(Source: Dainik Bhaskar)
PM Modi on Agriculture Budget : केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चे उद्दिष्ट शेतीला आधुनिक आणि स्मार्ट बनविणे आहे
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चे उद्दिष्ट शेतीला आधुनिक आणि स्मार्ट बनविणे आहे
PM Modi on Agriculture Budget : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की, केंद्रीय अर्थसंकल्प 2022 चे उद्दिष्ट शेतीला आधुनिक आणि स्मार्ट बनवणे आहे. कृषी क्षेत्रातील अर्थसंकल्पीय घोषणांवर भाषण देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, " अवघ्या 6 वर्षांत अनेक पटींनी शेती अर्थसंकल्प वाढला आहे. शेतकर्यांचे कृषी कर्ज 7 वर्षांत 2.5 पटीने वाढले आहे. असे मोदी म्हणाले. ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार मोदींनी माहिती दिली की,"कोविड दरम्यान एका विशेष मोहिमेने 3 कोटी शेतकऱ्यांना KCC सुविधांशी जोडले,"
ही योजना देशातील लहान शेतकर्यांसाठी मोठा आधार
पंतप्रधानांनी 3 वर्षांपूर्वी याच दिवशी PM किसान सन्मान निधी लाँच केले होते. “आज ही योजना देशातील लहान शेतकर्यांसाठी मोठा आधार बनली आहे,” पंतप्रधान म्हणाले, "एका क्लिकवर 10-12 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे येणे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिल्याने आज सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठही 11 हजार कोटी रुपयांची झाली आहे, सेंद्रिय उत्पादनांची निर्यातही 6 वर्षांत 2,000 कोटी रुपयांवरून 7,000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे,' असे मोदी म्हणाले.
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 बद्दल बोलताना पीएम मोदी म्हणाले की, हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांना आधुनिक आणि स्मार्ट बनवण्यासाठी आहे. यामध्ये गंगा नदीच्या काठावर 5 किमी क्षेत्रात नैसर्गिक शेतीवर प्रक्रिया करणे, कृषी आणि बागायती शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान देणे, खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी तेलबियांवर लक्ष केंद्रित करणे यांचा समावेश आहे. ते म्हणाले, “पीएम गति शक्ती अंतर्गत शेतीशी संबंधित उत्पादनांच्या वाहतुकीसाठी नवीन लॉजिस्टिक सुविधा निर्माण करणे हे देखील बजेटचे चौथे लक्ष्य आहे. आणखी एक उपाय म्हणजे कृषी-कचरा व्यवस्थापन,शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
माती परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी आवाहन
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी दीड लाख पोस्ट ऑफिसमध्ये नियमित बँक सुविधा उपलब्ध करून देणे हा सहावा उपाय असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटचा म्हणजे समकालीन कौशल्ये आणि मानव संसाधन विकासासाठी कृषी संशोधन आणि शिक्षणाचा अभ्यासक्रम बदलणे. दरम्यान, पंतप्रधानांनी माती परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले