आता नेमकी आकडेवारी काय आहे हे सांगणे कठीण आहे.

जगभरात 12,700 अण्वस्त्रे आहेत

फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स (एफएएस) च्या मते, जगात 12,700 अण्वस्त्रे आहेत. त्यापैकी 9400 सैन्याकडे आहेत, ज्यांचा वापर क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने, युद्धनौका किंवा पाणबुड्यांमधून केला जाऊ शकतो. बाकीची अण्वस्त्रे निष्क्रिय झाली आहेत, पण ती सुरक्षित असून अद्याप त्यांना नष्ट करण्यात आलं नाही. जगात 9440 अण्वस्त्रे आहेत, जी वेगवेगळ्या देशांच्या सैन्याकडे आहेत. त्यापैकी 3730 मिसाईल आणि बॉम्बर्समध्ये तैनात आहेत. यापैकी भारत आणि पाकिस्तानने त्यांची कोणतीही अण्वस्त्रे तैनात केलेली नाहीत. 3730 अण्वस्त्रांपैकी सुमारे 2000 अण्वस्त्रे अमेरिका, रशिया, ब्रिटिश आणि फ्रान्समध्ये हाय अलर्टवर आहेत. म्हणजेच शॉर्ट नोटीसवर हे अल्प अण्वस्त्रे डागले जाऊ शकतात.

पाक क्षेपणास्त्रांच्या रडारवर अर्ध्याहून अधिक भारतीय क्षेत्र 

पाकिस्तानकडे नस्त्र, हत्फ, गझनवी आणि अब्दाली ही कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. त्यांची रेंज 60 ते 320 किमी आहे, तर मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची, गौरी आणि शाहीनची रेंज 900 ते 2700 किमी आहे. या दोन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला तर दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, मुंबई, पुणे, भोपाळ, नागपूर, लखनौचे मोठे नुकसान होऊ शकते. 

भारतीय क्षेपणास्त्रांच्या रडारवर संपूर्ण पाकिस्तान 

भारताकडे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र पृथ्वी आहे. त्याची रेंज 350 किमी आहे. अग्नी-1 ची रेंज 700 किमी, अग्नी-2 2000 किमी आणि अग्नि-3 ची रेंज 3000 किमी आहे. या सर्वांना लष्करात सामील करण्यात आलं आहे. अग्नी-V ची रेंज 5000 किमी आहे. म्हणजेच या क्षेपणास्त्रांच्या मदतीने भारत पाकिस्तानातील सर्व शहरांना लक्ष्य करू शकतो. भारताने पाकिस्तानवर अणुबॉम्ब टाकल्यास रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, नवशेरा आणि कराची शहरे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ शकतात.

भारत आणि पाकिस्तानचे आण्विक धोरण

भारताने 1999 मध्ये 'प्रथम वापर नाही' असे आण्विक धोरण जाहीर केले. म्हणजेच भारत प्रथम कधीही अण्वस्त्रे वापरणार नाही. अण्वस्त्र हल्ला झाल्यासच भारत अणुबॉम्बचा अवलंब करेल. त्याचबरोबर पाकिस्तानात असा कोणताही नियम किंवा कायदा नाही. अणुहल्ला कधी आणि कोणत्या परिस्थितीत करायचा हे पाकिस्तानच्या नेत्यांनी आणि उच्च लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nandigram : मोठी बातमी, ममता बॅनर्जींनी नंदिग्राममध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा दिला त्यालाच अटक, मिलन प्रधान यांच्या अटकेचं कारण काय?
ममता बॅनर्जींच्या उमेदवाराची माघार, नंदिग्राममध्ये काँग्रेस उमेदवाराला अटक, पश्चिम बंगालमध्ये मोठ्या घडामोडी
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
साखर साठ्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, साखरेच्या दरात घसरण होणार का? 
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Pakistan Mosque Blast : पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा
पाकिस्तान हादरलं! नमाजासाठी सगळे जमले आणि मशिदीबाहेर अचानक झाला मोठा स्फोट; 15 जणांचा मृत्यू, जखमींचा हादरून टाकणारा आकडा

व्हिडीओ

Nithari Kand Surendra Koli : 'निठारी'तून मुक्तता सुटकेनंतर शेवट! | Special Report ABP Majha
Mamata Banerjee TMC News : ठाकरे आणि पवार आता ममताही बेजार? | Special Report ABP Majha
Manoj Jarange Attack : मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, आरोपांनी घेरलं Special Report
El Nino : दुष्काळामुळे दैना, शरद पवारांच्या सूचना Special Report
Sharad Pawar Letter to CM Devendra Fadnavis: 'महाराष्ट्रात तत्काळ दुष्काळ जाहीर करा'; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime News: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 5 जणांकडून वारंवार अत्याचार; रायगडमधील थरकाप उडवणारी घटना
Home Loan: घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
घर खरेदी करण्यासाठी गृहकर्ज घेण्याचा विचार करताय, सर्वात कमी व्याज दर कोणत्या बँकेचा?   
Ravindra Chavan : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पुराव्यांशिवाय बोलू नका, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी टोचले कान
Mamata Banerjee: नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
नवं नाव आणि चिन्ह मिळालं पण नंदिग्रामच्या उमेदवारानं माघार घेतली, अखेर ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय
Manoj Jarange Protest: शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
शब्द बदलले की निर्णय? आश्वासनांपलीकडे प्रत्यक्षात काय बदललं? 20 दिवसांच्या उपोषणातून मनोज जरांगेंना नेमकं काय मिळालं? नेमका कुठे काय बदल झाला? वाचा सविस्तर
Mahendra Dalvi : बाप्पाचं दर्शन घेणं चुकीचं नाही, आमचा संघर्ष, त्यामागचा प्रवास पाहता गोगावलेंची भूमिका चुकली, महेंद्र दळवींची गोगावले-तटकरे भेटीवरुन नाराजी
तटकरेंकडे सगळेच लोक संशयानं बघतात, भरतशेठनं त्यांच्या घरी जाणं टाळलं पाहिजे होतं, महेंद्र दळवींची नाराजी समोर
Delhi Crime News: मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
मित्राला भेटायला गेली, त्याच्यासह 4 मित्रांनी तिच्यासोबत नको ते केलं, नंतर 6 पेक्षा जास्त वेळा भोसकलं, शेतात पाला अन् मातीनं झाकलं, दिल्लीत अल्पवयीन मुलीसोबत हादरवणारं कृत्य
Thane Crime News: ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
ठाण्यात तीन भावांनी वेगवेगळ्या ठिकाणी बहिणीसोबत नको ते केलं, मारण्याची धमकीही दिली, 6 महिन्यांनंतर तिनं आईला आपबिती सांगितली अन्...
Embed widget