एक्स्प्लोर

Bihar Elections 2020 | 'आत्मनिर्भर बिहार'साठी भाजपचा जाहीरनामा; सत्ता आल्यास कोरोना लस मोफत देण्याचं आश्वासन!

Bihar Elections 2020 : बिहार निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच गुरुवारी भाजपने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. तसेच भाजपने निवडणुकीसाठी 11 मोठे संकल्प केले असून सत्तेत आल्यानंतर ही सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा दावाही केला आहे.

Bihar Elections 2020 : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आज (गुरुवारी) जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बिहारचे भाजप अध्यक्ष संजय जायस्वाल यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत पाटण्यात भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. बिहार निवडणुकीसाठी भाजपने 11 मोठे संकल्प केले असून सत्तेत आल्यानंतर ही सर्व आश्वासनं पूर्ण करण्याचा दावाही केला आहे. तसेच भाजपने भाजपची सत्ता आल्यानंतर संपूर्ण बिहारमध्ये कोरोना लसीचं वितरण मोफत करणार असल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत बिहारमध्ये 19 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासनही दिलं आहे.

भाजपने बिहार निवडणुकींसाठी 'भाजप है तो भरोसा है' 5 सूत्रं, एक लक्ष्य, 11 संकल्प' असा नारा दिला आहे. बिहारच्या राजधानीचं शहर असलेल्या पाटण्यात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषणंही केली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बोलताना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु, कोरोना लस भारतात आल्यानंतर तिचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन भारतातच केलं जाईल. जर भाजपची सत्ता आली तर कोरोना व्हायरसवर प्रभावी असलेली लस बिहारमधील लोकांना मोफत देण्यात येईल.'

निर्मला सीतारमण म्हणाल्या की, 'जनतेने एनडीएला मोठ्या प्रमाणात मतदान करून जिंकून द्यावं. नितीशकुमार पुढच्या 5 वर्षांसाठी बिहारचे मुख्यमंत्री असतील. त्यांच्या नेतृत्त्वात बिहार भारताचे प्रगतशील आणि विकसित राज्य होील. मोदी सरकारने घरात मोफत गॅस सिलेंडरचं वितरण केलं आहे. गरीबांसाठी बँकेत खाती उघडली आणि कोरोना काळात प्रत्येक गरजूला दीड हजारांची आर्थिक मदतही दिली आहे.'

बिहार निवडणुकीसाठी भाजपचे 11 संकल्प :

1. कोरोनाच्या लसीचं विनामुल्य वितरण

2. विद्यालयं, उच्च शिक्षण विद्यालयं आणि संस्थांमध्ये 3 लाख नव्या शिक्षकांची नियुक्ती

3. बिहारला आयटी हबच्या स्वरुपात विकसित करणार

4. 1 कोटी महिलांना स्वावलंबी करणार

5. आरोग्य विभात 1 लाख नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध करणार

6. आता डाळींची खरेदीही एमएससी दरांनुसार करणार

7. 30 लाख लोकांना 2022 पर्यंत पक्की घरं देणार

8. बिहारमध्ये दुसऱ्या एम्स 2024 पर्यंत तयार करणार

9. 2 वर्षांमध्ये 15 नवीन खाजगी आणि कंफेड आधारित प्रक्रिया उद्योग तयार केले जातील.

10. पुढिल दोन वर्षांमध्ये इनलँड म्हणजेच, गोड पाण्यात माशांचं उत्पादन करणार

11. 10 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार

दरम्यान, बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबर अशी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. कोरोना काळात पार पडणारी ही सर्वात मोठी निवडणूक असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget