एक्स्प्लोर

Lockdown : 'मेरे प्यारे देशवासियो...'; तीन वर्षापूर्वी आजच्या दिवशी लागू झाला होता कोरोना लॉकडाऊन

Covid19 Lockdown Anniversary : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च 2020 रोजी देशभरात जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. भारतामध्ये जनता लॉकडाऊन लागून आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.

Coronavirus Lockdown Anniversary : 'मेरे प्यारे देशवासियो...' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी तीन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्याची घोषणा केली होती. पंतप्रधान मोदी यांनी  21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती.  पंतप्रधान मोदी यांनी 24 मार्च रोजी संध्याकाळी 21 दिवसांच्या म्हणजेच 14 एप्रिलपर्यंतच्या टाळेबंदीची घोषणा केली होती. डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. भारतात जानेवारी 2020 मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढताना पाहायला मिळाली. 

24 मार्च 2020 ला लागू झाला होता लॉकडाऊन

डिसेंबर 2019 मध्ये चीनमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आणि त्यानंतर कोरोना व्हायरस जगभरात वेगाने पसरला. जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आलं. भारतात 22 मार्चला लॉकडाऊनच्या आधीची पायरी म्हणजे जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यानंतर 24 मार्च रोजी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. यामुळे देशातल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मार्चमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढून 500 वर पोहोचली, त्यामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याची घोषणा केली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, कारण अत्यावश्यक गोष्टी सुरू राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी संवाद साधला होती. यावेळी जीवनावश्यक सोयी आणि सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये, असं आवाहन पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.

भारतात कोरोना कसा पसरला?

चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी 26 डिसेंबर 2019 रोजी वुहान शहरात संक्रमक कोरोना विषाणू आढळल्याची माहिती दिली. 29 जानेवारी 2020 रोजी भारतातील पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला. जागतिक आरोग्य संघटनेने 11 मार्च 2020 रोजी कोरोना विषाणूचा उद्रेककोरोनाचा उद्रेक हा जागतिक महामारी असल्याचे जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील कोरोना व्हायरसची लागण झालेला पहिला रुग्ण पुण्यामध्ये 9 मार्च 2020 रोजी आढळून आला.  त्यानंतर मार्च महिन्यात देशात कोरोनाचा पहिला बळी गेला. कर्नाटकमधील एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. 

कोरोना काळात देशातील आरोग्य व्यवस्थेचं सर्वाधिक अपयश समोर आलं. अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाला. कोरोना विषाणूवर सुरुवातीला उपचार उपलब्ध नसल्याने जनता पार भीतीच्या सावटाखाली होती. मात्र. याकाळात देशातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा मोठा सर्वसामान्य नागरिकांना बसला. लॉकडाऊन काळात एकीकडे वाढती महागाई आणि दुसरीकडे कोरोनाच्या उपचारासाठी लागणारा लाखो रुपयांचा उपचार या कात्रीत सामान्य लोक अडकले होते. सरकारी आरोग्य सुविधांचा अभाव आणि पैशाच्या अभावी अनेकांना उपचार मिळाले नाहीत, यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget