![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणा; अमूलचं पंतप्रधान मोदींना आवाहन
अमूलसारख्या (Amul) मोठ्या दूध उत्पादक संस्थेच्या प्रतिमेला तडा द्यायचा आणि त्या माध्यमातून देशातले 10 कोटी रोजगार नष्ट करायचे हा पेटाचा ( PETA) डाव असल्याचा आरोप अमूलच्या वतीनं करण्यात आला आहे.
![भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणा; अमूलचं पंतप्रधान मोदींना आवाहन Amul urges PM to ban PETA says it is attempting to ruin livelihood of 10 cr people भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणा; अमूलचं पंतप्रधान मोदींना आवाहन](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/7/2019/01/03144455/4-milk-price-will-increase-this-year-amul-parent-company.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या पेटा अर्थात पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स आणि भारतातील सर्वात मोठी सहकारी तत्वावर दूध उत्पादन करणारी कंपनी अमूल यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. पेटा या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घातला असून त्यावर लवकरात लवकर बंदी आणावी अशी मागणी अमूलचे व्हाईस चेअरमन वालमजी हंबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
वेगन दूध तयार करा हा पेटाचा सल्ला म्हणजे भारतातील सहकारी दूध उत्पादक संस्था संपवण्याचं आणि देशातील रोजगार नष्ट करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप अमूलने केला आहे. अमूलसारख्या मोठ्या दूध उत्पादक संस्थेच्या प्रतिमेला तडा द्यायचा आणि त्या माध्यमातून देशातले 10 कोटी रोजगार नष्ट करायचे हा पेटाचा डाव असल्याचा आरोपही अमूलच्या वतीनं करण्यात आला आहे.
वेगन मिल्क निर्मिती करावी, पेटाचा अमूलला सल्ला
पेटाने अमूल या भारतातल्या सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला एक अजब सल्ला दिला आहे. अमूल या कंपनीनं आता गाईच्या दुधाच्या ऐवजी वेगन मिल्क उत्पादनाकडे वळावं, त्यातच भविष्य आहे असं पेटानं एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे. .
पेटाच्या या पत्राला प्रत्युत्तर देताना अमूल कंपनीचे सीईओ आर. एस. सोढी म्हणाले की, "जर अमूल कंपनीनं गाईच्या दुधाचे उत्पादन थांबवलं तर भारतातल्या 10 कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. आपल्या सल्यामुळं त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन नष्ट होईल. आपल्या परंपरेतच दुधाचा वापर आहे. त्यामुळे वेगन दुधाच्या मागे लागणे योग्य नाही."
वेगन दुधाचे उत्पागन सुरु केल्यास शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत, उलट यामुळे प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबतील आणि दुधापासून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. भारतात गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुभतं ठेवलं जातं, जेव्हा त्यांचे शरीर दूध देणे बंद करते तेव्हा त्यांना कत्तलखान्यात विकलं जातं आणि मांस मिळवलं जातं', असं पेटा इंडियाचं म्हणणं आहे.
पेटा इंडिया ने सांगितलेलं वेगन दूध म्हणजे नेमकं काय ?
वेगन दुधाचे अनेक प्रकार सध्या जगात उपलब्ध आहेत. वेगन दूध हे नारळ, काजू, बदाम आणि मुख्यतः सोया पासून बनवलं जातं. सध्या बाजारात अनेक नागरिक या दुधाला पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा वेगन दूध हे जास्त फायदेशीर असतं असा दावा पेटा इंडियानं केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli : 'अंडही खातो...', म्हणणाऱ्या विगन विराटचे हे शब्द ऐकून क्रीडारसिकांची तीव्र नाराजी
- Maharashtra News : देवेंद्र फडणवीसांपाठोपाठ एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला; मुंबईतील निवासस्थानी भेट
- चोक्सीला भारतात पाठवण्यासाठी वचनबद्ध, अँटिग्वाच्या पंतप्रधानांचा पुनरुच्चार; 'त्या' महिलेबद्दल गूढ मात्र कायम
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)