एक्स्प्लोर

Corona Vaccine : लसीसाठी झगडणाऱ्या राज्यांना पंतप्रधान म्हणत आहेत लसीचा उत्सव साजरा करा! 

पंतप्रधान मोदींनी देशाला एका नव्या उत्सवाचं आवाहन केलंय. हा उत्सव आहे टीका उत्सव...म्हणजे लसीकरणाचा उत्सव...आता ज्या राज्यांना मुळात लसच पुरेशा प्रमाणात मिळत नाहीय. त्यांनी हा उत्सव कशाच्या जोरावर करायचा हा मात्र प्रश्नच आहे.   

नवी दिल्ली : कोरोनाच्या महामारीत पंतप्रधान मोदींनी देशाला एका नव्या उत्सवाचं आवाहन केलंय. हा उत्सव आहे टीका उत्सव...म्हणजे लसीकरणाचा उत्सव...आता ज्या राज्यांना मुळात लसच पुरेशा प्रमाणात मिळत नाहीय. त्यांनी हा उत्सव कशाच्या जोरावर करायचा हा मात्र प्रश्नच आहे.   

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झगडणाऱ्या राज्यांना पंतप्रधान मोदींनी एक नवा मंत्र दिला. टीका उत्सव... म्हणजे लसीकरणाचा उत्सव साजरा करा असं मोदी म्हणत आहेत..11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे तर 14 एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती...याच निमित्तानं 11 एप्रिल ते 14 एप्रिल असा चार दिवसांचा हा लसीकरण उत्सव साजरा करा असं मोदींचं राज्यांना सांगणं आहे. 
 
काल सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधानांनी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय. देशात ज्यावेळी कोरोनाची दुसरी लाट भयानक वेगानं वाढतेय, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत होती..

राज्यांसमोर मुख्य समस्या आहे ती लस तुटवड्याची..राज्याला पुरेशी लस मिळत नाहीय असं महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत...तर त्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते अगदी केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, जावडेकर हे मात्र हा केवळ बहाणा असल्याचं सांगत आहेत...कालच्या बैठकीत या लस पुरवठ्याबाबतचं काही ठोस धोरण ठरेल असं वाटत होतं, मात्र एकाच राज्याला लस देऊन कोरोना संपणार नाही असं म्हणत मोदींनी या विषयाला बगल दिली. 

कोरोनाच्या काळातही मोदींनी देशातल्या जनतेला वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये दंग केलं होतं...लॉकडाऊनच्या सुरुवातीलाच थाळीनाद, घंटानाद यासारखे उपक्रम करुन झाले...आता लसीचा हा महोत्सव...पण यावरुन काँग्रेस नेत्यांनी मात्र जोरदार टीका केलीय. 

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेसाठी कडक लॉकडाऊनची गरज नाही, त्याऐवजी कंटेनमेंट झोन अधिक निगराणीनं करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी बोलून दाखवली. नाईट कर्फ्युला कोरोना कर्फ्यु असं नाव द्या, जेणेकरून लोकांमध्ये त्याचा योग्य संदेश जाईल..एखादा व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याचे किमान 30 कॉन्टॅक्ट ट्रेस झाले पाहिजेत अशीही सूचना मोदींनी यावेळी मुख्यमंत्र्यांना केलीय. 

लसीकरणाच्या इतिहासात भारताकडे फार मोठा अनुभव गाठीशी आहे, पण तरीही गेल्या 3 महिन्यांत केवळ 1 टक्के नागरिकांचंच लसीकरण पूर्ण का असा सवाल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना विचारलाय...गरजेपेक्षा जास्त लस आपण का निर्यात केली...इतर लसींची परवानगी लांबणीवर का आहे हे देखील प्रश्न आहेतच..जोपर्यंत या सगळ्यावर उत्तर मिळत नाही तोपर्यंत केवळ उत्सवाचं नाव देऊन लसीकरण पूर्ण होणार नाहीय. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
1 एप्रिलपासून पॅन कार्डचे नियम बदलणार, केवळ आधार कार्ड पुरेसे ठरणार नाही, जाणून घ्या सविस्तर माहिती 
LPG Gas Crisis: मोठी बातमी : राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
राज्यातील हॉटेल, उपहारगृहांना 20 टक्के गॅस पुरवठा होणार; व्यावसायिकांना मोठा दिलासा
PM Modi: पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
पीएम मोदी भारताच्या इतिहासात सर्वाधिक काळ सत्तेचे प्रमुख नेते; 'या' माजी मुख्यमंत्र्यांना मागे टाकत नवा विक्रम
The Indian Navy new stealth warship Taragiri: भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट
भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget