अयोध्या प्रकरण : नव्या घटनापीठाची स्थापन, 29 जानेवारीला सुनावणी
न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या राम मंदिर प्रकरणी वकील म्हणून कामकाज पाहिलं होतं. त्यामुळे ते घटनापीठात कसे असू शकतात, असा सवाल राजीव धवन यांनी उपस्थित केला होता. यानंतर न्यायमूर्ती ललित यांनी स्वत: घटनापीठातून वेगळ होण्याच निर्णय घेतला होता.

नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नव्या घटनापीठाची स्थापना केली आहे. 29 जानेवारीला पाच न्यायमूर्तींच घटनापीठ या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. नव्या घटनापीठात न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांना समावेश करण्यात आला आहे.
न्या. अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांनी याआधी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासोबत अयोध्या प्रकरणाची सुनावणी केली आहे. नव्या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती, अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांचा समावेश आहे. याआधीच्या घटनापीठात न्यायमूर्ती एन वी रमना आणि यू यू ललित यांचा समावेश होता.
पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठातील न्यायमूर्ती यू यू ललित यांच्यावर मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी ललित यांच्या समावेशाबाबत आक्षेप घेतला होता. ज्यामुळे ललित यांना सुनावणी प्रक्रियेतून वेगळं करण्यात आलं होतं.
न्यायमूर्ती ललित यांनी अयोध्या राम मंदिर प्रकरणी वकील म्हणून कामकाज पाहिलं होतं. त्यामुळे ते घटनापीठात कसे असू शकतात, असा सवाल राजीव धवन यांनी उपस्थित केला होता. यानंतर न्यायमूर्ती ललित यांनी स्वत: घटनापीठातून वेगळ होण्याच निर्णय घेतला होता.
Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर






















