एक्स्प्लोर

Agnipath Protest : तिन्ही लष्करप्रमुख आज PM नरेंद्र मोदी यांची भेट घेणार, अग्निपथ योजनेची देणार माहिती

3 Service Chiefs To Meet PM : लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख 21 जून रोजी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत.

3 Service Chiefs To Meet PM : लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख 21 जून रोजी म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वतंत्रपणे भेट घेणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान मोदींना अग्निपथ भरती योजनेची माहिती देतील. सरकारी सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की, लष्करप्रमुख उद्या स्वतंत्रपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील आणि त्यांना अग्निपथ योजनेबद्दल माहिती देतील. अग्निपथ योजना गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आली होती आणि विरोधानंतर, केंद्र सरकारने सशस्त्र दलांमध्ये नवीन भरती योजनेबाबत शंका दूर करण्यासाठी गेल्या काही दिवसांत अनेक बदल आणि सवलती जाहीर केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींना अग्निपथ भरती योजनेची माहिती देणार
भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख आज पंतप्रधान यांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना अग्निपथ योजना आणि त्याच्या अंमलबजावणीबाबत माहिती देणार आहे. लष्करातील भरतीच्या या नव्या योजनेच्या विरोधात अनेक राज्यांमध्ये निदर्शने होत असताना ही बैठक होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या तिन्ही शाखांचे प्रमुख पंतप्रधानांना या योजनेच्या अंमलबजावणीबाबत माहिती देणार आहेत. अग्निपथ लष्करी भरती योजना 14 जून रोजी जाहीर करण्यात आली होती, त्यानंतर देशाच्या विविध भागात हिंसक निदर्शने होत आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 14 जून रोजी या योजनेचा शुभारंभ करताना सांगितले की, ही एक परिवर्तनकारी योजना आहे आणि ती देशाच्या सशस्त्र दलांना युवा प्रोफाइल देईल.

PM मोदी म्हणाले, हे निर्णय राष्ट्र उभारणीत मदत करतील
योजनेचे नाव न घेता किंवा विरोधाचा उल्लेख न करता, पंतप्रधान मोदींनी रविवारी सांगितले होते की, चांगल्या हेतूने आणलेल्या अनेक चांगल्या योजना राजकीय रंगात अडकतात, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. सोमवारी, पीएम मोदी बेंगळुरूमध्ये म्हणाले की, सरकारने घेतलेले काही निर्णय अयोग्य आणि वाईट वाटू शकतात, परंतु हे निर्णय नंतर राष्ट्र उभारणीत मदत करतील. दरम्यान, केंद्र सरकारच्या या योजनेचा देशभरात निषेध होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांसोबतच राजकीय जगतातील लोकही याला विरोध करत आहेत. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अग्निपथ योजनेला सरकारची नवी चूक म्हटले आहे. दुसरीकडे, लष्कराने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लष्करासाठी हे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे.

भरती झालेल्यांपैकी 75% लोकांना मायदेशी परतावे लागणार आहे
अग्निपथ योजनेत केंद्र सरकारने 17 ते 21 वयोगटातील तरुणांना चार वर्षांसाठी सैन्यात भरती करण्याची तरतूद केली आहे. चार वर्षांनंतर भरती झालेल्या अग्निवीरांपैकी 25 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवण्यात येईल, मात्र 75 टक्के कर्मचाऱ्यांना घरी परतावे लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर सरकारने या योजनेत मोठे बदल केले असून नोकरीदरम्यान अग्निवीरचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपये नुकसानभरपाई देण्यात येईल, असे रविवारी जाहीर केले.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget