एक्स्प्लोर

चुकून पाकिस्तानात गेलेला जवान परतला, पाकिस्तानने कोणत्या नियमाने BSF जवानाला परत पाठवलं?

BSF Jawan Return P K Sahu : पी के साहू हे चुकून सीमेपल्याड गेले होते, त्यावेळी पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. मात्र आता जवळपास तीन आठवड्यानंतर भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठवलं आहे. मात्र पाकिस्तानने कोणत्या नियमानुसार भारतीय जवानाची सुटका केली, दोन्ही देशात असे काही करार आहेत का, याबाबतची उत्सुकता सर्वांना आहे 

BSF Jawan Return : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्यस्थितीत, चुकून बॉर्डर ओलांडलेला BSF जवान भारतात परतला आहे. तब्बल 22 दिवसांच्या अथक वाटाघाटीनंतर पाकिस्तानने भारतीय जवान पी के साहू (P K Sahu) अटारी वाघा बॉर्डरवरुन भारतात दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन-तीन दिवसातच, पी के साहू हे चुकून सीमेपल्याड गेले होते, त्यावेळी पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. मात्र आता जवळपास तीन आठवड्यानंतर भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठवलं आहे. मात्र पाकिस्तानने कोणत्या नियमानुसार भारतीय जवानाची सुटका केली, दोन्ही देशात असे काही करार आहेत का, याबाबतची उत्सुकता सर्वांना असते. 

जवानांना परत पाठवण्याचा नियम

पी के साहू भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय नियमांची चर्चा सुरु झाली आहे. जगभरात अनेक देशात जवानांना परत पाठवण्याचे नियम आहेत. जर एखाद्या जवानाने चुकून सीमा ओलांडली असेल तर त्याला परत पाठवलं जातं. एकीकडे भारत-पाकिस्तान दोन्ही देशाचे जवान एकमेकांवर फायरिंग करत असताना, अशा जवानांना जिवंत परत पाठवणं आश्चर्यकारक वाटू शकतं. पण जर सैनिकाने सरेंडर केलं असेल, तो विनाशस्त्र असेल किंवा शस्त्र न चालवता शरण आला असेल तर अशा जवानांना परत पाठवलं जातं. हे सर्व जिन्हिवा करारानुसार दोन्ही देशांनी मान्य केलं आहे. युद्धजन्य स्थिती असो वा तणावाची स्थिती, अशा परिस्थितीत जवानांना परत पाठवणं दोन्ही देशांना मान्य करावंच लागतं. 

जिन्हिवा करारानुसार युद्धातील क्रूरतेला आळा घालणे, नागरिकांचं रक्षण करणं, युद्धात जखमी झालेल्या जायबंदी सैनिकांशी योग्य व्यवहार करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या देशाचा नागरिक किंवा जवान जर जखमी अवस्थेत सापडला तर त्याला तात्काळ उपचार देणे गरजेचं आहे. तसंच योग्य वेळेनंतर त्यांना त्या त्या देशात पाठवावं लागतं.  

आंतरराष्ट्रीय करारांनुसार आणि मानवाधिकारांच्या तत्वांनुसार, जर एखादा जवान चुकून (उदा. खराब हवामान, दिशाभूल, किंवा प्रशिक्षणादरम्यान) सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशात गेला, तर अशा परिस्थितीत त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया शक्य असते.

जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया कशी?  

ओळख पटवली जाते : संबंधित जवानाची ओळख आणि हेतू चुकून सीमापलिकडे गेल्याची खातरजमा केली जाते.

ध्वज बैठक (Flag Meetings) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'फ्लॅग मीटिंग्स' घेतल्या जातात, जिथे दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात.

शांततामय मार्गाने सुटका : जर जवान चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता, हे स्पष्ट झालं  तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु होते.

विलंब : परत पाठवण्यामध्ये काही वेळ लागतो, कारण तपास, राजनैतिक प्रक्रिया आणि संवाद आवश्यक असतो. त्यामुळे या प्रक्रियेला अनेकदा विलंब लागू शकतो

अनेक वेळा भारतीय जवान चुकून LOC (Line of Control) पार करतात आणि पाकिस्तानच्या ताब्यात जातात. अशा वेळी, दोन्ही देशांमधील संवादानंतर अशा जवानांना परत पाठवलं गेलं आहे.

अशाचप्रमाणे पाकिस्तानचे जवान देखील भारतात चुकून आले असतील, तर त्यांनाही परत पाठवण्यात आले आहे. 

P K Sahu VIDEO  : चुकून सीमा ओलांडलेल्या भारतीय जवानाला पाकिस्तानने सोडलं

संबंधित बातम्या 

India Pakistan: मोठी बातमी : चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन पी के साहू परतले!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
बदलापुरात केमिकल कंपनीत भीषण स्फोट, मोठी आग; अग्निशमन दलाच्या 10 गाड्या पोहचल्या
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
भाजप नेते अन् अजित पवारांची एकमेकांवर टीका, जयंत पाटलांनी सांगितलं राजकारण; पवार कुटुंब एकत्रावरही बोलले
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Silver Rate : उच्चांक गाठल्यानंतर चांदीचे दर 8000 रुपयांनी घसरले, सोन्याच्या दरात तेजी की घसरण?
Embed widget