एक्स्प्लोर

Anju Returned India : अंजू रिटर्न्स! सहा महिन्यानंतर भारतात परतली, पाकिस्तानमध्ये फेसबुक फ्रेंडसोबत केला होता विवाह

Anju Returned India : फेसबुक फ्रेंडसोबत विवाह करण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सहा महिन्यानंतर भारतात परतली आहे.

Anju Returned India :  पाकिस्तानी तरुणाच्या प्रेमात पडून भारत सोडून पाकिस्तानला गेलेली अंजू पुन्हा मायदेशी (Anju Returned India) परतली आहे. अंजू बुधवारी वाघा बॉर्डरमार्गे भारतात परतली. सहा महिन्यांपूर्वी ती भारतातून पाकिस्तानात पोहोचली होती. पाकिस्तानात दाखल झाल्यानंतर ती पाकिस्तानी मित्र नसरुल्लाहशी विवाहबद्ध झाली होती. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. 

 34 वर्षीय अंजू जुलैमध्ये तिच्या फेसबुक मित्र नसरुल्लाला भेटण्यासाठी पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथे गेली होती. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अंजूने इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर नसरुल्लासोबत लग्न केले होते. यासोबतच अंजूने तिचे नाव बदलून फातिमा ठेवले आहे. अंजूने पाकिस्तानात पोहोचून विवाह केला. त्यानंतर तिचा पती नसरुल्लाहने अंजू 20 ऑगस्ट रोजी पुन्हा भारतात परतणार असल्याचे म्हटले. 20 ऑगस्ट रोजी तिचा पाकिस्तानचा व्हिसा संपत होता. मात्र, विवाहाचे प्रकरण समोर आल्यानंतर ऑगस्टमध्ये पाकिस्तानने अंजूचा व्हिसा एक वर्षासाठी वाढवला होता.

अंजू पाकिस्तानात मानसिकदृष्ट्या अस्वस्थ?

सप्टेंबरमध्ये अंजूचा पती नसरुल्ला याने सांगितले की, त्याची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि तिला आपल्या मुलांची खूपच आठवण येत आहे. अंजू पुढील महिन्यात भारतात परतणार असल्याचे नसरुल्लाह यांनी सांगितले होते. नसरुल्लाह यांनी 'पीटीआय'ला सांगितले की, फातिमा (अंजू) पुढील महिन्यात भारतात परतत आहे. तिच्याकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही.


मुलांच्या आठवणीत झुरत होती अंजू?

नसरुल्लाह याने 'पीटीआय' या वृत्तसंस्थेशी फोनवर बोलताना सांगितले की, अंजूचे मानसिक आरोग्य बिघडू नये अशी माझी इच्छा आहे. तो म्हणाला की अंजूने आपल्या मुलांना भेटण्यासाठी तिच्या देशात जाणे चांगले आहे. पाकिस्तानात कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करून ती परत जाणार असल्याचे तिने सांगितले.

पतीला न सांगता पाकिस्तानात पळून गेली होती

ऑगस्टमध्ये लग्नानंतर अंजू आणि नसरुल्ला पहिल्यांदाच पेशावरमध्ये होते. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार,  त्यांनी पेशावरमधील दिवंगत दिलीप कुमार आणि शाहरुख खान यांसारख्या दिग्गज भारतीय चित्रपट अभिनेत्यांच्या वडिलोपार्जित घरांना भेट दिली. सोशल मीडियावर चर्चा रंगल्यानंतर अंजू म्हणाली की, पाकिस्तानात येण्यापूर्वी मला माहित नव्हते की मी येथे इतकी प्रसिद्ध होईल. अंजूचा विवाह राजस्थानमधील अरविंदसोबत झाला होता. त्यांना 15 वर्षांची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा आहे. आपण काही दिवसांसाठी जयपूरला जात असल्याचे तिने पती अरविंदला सांगितले होते. मात्र, नंतर ती पाकिस्तानात गेल्याचे तिच्या पतीला समजले.

 

महत्त्वाच्या बातम्या

UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget