एक्स्प्लोर

बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने राजकारण तापलं

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघातील बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाने राजकारण चांगलंच तापलं आहे.

अलाहबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदार संघातील बनारस हिंदू विद्यापीठातील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाने राजकारण चांगलंच तापलं आहे. कारण, याप्रकरणी आता विरोधकांनी एकत्र येऊन उत्तर प्रदेशमधील योगी सरकारसह मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे. आज अलाहाबादमध्ये भाजप खासदार श्यामचरण गुप्ता यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. तसेच योगी आदित्यनाथ यांचा पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी केली. तर दुसरीकडे विद्यापीठ कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी मोर्चाकडून सरकारविरोधात निषेध व्यक्त केला. विद्यापीठ कॅम्पसमधील मोर्चात जवळपास एक हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. का सुरु आहे आंदोलन? बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या एका मुलीसोबत गुरुवार 21 सप्टेंबर रोजी छेडछाडीची घटना घडली. या छेडछाडीविरोधात बीएचयूमधील विद्यार्थीनींनी तीन दिवसांपासून आंदोलन सुरु होतं. आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींचा आरोप आहे की, त्यांच्या वसतीगृहाबाहेर काही मुलं उभे राहून, वस्तीगृहाच्या खिडक्यांवर दगडफेक करतात. तसेच दगडफेकीतील काही दगडांसोबत पत्रंही पाठवतात. शिवाय,वसतीगृहातील विद्यार्थिनींकडे पाहून अश्लिल चाळेही या मुलांकडून केले जातात. याला विरोध केल्यास विद्यार्थिनींसोबत दमदाटी केली जाते. BHU-protest शनिवारी रात्री नेमकं काय झालं? या विरोधात वसतीगृहातील विद्यार्थीनींनी एकत्रित येऊन, शनिवारी रात्री 11 वाजता कुलगुरुंच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलन सुरु केलं. पण आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींवर पोलिसांनीच लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही पत्रकार देखील जखमी झाले. तर एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांच्या लाठीचार्जमुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये दगडफेक आणि जाळपोळ सुरु केली. यात तिथं उभ्या केलेल्या एका दुचाकीला पेटवण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने उग्र रुप धारण केल्याने, विद्यापीठ प्रशासनाने रात्री 3.30 वाजता पोलीस महानिरिक्षक, पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांची कुलगुरु गिरीश चंद्र त्रिपाठी यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. यानंतर या घटनेचा सखोल तपास करुन, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं. आंदोलनात बाहेरच्या व्यक्तींचा सहभाग, कुलगुरुंचा आरोप या संपूर्ण प्रकरणावर एबीपी न्यूजशी बोलताना, कुलगुरु गिरीश त्रिपाठी यांनी सांगितलं की, “या आंदोलनात बाहेरच्या काही व्यक्ती सहभागी असून, ते विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. या आंदोलनात विद्यापीठातील विद्यार्थ्यांपेक्षा बाहेरच्या व्यक्ती सर्वात जास्त संख्येनं आहेत.” तसेच 21 सप्टेंबर रोजी एका विद्यार्थिनीशी छेडछाडीची तक्रार आपल्याकडे आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. विद्यापीठात 1500 पोलीस तैनात दरम्यान, बनारस हिंदू विद्यापीठात सध्या 1500 च्या आसपास पोलिसांसह जवान तैनात आहेत. तर 25 सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाशी संलग्नित क़ॉलेज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पंतप्रधान मोदींनीही या प्रकरणाची दखल घेऊन, याची संपूर्ण माहिती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून मागवली आहे. संबंधित बातम्या बीएचयूमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

महत्त्वाच्या बातम्या

Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
मुंबईचा वडापाव आवडला, दिल्लीच्या तरुणीने थेट विमानाने प्रवास केला, 20 रुपयांच्या वडापावसाठी खर्चीले तब्बल 15 हजार रुपये 
मुंबईचा वडापाव आवडला, दिल्लीच्या तरुणीने थेट विमानाने प्रवास केला, 20 रुपयांच्या वडापावसाठी खर्चीले तब्बल 15 हजार रुपये 
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 
तब्बल 28 वर्षानंतर विलक्षण योगायोग येणार, 3 ऑक्टोबरचा दिवस भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरणार, नेमकं काय घडणार? 
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू पाकिस्तानला जाणार, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारतीय खेळाडू पाकिस्तानला जाणार, दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार

व्हिडीओ

Manoj Jarange Andolan : लढाई आरक्षणाची चर्चा जरांगेंच्या भाषेची | Special Report ABP Majha
Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Dahihandi Row : 51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
51 हजारांचे बक्षीस दाखवून दिले फक्त 5 हजार रुपये! जळगावात गोविंदांचे भररस्त्यात आंदोलन
Non Veg In Durga Puja : आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
आमच्या लोकांनी काय खायचं हे बाहेरुन आलेल्या धर्मगुरूने शिकवू नये, भाजप प्रदेशाध्यक्षांचा बागेश्वर बाबांना टोला
MPSC Paper Leak : एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
एक जरी पुरावा दिला तरी क्षणभरही पदावर राहणार नाही; विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर MPSC अध्यक्ष भीमनवार यांची भूमिका
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
कुणबीच्या 58 लाख नोंदी ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध होणार, 36 जिल्ह्यात शिबीर; मनोज जरांगेंच्या आंदोनलाबाबत मंत्री विखे पाटलांनी दिली माहिती
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
Embed widget