एक्स्प्लोर

China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?

China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी सुमारे 2900 किमी आहे. ज्यामध्ये ते चीनच्या हद्दीत सुमारे 1700 किमी वाहते. अंदाजे 916 किमीपर्यंत भारताच्या सीमेमध्ये वाहते.

China World Largest Dam On Brahmaputra River : भारत-चीन संबंधांमध्ये सातत्याने चढउतार राहिला आहे. कुरापतखोर राहिलेल्या एक पाऊल मागे आल्यानंतर पाऊल कधी आणि केव्हा आणि कसे गिळंकृत केले याचाही अंदाज येत नाही आणि आजवर आलेला सुद्धा नाही. ऑक्टोबरमध्ये रशियाच्या कझान शहरात पीएम मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी बैठक झाली. चीनसोबतचे संबंध सुधारण्याबाबत परराष्ट्रमंत्र्यांनी संसदेत वक्तव्यही केले. यानंतर एनएसए अजित डोवाल चीनला गेले. अवघ्या काही महिन्यांमध्ये परिस्थितीमध्ये फरक पडेल, अशी चर्चा होती. मात्र, चीनने पुन्हा एकदा  या सर्व प्रयत्नांना कात्रजचा घाट दाखवला आहे. 

होटन प्रांतात दोन नवीन काऊंटीची घोषणा 

आता लडाखमध्ये दोन काउंटी (परगणा) निर्माण करून चीन आता ब्रह्मपुत्रा नदीवर (Brahmaputra River) जगातील सर्वात मोठे धरण (China World Largest Dam On Brahmaputra River) बांधण्याच्या चीनच्या तयारीत आहे. ज्यांनी 'एक पाऊल मागे आणि दोन पावले पुढे जाणे' हा चीनच्या विस्तारवादी धोरणाचा भाग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. चीनने नुकतेच होटन प्रांतात दोन नवीन काऊंटी निर्माण करणार असल्याची घोषणा केली होती. त्याचा काही भाग लडाखमध्ये आहे. चीनच्या या पावलावर भारताने टीका करत हे पाऊल स्वीकारता येणार नाही असे म्हटले आहे. हा भाग भारताचा आहे आणि चीनचा येथे दावा पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

भारतीय सीमेजवळ धरण बांधण्याच्या तयारीत 

चीन तिबेटजवळ ब्रह्मपुत्रा नदीवर भारतीय सीमेजवळ धरण बांधण्याच्या तयारीत आहे. 25 डिसेंबर रोजी चीनने याला मान्यता दिली आहे. जगातील सर्वात मोठे धरण (world's largest hydropower project) म्हणून वर्णन यांची गणना केली जात आहे. या प्रकल्पाची किंमत सुमारे 140 अब्ज डॉलर्स अपेक्षित आहे. चीनच्या या तयारीला भारताने विरोध केला आहे. यानंतर चीनने खुलासा केला असला, तरी तो तोकडा आहे. ब्रह्मपुत्रेवरून भारत आणि चीनमध्ये वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. ब्रह्मपुत्रेवरून जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमधील जलयुद्धाला कारणीभूत ठरत चालली आहे. 

ब्रह्मपुत्रा जगातील 9 वी सर्वात मोठी नदी

ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधील कैलास पर्वताजवळील मानसरोवर सरोवरातून उगम पावते आणि भारतातील अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून बांगलादेशात जात बंगालच्या उपसागराला मिळते. आसाममध्ये ती ब्रह्मपुत्रा किंवा लुईत म्हणून ओळखली जाते, तिबेटमध्ये तिला यारलुंग त्सांगपो ( Yarlung Tsangpo) म्हणून ओळखली जाते, अरुणाचलमध्ये ती सियांग/दिहांग नदी म्हणून ओळखली जाते आणि बंगालीमध्ये ती जमुना नदी म्हणून ओळखली जाते. प्रवाहाच्या बाबतीत ही जगातील 9 वी सर्वात मोठी नदी आहे आणि 15वी सर्वात लांब नदी आहे.

ब्रह्मपुत्रा नदी विशेष का आहे?

ब्रह्मपुत्रा नदी भारत, चीन आणि बांगलादेशसाठी वरदान आहे. ही नदी सिंचन आणि वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. पण हिमालयीन प्रदेशात बर्फ वितळला की पूर येतो. अनेक उपनद्या त्यात सामील होतात. ब्रह्मपुत्रा नदी जगातील दोन सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत आणि चीनमधून जाते आणि बांगलादेशला मिळते. त्याची तुलना जगाच्या एकूण लोकसंख्येशी केली तर असे म्हणता येईल की ही 2900 किमी लांबीची नदी जगातील 37 टक्के लोकसंख्येला प्रभावित करते. त्यामुळे यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे.  

लोकसंख्या हे देखील वादाचे प्रमुख कारण

भारत आणि चीनची लोकसंख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 37 टक्के असूनही, या दोन देशांत एकत्रितपणे जगातील केवळ 11 टक्के शुद्ध पाणी आहे. जलप्रदूषण आणि औद्योगिक अर्थव्यवस्थांच्या वाढत्या मागण्यांमुळे ही विसंगती आणखी वाढली आहे. पाण्याबाबत चीनच्या अस्वस्थतेचे एक कारण म्हणजे त्याची अंदाजे 23 दशलक्ष लोकसंख्या पिण्याच्या स्वच्छ पाण्याच्या समस्येला तोंड देत आहे. चीनच्या अनेक भागात विजेचे संकटही सामान्य आहे. त्यामुळे जलविद्युत प्रकल्प ही चीनची मजबुरी आहे. चीनच्या सरकारी आकडेवारीनुसार, चीनचे सुमारे 60 टक्के भूजल दूषित आहे. चीनच्या 12 व्या पंचवार्षिक योजनेत असे मानले जात होते की जलस्रोतांच्या कमतरतेमुळे देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे.

दुसरीकडे, नद्या भारतासाठी जीवनवाहिन्या आहेत. देशातील मोठी लोकसंख्या नद्यांशी थेट जोडलेली आहे. जर आपण ब्रह्मपुत्रा नदीबद्दलच बोललो तर ती भारताच्या ईशान्य प्रदेशासाठी वरदान आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, एकट्या आसाममधील 27 दशलक्ष लोकसंख्येला या नदीचा फायदा होतो. या नदीला सांस्कृतिक आणि पौराणिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. वीजनिर्मिती आणि मासळीसाठीही ही नदी महत्त्वाची आहे. सामरिकदृष्ट्याही ब्रह्मपुत्रा भारतासाठी खूप महत्त्वाची आहे.

ब्रह्मपुत्रा नदीचा वाटा कोणत्या देशात किती आहे?

ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबी सुमारे 2900 किमी आहे. ज्यामध्ये ते चीनच्या हद्दीत सुमारे 1700 किमी वाहते आणि नंतर अंदाजे 916 किमीपर्यंत भारताच्या सीमेमध्ये वाहते. त्यानंतर तिस्ता नदीला जाऊन उरलेले भाग बांगलादेशच्या सीमेखाली येतात. 25 डिसेंबर रोजी चीनने तिबेटमधील यारलुंग त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाच्या बांधकामाला मंजुरी दिली. हा 60,000 मेगावॅट (MW) क्षमतेचा प्रकल्प जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असलेल्या थ्री गॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट वीज निर्मिती करेल. मात्र यावर भारताने प्रश्न उपस्थित केले आहेत.

यामुळे भारताचे काय नुकसान होईल?

या प्रकल्पाच्या बांधकामामुळे ईशान्य भारतातील लाखो लोकांच्या जीवनमानावर आणि पर्यावरणावर परिणाम होऊ शकतो. चीनच्या या प्रयत्नावर अनेक पर्यावरणवाद्यांनी आधीच चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या या निर्णयाला भारतानेही कडाडून विरोध केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता यांनीही प्रश्न उपस्थित केला आहे. चीनने हे मोठे धरण बांधल्याने नजीकच्या इतर नद्यांवर विपरीत परिणाम होईल, असा युक्तिवाद केला जात आहे. भारतात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी होईल.

यारलुंग त्सांगपो प्रकल्प म्हणजे काय?

अहवालानुसार, चीनच्या 14 व्या पंचवार्षिक योजनेत (2021-2025) या प्रकल्पाचा उल्लेख करण्यात आला होता. हे 'ग्रेट बेंड' जवळ आहे, जिथे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करण्यापूर्वी मेडोग काउंटीमध्ये जवळजवळ यू-टर्न घेते.

या प्रकल्पाबाबत चीनचा दावा काय आहे?

चीनचा दावा आहे की हा प्रकल्प पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांपासून दूर जाऊन 2060 पर्यंत नेट कार्बन न्यूट्रॅलिटी प्राप्त करण्यास मदत करेल. ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह या परिस्थितीसाठी आदर्श असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. चीन या धरणाचा वापर केवळ जलविद्युतसाठीच करणार नाही, तर त्याचा वापर शस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, दोन देशांमधील तणाव वाढल्यास चीन या धरणातून भारताच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात पाणी सोडून पूरसदृश परिस्थिती निर्माण करू शकतो.

ब्रह्मपुत्रा नदीवरील या प्रस्तावित धरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही चिंता व्यक्त करण्यात आली. भारताचाही निषेध होत आहे. याआधी चीनने हुबेई प्रांतातील यियांग शहरात यांगत्से नदीवर 'थ्री गॉर्जेस डॅम' (Three Gorges Dam) बांधला होता. या धरणामुळे आजूबाजूच्या परिसरावर गंभीर पर्यावरणीय आणि सामाजिक परिणाम झाले. या धरणामुळे 1 दशलक्षहून अधिक लोक विस्थापित झाले आणि भूकंपासारख्या समस्या या प्रदेशात सामान्य झाल्या. त्याच वेळी, चीन ज्या ठिकाणी ब्रह्मपुत्रा नदीवर धरण बांधण्याच्या तयारीत आहे, ती जागा हिमालयीन प्रदेशात येते. तिथे आधीच भूकंपाचा धोका जास्त आहे.

ब्रह्मपुत्रेवर किती धरणे आहेत?

ब्रह्मपुत्रा नदी किंवा तिच्याशी संबंधित नद्यांवर चीनने यापूर्वीच अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. 1998 मध्ये चीनने सर्वप्रथम यमद्रोक जलविद्युत केंद्र सुरू केले. यानंतर 2007 मध्ये झिकाँग हायड्रो पॉवर स्टेशन, त्यानंतर 2013, 2015 मध्ये जंगमू धरण, 2019 आणि 2020 मध्ये विविध प्रकल्प सुरू करण्यात आले. तसेच, 10 हून अधिक प्रकल्प अद्याप प्रस्तावित आहेत. भारताबद्दल बोलायचे झाले तर अरुणाचल प्रदेशात सुबनसिरी धरण सुरू झाले. मात्र सध्या हे काम बंद आहे. तर रंगनदी धरण 2001 मध्ये बांधण्यात आले आणि रंगीत धरण 2000 मध्ये बांधण्यात आले. त्याचवेळी दिबांग धरणाच्या दुसऱ्या प्रकल्पाचे कामही रखडले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Yusuf Pathan NCPI: 'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
'आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही', युसूफ पठाणसह NCP च्या तीन खासदारांची एनडीएच्या बैठकीकडे पाठ; एनसीपीच्या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget