Ahmedabad Plane Crash: बापाची सावली हरवली म्हणून अंत्यसंस्कारासाठी लंडनहून आला, पण लेकावरही काळाचा घाला; तिकडं खुशबूच्या संसाराची चार महिन्यात राखरांगोळी, डाॅक्टर पतीची भेट अधुरीच
Ahmedabad Plane Crash: विमानात एकूण 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, त्यापैकी फक्त एकच व्यक्ती वाचली. या विमानात बसलेल्या अनेकांच्या कथेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.

Ahmedabad Plane Crash: गुजरातमधील अहमदाबाद येथे एक हृदयद्रावक विमान अपघात घडला, ज्यामध्ये एअर इंडियाचे विमान टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. या भीषण अपघातात अनेक वैद्यकीय विद्यार्थ्यांसह 235 जणांचा मृत्यू झाला. दुपारी 1:39 वाजता सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केले तेव्हा ही घटना घडली. विमानात एकूण 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते, त्यापैकी फक्त एकच व्यक्ती वाचली. या विमानात बसलेल्या अनेकांच्या कथेनं संपूर्ण देशाला हादरवून टाकले आहे.
वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी आला, पण..
या अपघातात लॉरेन्स डॅनियल ख्रिश्चनचाही मृत्यू झाला. तो लंडनमध्ये काम करत होता. लॉरेन्स त्याच्या वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी गुजरातमधील मणिनगर येथे आला होता. लॉरेन्स 12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाने लंडनला परतत होता. त्याचा सीट नंबर 37 होता. त्याची आई त्याला विमानतळावर निरोप देण्यासाठी आली होती.
खुशबूचे 4 महिन्यांपूर्वी लग्न झाले होते
राजस्थानातील बालोत्रा जिल्ह्यातील रहिवासी खुशबू कंवर तिच्या पतीला भेटण्यासाठी लंडनला जात होती, तिचा पती तिथे डॉक्टर आहे. 18 जानेवारी रोजी खुशबूचे लग्न झाले होते. तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. तिने घरून विमानतळावर जाताना हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. या व्हिडिओमध्ये खुशबू भावनिक दिसत आहे. ती तिच्या पालकांना, भावंडांना आणि नातेवाईकांना मिठी मारते. ती हात जोडून गाडीत बसून त्यांना निरोप देत आहे.
राजस्थान की खुशबू राजपुरोहित जिनकी शादी मात्र 4 महीने पहले हुई थी जिसके पति लंदन रहते थे
— 🇮🇳Jitendra pratap singh🇮🇳 (@jpsin1) June 12, 2025
उन्होंने अपनी पत्नी का पूरा डॉक्यूमेंट भेजा ताकि उनकी पत्नी भी उनके साथ लंदन जाकर रहे
पत्नी जब अपने घर से अहमदाबाद के लिए निकली तब पूरे परिवार को गले लगाकर निकली
मन में पति के पास जाने… pic.twitter.com/ckpLFmGYOT
आईला विश्वास बसत नाही, मुलगी आता नाही
एअर होस्टेस नगांथोई शर्मा कोंगब्रैलाटपमचाही विमान अपघातात मृत्यू झाला. नगांथोई मणिपूरमधील अवांग लेकेईची रहिवासी होती. नगांथोईची बहीण गीतांजली म्हणाली, आम्ही तीन बहिणी आहोत. तिचे स्वप्न एअर होस्टेस बनण्याचे होते. परिसरात इंटरनेट बंदी असल्याने आम्ही व्हिडिओ चॅट करू शकत नव्हतो. तिने मेसेज केला की ती लंडनला जात आहे आणि आता आम्ही संपर्क करू शकणार नाही. तिने सांगितले होते की ती 15 जून रोजी परत येईल. मी तिला शुभेच्छा दिल्या. नंतर, आम्हाला एका ओळखीच्या व्यक्तीच्या फोनवरून या घटनेची माहिती मिळाली.
आग्रा दाम्पत्य सहलीसाठी इंग्लंडला जात होते
आग्रा दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. नीरज लवानिया आणि त्याची पत्नी अपर्णा लवानिया हे आग्राच्या अकोला शहरातील रहिवासी होते. नीरजचा मोठा भाऊ सतीश लवानिया म्हणाला, नीरज वडोदरा येथील एका खासगी कंपनीत काम करत होता. तो अनेक वर्षांपूर्वी तिथे शिफ्ट झाला होता. तो त्याची पत्नी अपर्णाला सहलीसाठी लंडनला घेऊन जात होता. त्यांचा 10 दिवसांचा दौरा होता. आई तिच्या मुलीला भेटायला जात होती
गुजरातमधील बबन येथील अंजू शर्मा यांचाही अपघातात मृत्यू झाला. लग्नानंतर गेल्या साडेतीन दशकांपासून वडोदरा येथे राहत असलेली अंजू तिची मोठी मुलगी निम्मी शर्माला भेटण्यासाठी लंडनला जात होती. अंजू तिच्या मुलीसोबत 6 महिने लंडनमध्ये राहणार होती. अंजू शर्माला दोन मुली आहेत. धाकटी मुलगी हनी वडोदरा येथे राहते. अंजूचा भाऊ मिलन शर्मा हा चित्रपट अभिनेता आहे. अंजूचे वृद्ध पालक गावात राहतात. आजारपणामुळे त्यांना माहिती देण्यात आली नव्हती. अंजूचा विवाह 1990 मध्ये पटियाला येथील रहिवासी पवन शर्माशी झाला होता. पवन वडोदरा येथे एक व्यापारी होता. 5 वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.
इतर महत्वाच्या बातम्या



















