एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेला आजपासून सुरुवात, 3 हजार 570 किमीचा पायी प्रवास 

गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु असणाऱ्या काँग्रेसच्या (congress) 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) आजपासून सुरुवात होणार आहे. खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा होणार आहे.

Congress Bharat Jodo Yatra : गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरु असणाऱ्या काँग्रेसच्या (congress) 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) आजपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वाखाली ही यात्रा होणार आहे. आज (7 सप्टेंबर)  कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू होणार आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ पहिली प्रार्थना सभा होणार आहे. यात्रा सुरु होण्यापूर्वी राहुल गांधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देणार आहेत. दरम्यान, ही यात्रा 12 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. दररोज 21 किमी चालल्यानंतर, 150 दिवसांत 3 हजार 570 किमी अंतर कापून ही काश्मीरमध्ये पोहोचणार आहे. 

भारत जोडो यात्रेचा संपूर्ण प्रवास हा राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली होणार असला तरी विविध ठिकाणाहून नागरिक या यात्रेत सहभागी होणार आहेत. दरम्यान, आज कन्याकुमारी येथील 'गांधी मंडपम' येथील कार्यक्रमादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन देखील उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसह सार्वजनिक रॅलीच्या ठिकाणी भेट देतील. तिथून यात्रेची सुरुवात होईल. कन्याकुमारी ते श्रीनगर असा 3 हजार 570 किमी लांबीच्या प्रवासाची औपचारिक सुरुवात रॅलीतून होईल. पदयात्रा 11 सप्टेंबर रोजी केरळला पोहोचणार आहे.

कसा असेल आजचा कार्यक्रम
 
राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेते 8 सप्टेंबरला सकाळी 7 वाजता पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
सकाळी 7 वाजता राहुल गांधी श्रीपेरंबदुर येथील राजीव गांधी स्मारकाला भेट देतील.
राजीव गांधी यांची हत्या झालेल्या श्रीपेरंबदूरला राहुल गांधी पहिल्यांदाच भेट देत आहेत.
दुपारी 3 वाजून 5 मिनीटांनी तिरुवल्लुवर स्मारकाला भेट देणार 
दुपारी 3.25 वाजता विवेकानंद स्मारकाला भेट देतील
दुपारी 3.50 वाजता कामराज स्मारकाला भेट देतील
कन्याकुमारी येथील गांधी मंडपम येथे सायंकाळी 4.10 वाजता सर्वधर्मीय प्रार्थना सभा होणार आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन सायंकाळी 4.30 वाजता गांधी मंडपममध्ये राहुल गांधींना तिरंगा सुपूर्द करतील.
4.40 वाजता सर्व नेते गांधी मंडपापासून काही अंतरावर असलेल्या सभेच्या ठिकाणी चालत जातील.
सायंकाळी 5 वाजता जाहीर सभेत भारत जोडो यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

काँग्रेसची  भारत जोडो यात्रा म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरुद्ध वातावरण निर्माण करण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. या यात्रेनिमित्त काँग्रेस पक्ष पुन्हा मजबूत करणे आणि देशभरात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणे, तसेच पक्षात आणखी तरुण कार्यकर्त्यांचा समावेश व्हावा यासाठी प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या:


       

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BJP Win Delhi Assembly Election 2025:27 वर्षानंतर भाजपनं दिल्ली कशी केली काबीज?विजयाचं श्रेय मोदींनाPM Modi Win Delhi Election Uncut Speech : आप, केजरीवाल ते अण्णा हजारे, दिल्ली विजयावर मोदींचं भाषण!Narendra Modi on Delhi Election | नारी शक्तीने दिल्लीत भाजपला आशीर्वाद दिला, मोदींची प्रतिक्रियाNarendra Modi on Delhi Election | आपने मेट्रोचं काम रखडून ठेवलं, नरेंद्र मोदींची केजरीवालांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
दिल्लीचा निकाल धक्कादायक! शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात डोंगराएवढं काम करुनही पराभव, रोहित पवारांनी व्यक्त केली खंत  
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीतही अहंकाराने माती केली; दिल्लीत भाजपचा वनवास संपवण्यास काँग्रेसचा 'हात'भार; केजरीवाल, सिसोदियांसह 'आप'च्या 12 जागांवर पराभवाचे कारण काँग्रेस
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
हिंमत असेल तर राहुल गांधींनी माझ्याविरोधात लढावं, त्यांना चितपट केल्याशिवाय राहणार नाही चंद्रशेखर बावनकुळेचं खुलं आव्हान
Kiran Samant : मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
मोठी बातमी : राजन साळवींना पक्षप्रवेश देताना एकनाथ शिंदे मला आणि उदय सामंताना विश्वासात घेतील : किरण सामंत
Delhi Election : 'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
'गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, मला हाकलून लावण्याचा प्रयत्न, पण..' सत्ता जाताच 'आप' खासदाराचा गंभीर आरोप
Delhi Election Result 2025 : कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
कुंभमेळ्याला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडलं नाही; नवनीत राणांचा प्रहार, केजरीवालांवरही हल्लाबोल
Delhi Assembly Election 2025: दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
दिल्लीत भाजपची तोफ वाजली पण तिकडे अजित पवारांचे सर्व 30 उमेदवार आपटले, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त
Rohit Pawar on Delhi Election : तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
तर भाजप 20 जागांवर देखील गेली नसती; आमदार रोहित पवारांनी दिल्लीचे 'गणित' समजावून सांगितलं!
Embed widget