एक्स्प्लोर

विशेष रेल्वेनंतर आता एअर इंडियाची देशांतर्गत विशेष विमान सेवा! मंगळवार, 19 मे पासून?

19 मे ते 2 जून दरम्यान होणाऱ्या विशेष हवाई फेऱ्या या प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्येच होणार आहेत. दिल्लीहून वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी ही उड्डाणे होण्याची शक्यता आहे.

मुंबई : एअर इंडिया ही सार्वजनिक क्षेतातली विमान कंपनी आता 19 मे ते 2 जून दरम्यान विशेष विमान सेवा पुरवणार आहे. चौथ्या लॉकडाऊनमध्ये विमानसेवा सुरु होऊ शकते, याचे संकेत गेल्या काही दिवसांपासून मिळत आहेत. कालपासून भारतीय रेल्वेने देशातल्या महत्वाच्या 15 ठिकाणी विशेष सेवा सुरु केल्यानंतर विमानसेवा कधी सुरु होणार याविषयी उत्सुकता वाढली होती. त्यानुसार सरकारी मालकी असलेल्या एअर इंडियाने अपेक्षेप्रमाणेच काही निवडक शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने प्रकाशित केलंय.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांसाठी ही विशेष सेवा असणार आहे. मात्र या सेवेसाठी कसलीही सवलत मिळणार नाही. या सेवेसाठीची तिकिटविक्री अजून सुरु झालेली नाही. भारतीय रेल्वेमार्फत सुरु करण्यात आलेल्या श्रमिक स्पेशल ट्रेनचा प्रवास खर्च वेगवेगळ्या राज्य सरकारांनी उचलला. तर कालपासून सुरु करण्यात आलेल्या विशेष ट्रेनच्या तिकीटांची विक्री फक्त ऑनलाईन होणार आहे.

19 मे ते 2 जून दरम्यान होणारी विशेष हवाई फेऱ्या या प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्येच होणार आहेत. दिल्लीहून वेगवेगळ्या राज्यांच्या राजधानीच्या ठिकाणी ही उड्डाणे होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जयपूर, बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद आणि लखनौ या राजधानीच्या शहरांचा समावेश आहे. राजधानी नसलेल्या अन्य शहरांमध्ये कोची, अमृतसर, विजयवाडा आणि गया या शहरांचा समावेश आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या मोठ्या घोषणा; कर्मचाऱ्यांना, उद्योग क्षेत्राला दिलासा

त्याशिवाय मुंबईहून विशाखापट्टणम, कोची, अहमदाबाद, बंगळुरू, विजयवाडा आणि हैदराबाद या प्रमुख शहरात विशेष विमानसेवा सुरु होऊ शकते. एअर इंडियाने या विमानप्रवासाची सर्व तयारी पूर्ण केली आहे, मात्र अजून त्यासाठी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाची अनुमती नसल्यामुळे पूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.

जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्याच्या मोहीमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. परदेशातले हे भारतीय मायदेशी आल्यानंतर त्यांना सोईचं होईल, अशा पद्धतीने देशांतर्गत विमान वाहतुकीचं वेळापत्रक तयार करण्याला एअर इंडिया प्राधान्य देत असल्याचं सांगितलं जातंय.

FM Nirmala Sitharaman | सूक्ष्म आणि लघु उद्योगांना गॅरंटीशिवाय 3 लाख कोटींचं कर्जाचं पॅकेज :अर्थमंत्री निर्मला सीतारामण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget