एक्स्प्लोर

चुकून पाकिस्तानात गेलेला जवान परतला, पाकिस्तानने कोणत्या नियमाने BSF जवानाला परत पाठवलं?

BSF Jawan Return P K Sahu : पी के साहू हे चुकून सीमेपल्याड गेले होते, त्यावेळी पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. मात्र आता जवळपास तीन आठवड्यानंतर भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठवलं आहे. मात्र पाकिस्तानने कोणत्या नियमानुसार भारतीय जवानाची सुटका केली, दोन्ही देशात असे काही करार आहेत का, याबाबतची उत्सुकता सर्वांना आहे 

BSF Jawan Return : पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्यस्थितीत, चुकून बॉर्डर ओलांडलेला BSF जवान भारतात परतला आहे. तब्बल 22 दिवसांच्या अथक वाटाघाटीनंतर पाकिस्तानने भारतीय जवान पी के साहू (P K Sahu) अटारी वाघा बॉर्डरवरुन भारतात दाखल झाले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर दोन-तीन दिवसातच, पी के साहू हे चुकून सीमेपल्याड गेले होते, त्यावेळी पाकिस्तानी रेंजर्सनी त्यांना पकडलं होतं. मात्र आता जवळपास तीन आठवड्यानंतर भारतीय जवानाला पाकिस्तानने परत पाठवलं आहे. मात्र पाकिस्तानने कोणत्या नियमानुसार भारतीय जवानाची सुटका केली, दोन्ही देशात असे काही करार आहेत का, याबाबतची उत्सुकता सर्वांना असते. 

जवानांना परत पाठवण्याचा नियम

पी के साहू भारतात परतल्यानंतर आंतरराष्ट्रीय नियमांची चर्चा सुरु झाली आहे. जगभरात अनेक देशात जवानांना परत पाठवण्याचे नियम आहेत. जर एखाद्या जवानाने चुकून सीमा ओलांडली असेल तर त्याला परत पाठवलं जातं. एकीकडे भारत-पाकिस्तान दोन्ही देशाचे जवान एकमेकांवर फायरिंग करत असताना, अशा जवानांना जिवंत परत पाठवणं आश्चर्यकारक वाटू शकतं. पण जर सैनिकाने सरेंडर केलं असेल, तो विनाशस्त्र असेल किंवा शस्त्र न चालवता शरण आला असेल तर अशा जवानांना परत पाठवलं जातं. हे सर्व जिन्हिवा करारानुसार दोन्ही देशांनी मान्य केलं आहे. युद्धजन्य स्थिती असो वा तणावाची स्थिती, अशा परिस्थितीत जवानांना परत पाठवणं दोन्ही देशांना मान्य करावंच लागतं. 

जिन्हिवा करारानुसार युद्धातील क्रूरतेला आळा घालणे, नागरिकांचं रक्षण करणं, युद्धात जखमी झालेल्या जायबंदी सैनिकांशी योग्य व्यवहार करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या देशाचा नागरिक किंवा जवान जर जखमी अवस्थेत सापडला तर त्याला तात्काळ उपचार देणे गरजेचं आहे. तसंच योग्य वेळेनंतर त्यांना त्या त्या देशात पाठवावं लागतं.  

आंतरराष्ट्रीय करारांनुसार आणि मानवाधिकारांच्या तत्वांनुसार, जर एखादा जवान चुकून (उदा. खराब हवामान, दिशाभूल, किंवा प्रशिक्षणादरम्यान) सीमारेषा ओलांडून दुसऱ्या देशात गेला, तर अशा परिस्थितीत त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया शक्य असते.

जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया कशी?  

ओळख पटवली जाते : संबंधित जवानाची ओळख आणि हेतू चुकून सीमापलिकडे गेल्याची खातरजमा केली जाते.

ध्वज बैठक (Flag Meetings) : भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'फ्लॅग मीटिंग्स' घेतल्या जातात, जिथे दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात.

शांततामय मार्गाने सुटका : जर जवान चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता, हे स्पष्ट झालं  तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु होते.

विलंब : परत पाठवण्यामध्ये काही वेळ लागतो, कारण तपास, राजनैतिक प्रक्रिया आणि संवाद आवश्यक असतो. त्यामुळे या प्रक्रियेला अनेकदा विलंब लागू शकतो

अनेक वेळा भारतीय जवान चुकून LOC (Line of Control) पार करतात आणि पाकिस्तानच्या ताब्यात जातात. अशा वेळी, दोन्ही देशांमधील संवादानंतर अशा जवानांना परत पाठवलं गेलं आहे.

अशाचप्रमाणे पाकिस्तानचे जवान देखील भारतात चुकून आले असतील, तर त्यांनाही परत पाठवण्यात आले आहे. 

P K Sahu VIDEO  : चुकून सीमा ओलांडलेल्या भारतीय जवानाला पाकिस्तानने सोडलं

संबंधित बातम्या 

India Pakistan: मोठी बातमी : चुकून पाकिस्तानात गेलेला BSF जवान भारतात परतला, 20 दिवसांनी पाकने सोडलं, अटारी बॉर्डरवरुन पी के साहू परतले!

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 5 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ? खरं काय खोटं काय? ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
मोठी बातमी! पुण्यातील नवले ब्रीजवर भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू 20 जखमी
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा घात करणारी पिपाणी निवडणूक आयोगाकडून कायमची हद्दपार; शशिकांत शिंदे म्हणाले, 'तर आज महाराष्ट्रातील चित्र नक्कीच वेगळं असतं!'
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
'ज्यांनी माझी हकालपट्टी म्हटलं, त्यांनाच सणसणीत चपराक दिली' आमदार अमोल मिटकरींचा फडणवीसांची 'ती' शायरी म्हणत खोचक टोला
Embed widget