![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Mumbai High आणि Bassein चा 60% हिस्सा परदेशी कंपन्यांना विकण्याच्या सूचना
देशातील सर्वात मोठं तेल उत्पादक क्षेत्र असलेल्या मुंबई हाय आणि बसई येथील 60 टक्के हिस्स्यासह देशातील तेल उत्पादक क्षेत्राचं व्यवस्थापनही परदेशी कंपन्यांना देण्यास सांगितलं आहे.
![केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Mumbai High आणि Bassein चा 60% हिस्सा परदेशी कंपन्यांना विकण्याच्या सूचना Central Govt petroleum ministry wants ONGC to divest 60% stake in Mumbai High and Bassein केंद्र सरकारचा मोठा निर्णय, Mumbai High आणि Bassein चा 60% हिस्सा परदेशी कंपन्यांना विकण्याच्या सूचना](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/16/1ed702728d2d02e7d312bcb2fdcc11e2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशातील सर्वात मोठं तेल उत्पादक क्षेत्र असलेल्या मुंबई हाय (Mumbai High) आणि बसई (Bassein) येथील 60% हिस्सा परदेशी कंपन्यांना विकण्याच्या सूचना केंद्र सरकारने ओएनजीसी (ONGC)ला दिल्या आहेत. यासोबतच देशातील तेल उत्पादक क्षेत्राचं व्यवस्थापनही परदेशी कंपन्यांना देण्यास सांगितलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने 28 ऑक्टोबरला या संदर्भात ओएनजीसीला पत्र लिहिले आहे.
सचिव अमर नाथ यांच्या वतीने ओएनजीसी (ONGC) चे अध्यक्ष आणि एमडी सुभाष कुमार यांना पत्र लिहिले आहे. ONGC च्या नियंत्रणाखालील मुंबई हाय, बसाई आणि सॅटेलाइट (B&S) ऑफशोअर मालमत्तेचे उत्पादन कमी असल्याचे पत्रात म्हटले आहे. म्हणून, आंतरराष्ट्रीय भागीदारांना आमंत्रित केले पाहिजे आणि त्यांना 60 टक्के भागीदारी आणि ऑपरेशनल नियंत्रण दिले पाहिजे.
एप्रिलनंतर अमरनाथ यांनी अधिकृतपणे असे पत्र लिहिण्याची ही दुसरी वेळ आहे, ज्यामध्ये कंपनीच्या सुमार कामगिरीबद्दल त्यांनी नमूद केले आहे. अमरनाथ हे दीर्घकाळापासून ओएनजीसीच्या संचालक मंडळावर सरकारी नामनिर्देशित संचालक आणि व्यवस्थापनाचा भाग आहेत. पुढील वर्षी ते सुभाष कुमार यांची जागा घेऊ शकतात, असे समजते.
माहितीनुसार, अमर नाथ यांनी पत्रात लिहिले आहे की, मुंबई हाय फिल्डमधून उत्पादन सातत्याने कमी होत आहे. पुर्नविकास प्रकल्पांसह हे प्रमाण 28 टक्क्यांवरून 32 टक्क्यांपर्यंत वाढेल. "या क्षेत्रात देशांतर्गत उत्पादनात योगदान देण्याची मोठी क्षमता आहे," असे त्यांनी लिहिले आहे.
"ओएनजीसीसाठी हे आव्हानात्मक असेल कारण कंपनीतील बदल किंवा विकास प्रकल्प संथ झाले आहेत. प्रक्रियात्मक पैलू आणि इतर अडचणी कंपनीला त्वरित निर्णय घेण्यास प्रोत्साहित करणार नाहीत," असं मत अमरनाथ यांनी व्यक्त केलं आहे. अतिरिक्त सचिवांनी लिहिले आहे, की ओएनजीसीने आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या कंपन्यांना भागीदारीच्या स्वरूपात आणावे आणि त्यांना या क्षेत्रातील 60 टक्के भागीदारी देत त्यांना चालवण्याची जबाबदारी द्यावी.
अमरनाथ यांनी म्हटलं आहे की, "ओएनजीसीने अनुभवी आंतरराष्ट्रीय भागीदारांना आमंत्रित करण्याचा विचार केला पाहिजे आणि 60 टक्के समस्या आणि ऑपरेशन नियंत्रण दिलं पाहिजे." मुंबई हायचा शोध 1974 मध्ये लागला आणि B&S येथे उत्पादन 1988 मध्ये सुरू झाले. मुंबई हाय आणि B&S या ONGC च्या मुख्य मालमत्ता आहे आणि सध्याच्या तेल आणि वायू उत्पादनाच्या दोन तृतीयांश भाग आहे. ओएनजीसीच्या ड्रिलिंग आणि विहीर सेवा युनिटमधील स्टेक विक्रीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)