एक्स्प्लोर

Cyrus Mistry : कसा होतो पारशी समुदायाचा अंत्यविधी? दखमा पद्धत किंवा टॅावर ॲाफ सायलेन्स काय आहे?

Parsi : पारशी समुदायामध्ये पारंपरिक अंत्यविधी पद्धतीनुसार मृतदेह हा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये (Tower of Silence) मध्ये ठेऊन मांसाहारी पक्षांना खायला दिला जातो. 

मुंबई: टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे रविवारी अपघाती निधन झालं. अहमदाबादवरुन मुंबईला येताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सायरस मिस्त्री यांच्या निधनामुळे उद्योग जगतातील एक उमदं व्यक्तीमत्व हरवलं. सायरस मिस्त्री हे पारशी समाजाचे होते. पण त्यांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम हा परंपरागत पारशी पद्धतीने म्हणजे 'दखमा' किंवा 'टॉवर ऑफ सायलेन्स'मध्ये गिधाडांसाठी न टाकता स्मशानभूमीत दहन पद्धतीने पार पाडण्यात आलं. 

जगातील सर्वात लहान समूह असलेला पारसी समाज हा व्यवसायाच्या बाबतीत सर्वात यशस्वी आहे. पारसी हा जगातील सर्वात जुन्या धर्मांपैकी एक धर्म आहे. पारशी मूळचे ईराणी आहेत. जगभराचा विचार करता पारशी समाजातील लोकांची संख्या ही एक लाखाच्या आसपास आहे. यातील सर्वाधिक म्हणजे 60 हजारांच्या जवळपास लोकसंख्या ही भारतात आहे. पारशी समाज बहुतांशी मुंबईमध्ये राहत असून गुजरातमध्येही काही संख्येने ते राहतात. 

प्रेत आकाशाला सोपवलं जातं 

हिंदू धर्मामध्ये प्रेताच दहन केलं जातं, मुस्लिमांमध्ये त्याचे दफन केलं जातं. पारशी धर्मामध्ये जल, अग्नी आणि जमीन या तिन्ही गोष्टींना पवित्र मानलं जातं. त्यामुळे प्रेताचं दहन केलं जात नाही, तसेच दफनही केलं जात नाही किंवा प्रेत पाण्यात सोडलं जात नाही. या व्यतिरिक्त प्रेत हे आकाशाला (Sky Burials) सोपवलं जातं. 

दखमा किंवा टॉवर ऑफ सायलेन्स काय आहे? 

पारशी समुदायामध्ये प्रेताला दखमा (Dakhma) किंवा टॉवर ऑफ सायलेन्समध्ये (Tower of Silence) ठेवलं जातं. दखमा ही पारशी समाजाची वास्तू शक्यतो शहरापासून दूर, निर्जन ठिकाणी असते. दखमा ही वास्तू उंच आणि गोलाकार असते. या वास्तूच्या वरच्या भागात गोलाकार असा खोलगट भाग असतो. सूर्योदय झाल्यानंतर प्रेताचं शुद्धीकरण करुन या ठिकाणी  ठेवलं जातं. हे प्रेत गिधाडं किंवा इतर मांसाहारी पक्षांना सोपवलं जातं. पारशी समुदायामध्ये ही सर्वात पवित्र पद्धत मानली जाते. 


Cyrus Mistry : कसा होतो पारशी समुदायाचा अंत्यविधी? दखमा पद्धत किंवा टॅावर ॲाफ सायलेन्स काय आहे?

अंतिम संस्काराची पद्धत बदलली 

गेल्या काही वर्षांमध्ये गिधाडांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. जगभरातील 99 टक्के गिधाडं ही नष्ट झाल्याचं एक आकडेवारी सांगतेय. त्यामुळे प्रेतांच्या अंतिम संस्काराचं काय याची चिंता पारशी समुदायाला सतावत आहे. त्यामुळे पारंपरिक दखमा पद्धतीमध्ये आता हळूहळू बदल करण्यात येत असून अंतिम संस्काराची पद्धतही बदलली आहे. 

वरळीमध्ये पारशी समाजासाठी स्मशानभूमी 

दिवंगत उद्योगपती जेआरडी टाटा यांनी सर्वप्रथम पारशी समुदायाला स्वतंत्र अशी स्मशानभूमी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं सांगितलं जातं. नंतरच्या काळात पारशी समुदायाला वरळीमध्ये स्वतंत्र्य अशी स्मशानभूमी मिळाली. पारशी समुदाय हा दक्षिण मुंबईमध्ये एकवटला असून वरळीची स्मशानभूमी त्यांच्यासाठी सोईस्कर आहे. पण पारंपरिक पद्धत सोडून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धतीला सुरुवातीला समाजातील काही लोकांनी विरोध केला. पण नंतरच्या काळात हा विरोध मावळत गेला. 2015 साली मुंबई महापालिका आणि पारशी समुदायाच्या वतीनं वरळीतील स्मशानभूमीला अत्याधुनिक रुप देण्यात आलं.   

पारशी समुदायाकडे अंत्यविधीसाठी सध्या तीन पर्याय उपलब्ध आहेत, 

1. प्रेतावर पारंपरिक पद्धतीने दखमामध्ये अंत्यसंस्कार.
2. प्रेताचं स्मशानभूमीत दफन.
3. प्रेताचं स्मशानभूमीत दहन. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget