एक्स्प्लोर

India China Face off |चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची अखेर सुटका! सरकारचं मात्र घटनेवर मौन

चीनच्या तावडीतून भारताच्या 10 जवानांची सुटका झाल्याचे वृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं आलं आहे. मात्र, सरकारकडून या घटनेवर कुठलीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, या बातमीचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आहे. आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नसल्याचं चीनने म्हटलं आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमेवरच्या घटनेबाबत आज एक नवी धक्कादायक माहिती समोर येतेय. चीनच्या तावडीत कालपर्यंत आपले 10 जवान होते, काल त्यांची अखेर सुटका झालीय. द हिंदू या इंग्रजी वृत्तपत्रानं या घटनेशी संबंधित लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं ही बातमी दिलीय. पण सरकारनं त्याबाबत अजून कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीय. भारताचे 10 जवान चीनच्या तावडीत होते की नव्हते? या 10 जवानांची काल सुटका झाल्याच्या बातम्यांवर सरकारचं अद्याप काहीच स्पष्टीकरण का नाही? नेमकं सत्य काय आहे हे का सांगितलं जात नाहीय?, असे प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. मात्र, या बातमीचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने खंडन केलं आहे. आमच्या ताब्यात भारतीय सैनिक नसल्याचं चीनने म्हटलं आहे.

भारत चीन सीमेवर झालेल्या घटनेबद्दल अजून काय काय लपवलं जातंय? 10 जवानांची सुटका झाल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडेल की हे जवान नेमके पकडले कधी होते. सरकारनं तर त्याबद्दल अजून काहीच शब्द काढलेला नाहीय. पण या घटनेशी संबंधित अनेक लष्करी अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं अनेक प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांनी मात्र हे वृत्त दिलंय. काल म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता भारताच्या 10 जवानांची सुटका चीननं केल्याचं वृत्त आहे. या 10 जणांमधे 2 मेजर, 2 कॅप्टन असे एकूण 4 अधिकारी तर 6 सैनिक आहेत. गेल्या चार दिवसांपासून जी लष्करी पातळीवरची चर्चा सुरु होती, ती याच जवानांच्या सुटकेसाठी होती असाही दावा आता केला जातोय.

India-China Face Off | भारत-चीन सीमेवरील हिंसक झटापटीनंतर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली!

सरकारकडून घटनेवर मौन 15-16 जूनच्या मध्यरात्री सीमेवर हिंसक झटापट झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं नेमकं काय झालं याची माहिती बाहेर येतेय. 20 जवान तर शहीद झाले, पण काही जवान बेपत्ता असल्याच्याही बातम्या होत्या. त्याबाबत सरकारनं कुठलं वक्तव्य केलं नव्हतं. काल संध्याकाळी जेव्हा या जवानांना सुखरुप परत आणण्यात यश आलं, त्यानंतर आर्मीनं फक्त एक त्रोटक वक्तव्य जाहीर केलं की कुठलंही भारतीय पथक बेपत्ता नाहीय. या त्रोटक वक्तव्यातून काहीच स्पष्ट होत नाही. काही बड्या लष्करी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जेव्हा या सर्व जवानांची सुटका झाली, त्यानंतरच हे स्टेटमेंट लष्करानं केलं असावं. हे 10 जवान परत येणं ही भारतासाठी प्रतिष्ठेची बाब होती, त्यामुळेच चर्चेच्या, प्रतिक्रियेच्या पातळीवर गेले चार दिवस सावधानता बाळगली जात असावी.

या 10 जवानांची सुटकेनंतर मेडिकल चाचणी होणार आहे, त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडून माहिती घेतली जाईल असंही सांगितलं जातंय. 15 जूनची घटना झाल्यानंतरही मेजर जनरल स्तरावर चर्चेच्या तीन फेऱ्या सुरु होत्या. त्यात भारताच्या दृष्टीनं या 10 जणांची सुटका हाच मुद्दा होता. आता पुढच्या बैठकीत सीमेवरच्या तणावावर चर्चा होणार आहे. चीननं गलवान खोऱ्यावर नजर ठेवलीय, लडाखमधला लष्करीदृष्ट्या महत्वाचा पॉईटं फिंगर 4 ही त्यांच्या आवाक्यात आहे. आता आपल्या हद्दीत आलेल्या सैनिकांची आपण कशी सुटका केली हे औदार्य आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखवायलाही ते मोकळे. त्यामुळे या सगळ्या खेळात चीनला हुशारीनं उत्तर द्यायला हवं असं लष्करातल्या सूत्रांचं म्हणणं आहे. या सुटकेबद्दल सरकारचं काही अधिकृत वक्तव्य येतंय का हेही पाहणं महत्वाचं असेल.

Aircraft P8I at LAC | चिनी सैन्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी नौदलाकडून 'पी 8 आय' एअरक्राफ्ट तैनात

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
गॅस पेट्रोल ते CNG, फक्त 15 दिवसातच सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका, कोणत्या वस्तूत किती झाली वाढ?
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
Dhar Bhojshala : धारची भोजशाळा हे वाग्देवीचे मंदिर, हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार कायम; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
धारची भोजशाळा हे वाग्देवीचे मंदिर, हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार कायम; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
Monsoon Rain: आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळात दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज
आनंदाची बातमी: मान्सून 26 मे रोजी केरळात दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज

व्हिडीओ

Raju Shetty Protest :राजू शेट्टींना फरफटत नेलं, काजू आंबा उत्पादक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं
NEET UG 2026 Re-Exam Date मोठी बातमी: पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या NEET ची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार
Petrol Diesel Price Hike : मोठी बातमी, पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महागलं
Pune Hospital Bomb Case | हॉस्पिटलमध्ये बॉम्ब, सुरक्षेची बोंब | ABP Majha Special Report
Inflation Rate Hike | महागाईचा भडका, धोरणांचा फटका; खापर युद्धावर फोडणं योग्य? | | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
'फडणवीस परिणाम भोगावे लागतील, आम्ही गुन्हा केलेला नाही' काजू, आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्व विरोधक रस्त्यावर उतरत एकवटताच मुंबई पोलिसांनी फरफटत नेलं, राजू शेट्टींचा संताप
Congress Leader: काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
काँग्रेसचे नेत्याचे सर्पदंशाने निधन; राजकीय अन् वैद्यकीय क्षेत्रात हळहळ, पायावर जखमेच्या खुणा, नेमकं काय घडलं?
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
'हा तर निव्वळ मूर्खपणाचा विषय, मी जर माझं घरदार सोडून करत असेल तर..' किंग कोहली गंभीर आणि आगरकरांवर भलताच संतापला
Devendra Fadnavis: कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
कांदा उत्पादकांसाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा, केंद्र सरकार किती भावाने खरेदी करणार? साताऱ्याच्या सभेत सांगितला 5 ट्रिलियन डॉलर्सच्या इकॉनॉमीचा मास्टरप्लॅन
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'कायदा धाब्यावर बसवून सत्ता स्थापन, पक्ष फोडणे, आमदार खासदार फोडत असतील तर' राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
विद्यार्थ्यांना NEET परीक्षा शुल्क परत दिले जाणार, पुर्नपरीक्षेचं शुल्क नाही, शहर निवडण्याचा पर्याय दिला जाणार : धर्मेंद प्रधान
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
गेल्या आठ वर्षांत तुम्ही एमएसपीला हातच लावायला तयार नाही आणि साखर निर्यात बंदीने कारखाने, शेतकरी आणि कामगार पूर्णपणे कोलमडून पडले; हर्षवर्धन पाटलांनी अडचणीचा पाढाच वाचला
Sunil Tatkare and Praful Patel: 'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'शरद पवारांनी तटकरे-प्रफुल पटेलांचं कौतुक कोणत्या उद्देशाने केलं हे समजत नाही', अजितदादा गटाच्या नेत्याचं वक्तव्य
Embed widget