एक्स्प्लोर

योग दिनाला दांडी मारणारे नितीश कुमार शिवसेनेच्या वाटेनं चाललेत?

जमीन, पाणी, आकाश..योगदिनाच्या निमित्तानं भाजप सरकारनं सगळं अवकाश व्यापून टाकलं. पण अजूनही आपल्या मित्रपक्षांच्या हृदय त्यांना काबीज करता आलेला नाही. योगदिनाच्या कार्यक्रमांना नितीशकुमार यांनी आज दांडी मारली.

नवी दिल्ली: आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सेलिब्रेशनसाठी अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ, भाजपची राज्यं सरकारं कामाला लागली. मात्र दुसरीकडे बिहारमध्ये एनडीएचे साथीदार  आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मात्र या सगळ्यापासून स्वत:ला दूर ठेवलं. आता नितीश कुमार यांची ही नाराजी केवळ योगायोग आहे की 2019 ला पुन्हा शीर्षासन करत भाजपला झटका द्यायच्या तयारीत आहेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अवकाश व्यापलं, मित्रपक्षांचं हृदय जिंकणार? जमीन, पाणी, आकाश..योगदिनाच्या निमित्तानं भाजप सरकारनं सगळं अवकाश व्यापून टाकलं. पण अजूनही आपल्या मित्रपक्षांच्या हृदय त्यांना काबीज करता आलेला नाही. योगदिनाच्या कार्यक्रमांना नितीशकुमार यांनी आज दांडी मारली. केवळ तेच नव्हे, तर त्यांच्या पक्षाचा कुठलाच मंत्री, पदाधिकारी या योगाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसला नाही. गेल्या आठवड्यातली ही दुसरी वेळ आहे, ज्यावेळी नितीश कुमार यांनी भाजपसोबतचे मतभेद अशा पद्धतीनं जाहीरपणे उघड केलेत. दोनच दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी आपला पक्ष क्राईम, कम्युनिझम, करप्शनसोबत तडजोड करणार नाही असं विधान केलेलं होतं. हा इशारा होता भाजपच्या काही केंद्रीय मंत्र्यांना..जे बिहारमधलं वातावरण हिंसक बनवतायत. ‘योग करा, प्रदर्शन नको’ नितीशकुमार हे स्वत: रोज योगा करतात. योगाचं महत्व तेही जाणतात, लोकांना ऐकवतात. फक्त अशा जाहीर प्रदर्शनाला आपला विरोध आहे असं त्यांचं म्हणणं. तीन वर्षापूर्वी जेव्हा ते एनडीएत नव्हते तेव्हाही त्यांनी हे बोलून दाखवलं होतं. आताही ते यावर ठाम आहेत. भाजप अध्यक्ष मातोश्रीवर मुळात योग हा केवळ बहाणा आहे. त्यानिमित्तानं नितीशकुमार भाजपपासून योग्य अंतर ठेवायचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. टीडीपीनं साथ सोडलीय, काश्मीरमध्येही पीडीपी बाजूला पडलीय, शिवसेनेची किंमत समजल्यानं कधी नव्हे ते आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ‘मातोश्री’वर पोहचू लागलेत. त्यामुळे भाजपला आपली गरज आता जास्त आहे हे त्यांनी ओळखलं आहे. बिहारमध्ये मोठा भाऊ बिहारमधल्या लोकसभेच्या 40 जागा कशा लढवायच्या यावरुनही ठिणग्या पडू लागल्या आहेत. मागच्यावेळी भाजप आणि जेडीयू सोबत नव्हते. बिहारच्या 40 पैकी 23 जागा भाजपनं जिंकल्या, तर 6 जागा त्यांचे मित्रपक्ष पासवान, कुशवाह यांच्या पक्षानं जिंकल्या. जेडीयूला तेव्हा केवळ 2 जागा मिळाल्या होत्या. पण तरीही राज्यावर कब्जा असल्यानं बिहारमध्ये आपणच मोठे भाऊ आहोत असा दावा जेडीयूनं सुरु केलाय. पुन्हा महाआघाडीत येण्याची साद सर्वच मित्रपक्ष साथ सोडून चालल्यानं भाजपला वाकवण्याची हीच वेळ आहे हे बहुधा नितीशकुमार यांनी ओळखलंय. त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत 15 पेक्षा कमी जागा बिहारमध्ये लढणार नाही असं जेडीयूच्या नेत्यांनी जाहीर करुन टाकलंय. या दोघांमधली ही रस्सीखेच बघून तिकडे काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्तीसिंह गोहिल यांनीही नितीशकुमार यांना भाजपची साथ सोडून पुन्हा महाआघाडीत सामील होण्याची हाक दिलीय. नितीशकुमार वाजपेयींच्या काळातही एनडीएमध्ये होते. त्यांना भाजपपेक्षाही 2014 ला मोदींचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा जास्त खटकत होता. त्यासाठी त्यांनी प्रसंगी आपले कट्टर शत्रू लालू यादव यांचीही मदत घेतली. पण ही साथ फार काळ टिकली नाही. 2019 च्या निवडणुका जवळ येत असताना, एनडीएच्या गोटातल्या मित्रपक्षांची संख्या कमी होत चालली असताना, नितीशकुमार पुन्हा एकदा आपले रंग दाखवू लागलेत. त्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर चाललेत की काय असाही प्रश्न उपस्थित होतो.

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Police : पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
पहिल्यांदा दिल्लीत 18 ऑक्टोबरपर्यंत राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू अन् आता सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द; पोलिस आयुक्तांना कोणालाही ताब्यात घेत तीन महिने नजरकैदेत ठेवण्याचा अधिकार
Supreme Court : 'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण
'आम्ही हे असेच सोडून देऊ शकत नाही...' नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाची कठोर भूमिका, विद्यार्थ्यांच्या हिताबाबत गंभीर असल्याचे निरीक्षण, कोर्टात नेमकं काय घडलं?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई होते, मग दिल्लीत, मुंबईत...; राज ठाकरेंचा सवाल, आदेश देण्याऱ्यांवर रोख
Pune Crime News : पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
पुण्यातील पेठेत सकाळच्या सुमारास थरार! पूर्ववैमनस्यातून तरुणावर गोळ्या झाडल्या अन्...; हल्लेखोराला पोलिसांनी घेतले ताब्यात
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
'मी यांना घाबरत नाही, हिंदू असून इथंच मरून दफन होऊन जाईन...' सर आताच मारुन टाका, मारून टाका म्हणत दिल्ली पोलिसांच्या अत्याचाराला निधड्या छातीनं भिडलेला नागपूरचा भारत काय काय म्हणाला?
PM Modi Video: 'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
'मित्रों' नाही तर 'फ्रेंड्स', कॅमेरा ना अँगल, वापरला सेल्फी कॅमेरा! पंतप्रधान मोदींनी अवघ्या 3 मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला अन्..., Gen Zचं लक्ष वेधण्यासाठी केलेली कृती चर्चेत
Mumbai Police Student Girl Harassment: दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
दीपक बल्लाळ नावाच्या पोलिसाने तरुणीला आक्षेपार्ह पद्धतीने पकडलं; नेमकं काय घडलेलं?, पोलिसांनी सगळं सांगितलं!
Maharashtra kharif Sowing: महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
महाराष्ट्रात खरीप पेरणीचा वेग वाढला; किती टक्के पेरणी पूर्ण? सोयाबीन, तूर, मक्याचा पेरा कुठवर? वाचा एकाच क्लिकवर
Rahul Gandhi: दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
दिल्ली विद्यापीठाचा जंतरमंतर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना लांब राहण्याचा इशारा; राहुल गांधींचा गर्भित इशारा, 'तुमची हिंमतच कशी झाली धमकावण्याची? लिहून ठेवा, वेळ येईल तेव्हा तुम्हाला सोडणार नाही'
NEET Paper Leak Case News : NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
NEET पेपरफुटीची धग देशभरात; महाराष्ट्र झाला नीट पेपरफुटीचा अड्डा, कुलकर्णीपासून शिवराज मोटेगावकरपर्यंत 13 आरोपी; एकच पेपर देशभर कसा फिरला?
Embed widget