एक्स्प्लोर

Afghanistan : अपहरणाची भीती, संपत आलेले इंधन आणि हवेत 12 चकरा; एअर इंडियाच्या 'त्या' विमानाचा थरार

Taliban : पाकिस्तानमार्गे काबुलला गेलेले हे विमान विमानतळावर उतरवण्यात आलं आणि जर विमानतळावर तालिबान्यांचे नियंत्रण आलं असतं तर 124 प्रवासी असलेल्या भारतीय विमानाचे अपहरण होण्याचा जास्त धोका होता.

नवी दिल्ली : विमान काबुलमध्ये उतरल्यास अपहरणाची भीती, न उतरल्यास 124 भारतीयांचा जीव धोक्यात, लॅन्डिंग क्लियरन्ससाठी आकाशात 12 चकरा, त्यामुळे इंधन संपण्याची भीती. अशा सर्व अडचणींचा सामना करत एयर इंडियाचे अफगाणिस्तानला गेलेलं AI-243 हे शेवटचं विमान अखेर काल रात्री सुखरुपपणे भारतात दाखल झालं. 

अफगाणिस्तानमधील भारतीयांना सुखरुपपणे परत आणण्यासाठी पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर करुन गेलेले एअर इंडियाचे AI-243 हे शेवटचे विमान काल रात्री उशीरा दिल्लीमध्ये पोहोचलं आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. अफगाणिस्तानवर आता तालिबान्यांनी नियंत्रण प्रस्थापित केल्यानंतर काबुल ते दिल्ली दरम्यानचं हे एअर इंडियाचे शेवटचे उड्डाण होतं. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले असून राष्ट्रपती भवनावर आता तालिबानी दहशतवाद्यांचा कब्जा आहे. 

पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर आणि इंधन संपण्याचा धोका
तालिबानी दहशतवादी संघटनेने काबुल ताब्यात घेतलं असताना त्या शहरातील भारतीय नागरिकांना सुखरुपपणे परत आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले होते. तिथे फसलेल्या जवळपास 124 भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाच्या AI-243 या शेवटच्या विमानाने रविवारी दुपारी तीनच्या दरम्यान उड्डाण केलं. त्यासाठी पाकिस्तानच्या हवाई मार्गाचा वापर करण्यात आला. 

एअर इंडियाचे विमान काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं पण त्याला लॅन्डिंगची परवानगी देण्यात येत नव्हती. एक वेळ अशी आली की आता एअर इंडियाचे विमान काबुल विमानतळावर उतरु शकेल की नाही याबाबत शंका उपस्थित झाली. त्यामुळे त्या विमानाला आकाशात जवळपास 12 चकरा माराव्या लागल्या. या दरम्यान विमानातील इंधन संपण्याचा धोका निर्माण झाला होता. 

विमानाचे अपहरण होण्याचा धोका
तशा स्थितीत जर विमान काबुल विमानतळावर उतरवण्यात आलं आणि जर विमानतळावर तालिबान्यांचे नियंत्रण आले असते तर मदतीसाठी गेलेल्या भारतीय विमानाचे अपहरण होण्याचा जास्त धोका होता. आकाशात 12 चकरा मारल्यानंतर, सर्वकाही सुरक्षित असल्याचं समजल्यानंतर शेवटी एअर इंडियाच्या त्या विमानाला लॅन्डिंगची परवानगी देण्यात आली. 

एअर इंडियाचे हे विमान भारतीयांच्या मदतीसाठी गेलेले शेवटचे विमान होते. अफगाणिस्तानमधील तालिबान्यांच्या मदतीने लष्कर-ए-तोयबा आणि भारतात सक्रिय असलेल्या इतर दहशतवादी संघटना या कंदहारमधील भारतीय दूतावासाला लक्ष्य करु शकतात अशी शक्यता गुप्तचर खात्याने वर्तवली होती. त्यामुळे या आधीच भारताने आपल्या दूतावासातील अधिकाऱ्यांना विशेष विमानाने सुरक्षित भारतात आणलं आहे. अफगाणिस्तानच्या अनेक भागात प्रचंड हिंसाचार पाहता या आधीच व्यावसायिक उड्डाणे बंद करण्यात आली होती. देशातील व्यावसायिक विमान उड्डाण बंद होण्याआधी भारतात निघून या असा सल्ला भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तिथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांना दिला होता. 

अफगाणिस्तामधील परिस्थीती लक्षात घेता भारत सरकारने एअर इंडियाला अद्याप दोन विमानं तयारीत ठेवायला सांगितलं आहे. 

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget