एक्स्प्लोर

Assam Meghalaya: आसाम पोलिसांच्या फायरिंगमध्ये मेघालयाच्या पाच लोकांचा मृत्यू, हिंसेनंतर सात जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद 

आसाम-मेघालयाच्या सीमेवर घडलेल्या या घटनेत मेघालयचे पाच लोक आणि आसामच्या एका फॉरेस्ट गार्डसह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

Assam Meghalaya Border Clash: आसाम मेघालय या दोन राज्यांच्या सीमेवर मंगळवारी सकाळी फायरिंगची एक घटना घडली. या फायरिंगमध्ये मेघालयाच्या पाच जणांचा मृत्यू झाला. तसेच आसामच्या एका फॉरेस्ट गार्डचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे पुढच्या 48 तासांसाठी या भागातील सात जिल्ह्यातील इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. आसाम पोलिसांकडून जंगलातील लाकडांची तस्करी करणाऱ्या एका ट्रकवर कारवाई केली जात असताना ही घटना घडली. 

मेघालयच्या वेस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट जैंतिया हिल्स, ईस्ट खासी हिल्स, री-भोई, ईस्टर्न वेस्ट खासी हिल्स, वेस्ट खासी हिल्स आणि साऊथ वेस्ट खासी हिल्स या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनी सांगितलं की, मेघालयच्या पाच आणि आसामच्या एकाचा, असा सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये गंभीर असलेल्या लोकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

ट्रक न थांबल्याने फायरिंग 

आसामच्या सीमेवर आलेल्या एका ट्रकला थांबण्याचे आदेश आसाम वन विभागाकडून देण्यात आले होते, पण तो ट्रक न थांबल्याने आसाम वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी फायरिंग केली. त्या ट्रकचे टायर पंक्चर झाल्यानंतर चालक, त्याचा सहाय्यक आणि आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली. एक व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर वनविभागाने याची माहिती पोलिसांना दिली. 

या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी लोकांनी एकच गर्दी केली आणि अटक करण्यात आलेल्या आरोपींना सोडून देण्याची मागणी केली. या गर्दीने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना घेरलं. त्यानंतर गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये मेघालयच्या पाच लोकांचा मृत्यू झाला, तसेच एका वन कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही सर्व माहिती आसाम पोलिसांनी दिली. 

मेघालयाचे मुख्यमंत्री कोनरॅड संगमा यांनी माहिती देताना सांगितलं की, मेघालय पोलिसांच्या वतीनं या घटनेचा तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी आसामच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली आहे आणि त्यांनी सर्व सहकार्य देण्याचं आश्वासन दिलं आहे. 

आसाम आणि मेघालयमध्ये करार

आसाम आणि मेघालयाच्या दरम्यान असलेल्या 884 किमी सीमा असलेल्या 12 पैकी सहा आंतर-प्रादेशिक क्षेत्रांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी 29 मार्च रोजी एक करार करण्यात आला होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मेघालयचे मुख्यमंत्री कोनरॅड संगमा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आंतरराज्य सीमा समस्या सोडवण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.

काय आहे सीमावाद? 

आसाम आणि मेघालय सरकारने 884 किमी सीमा असलेल्या 12 पैकी सहा आंतर-प्रादेशिक क्षेत्रांमधील सीमा विवाद सोडवण्यासाठी मसुदा प्रस्ताव आणला होता. यानुसार 36.79 चौरस किमी जमिनीपैकी आसाम 18.51 चौरस किमी आणि उर्वरित 18.28 चौरस किमी मेघालयला देण्यात येईल.1972 मध्ये आसाममधून मेघालय वेगळे झाल्यानंतर हा जमिनीचा वाद सुरू झाला. तो या कराराने सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 



 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
अमेरिका-चीननंतर 2050 पर्यंत 'हा' देश सुपरपॉवर, चांगले संबंध ठेवा, ब्रिटनच्या माजी पंतप्रधानांनी कोणत्या देशाचं नाव घेतलं? भारत की पाकिस्तान? 
भारतासोबत चांगले संबंध ठेवा, 2050 पर्यंत सुपरपॉवर देशांच्या यादीत केवळ 3 देश असणार, टोनी ब्लेअर काय म्हणाले?
Jayant Patil: जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
जयंत पाटलांनी हटवला तुतारी वाजवणारा माणूस; विधानसभेपूर्वीच बदलला ट्विटरचा डीपी
Mumbai Accident: मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, बाबांसोबत शाळेला निघालेल्या चिमुकलीचा मृत्यू, जखमी बाप मृतदेह मांडीवर घेऊन भ्रमिष्टासारखा बसून राहिला
मुंबईत डंपरने बाईकला चिरडलं, लेकीने बाबाच्या मांडीवरच प्राण सोडले, वडील भ्रमिष्टासारखे रस्त्यावरच बसून राहिले
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
शरद पवारांचा मोठा डाव, आता तानाजी सावंतांच्या पुतण्याने ठोकला विधानसभेसाठी शड्डू, म्हणाले, तुतारीकडूनच निवडणूक लढवणार
Embed widget