एक्स्प्लोर

कोरोना काळातल्या अधिवेधशनासाठी अभूतपूर्व बदलांसह संसद सज्ज

कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन व्हावं यासाठी अनेक बदल करत सभागृहं सज्ज होतायत. संसदेच्या अधिवेशनात हे पहिल्यांदाच दिसणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज एकाचवेळी न होता, दोन शिफ्टमध्ये होणार आहे.

नवी दिल्ली : संसदेचं अधिवेशन होणार की नाही, होणार तर कसं होणार… कोरोनाच्या संकटानं निर्माण केलेल्या या प्रश्नांवर आता अखेरीस उत्तर मिळताना दिसतंय. कारण संसदेचं पावसाळी अधिवेशन सप्टेंबर महिन्यात घेण्याची तयारी सुरु झालीय. त्यासाठीची तयारी येत्या आठवड्यातच पूर्ण करा असे आदेश राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिले आहेत. पाहूयात कसं पार पडणार आहे संसदेचे अधिवेशन.

कोरोनाच्या संकटात होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनासाठी अभूतपूर्व बदल करण्यात आले आहेत. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज एकाचवेळी नाही तर दोन शिफ्टमध्ये होणार आहे. सभागृहाच्या कामकाजासाठी दोन्ही सभागृहं वापरली जाणार आहेत. त्यासाठीची सगळी तयारी आता अंतिम टप्प्यात येऊन पोहचली आहे.

23 मार्चला संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं. नियमानुसार दोन अधिवेशनांमध्ये 6 महिन्यांपेक्षा अधिक गॅप ठेवता येत नाही. त्यामुळे 23 सप्टेंबर आधी पावसाळी अधिवेशन घेणं नियमानुसार बंधनकारक आहे. सरकारनं सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच हे अधिवेशन घ्यायची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी अनेक अभूतपूर्व बदलही करण्यात आलेत.

कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन व्हावं यासाठी अनेक बदल करत सभागृहं सज्ज होतायत. संसदेच्या अधिवेशनात हे पहिल्यांदाच दिसणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज एकाचवेळी न होता, दोन शिफ्टमध्ये होणार आहे. एका सभागृहाच्या कामकाजासाठी दोन्ही सभागृहं वापरणार, त्यासाठी सभागृहात मोठे स्क्रीन्स, एका सभागृहातला आवाज दुसऱ्या ठिकाणी ऐकू जावा यासाठी ध्वनियंत्रणा सज्ज केली जातेय.

राज्यसभेच्या 243 सदस्यांपैकी 60 सदस्य हे सभागृहात बसतील, 51 सदस्य हे प्रेक्षक गॅलरीत बसतील, तर उर्वरीत 161 सदस्यांची आसनव्यवस्था ही लोकसभेच्या सदनात केली जाईल. सभागृहात एसी वापरताना त्यात विषाणूप्रतिबंधक यंत्रणाही वापरण्यात येणार आहे. अधिकारी आणि पत्रकार कक्षात एकावेळी केवळ 15 लोकांनाच प्रवेश मिळणार आहे. राज्यसभेच्या सभागृहात पंतप्रधान, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता या सगळ्यांच्या जागा चिन्हांकित केल्या जातील. तसेच राज्यसभेत माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, डॉ. मनमोहन सिंह यांच्याही जागा चिन्हांकित केल्या जातील.

सरकारनं 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा करतानाच काही महत्वाचे पायाभूत निर्णयही घेतले आहेत. त्यासाठी काही विधेयकंही या अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पावसाळी अधिवेशन सरकारसाठी महत्वाचं आहे. तर चीनच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधकही या अधिवेशनाची वाट पाहतायत. आता व्यवस्था जरी तयार होत असली तरी प्रत्यक्षात कामकाज किती प्रभावीपणे चालतं हे लवकरच कळेल.

महत्त्वाच्या बातम्या

एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget