एक्स्प्लोर

नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामागील 10 कारणं

बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप केला. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी स्पष्टपणे राजीनाम्याचं कारण सांगितलं नसलं, तरी त्यामागे अनेक कारणं आहेत.

नवी दिल्ली : बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत नितीश कुमार यांनी बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप केला. राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी स्पष्टपणे राजीनाम्याचं कारण सांगितलं नसलं, तरी त्यामागे अनेक कारणं आहेत. नितीश कुमार यांच्या राजीनाम्यामागील 10 कारणं
  1. आरजेडी प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर हॉटेल घोटाळ्याचा आरोप झाला. त्यानंतर भाजपने सातत्याने नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आजच्या राजकीय भूकंपाची सुरुवात इथूच सुरु झाली होती.
  2. तेजस्वी यादव यांच्या राजीनाम्याची मागणी जेडीयूकडूनही झाली होती. याच मुद्द्यावरुन आरजेडी आणि जेडीयूमधील संबंध ताणले गेले. दोन्ही पक्षांकडून टोकाची विधानंही समोर आली.
  3. आधीच जेडीयू आणि आरजेडीमध्ये तणाव होता. त्यात नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांना विश्वासात न घेताच एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला.
  4. राजीनामा न देण्यावर तेजस्वी यादव कायम होते. एवढंच नव्हे, तर तेजस्वी यादव यांनी आपल्यावरील आरोपांचं स्पष्टीकरणही दिलं नाही.
  5. लालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांच्या भूमिकेबाबत नितीश कुमार यांनी दिल्लीत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेऊन चर्चा केली. मात्र, या चर्चेचाही काहीच फायदा झाला नाही.
  6. आरजेडीच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. यानंतर लालूप्रसाद यादव यांनी भूमिका जाहीर केली की, तेजस्वी यादव राजीनामा देणार नाहीत आणि ते स्पष्टीकरणही देणार नाहीत.
  7. तेजस्वी यादव स्वत:हून राजीनामा देणार नाहीत, हे स्पष्ट होतं. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांची उपमुख्यमंत्रिपदावरुन हकालपट्टी करणं, नितीश कुमार यांना राजकीयदृष्ट्य फायदेशीर नव्हतं. कारण तसं झालं असतं, तर लालूप्रसाद यादव यांनी याचा राजकीय फायदा उचलला असता. त्यामुळे नितीश कुमार यांच्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता.
  8. नितीश कुमार हे स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने, त्यांच्याच प्रतिमेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. आपली स्वच्छ प्रतिमा जपणं, हे नितीश कुमार यांच्यासमोरील मोठं आव्हान होतं.
  9. बिहारमध्ये सुशासनाच्या घोषणेवर विजय प्राप्त करणारे नितीश कुमार यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांसोबत सरकार चालवणं तसंही कठीण होत चाललं होतं. कारण त्यांच्या मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्र्यांवरच भ्रष्टाचाराचे आरोप होते.
  10. सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे नितीश कुमार हे आपली स्वच्छ प्रतिमा जपू पाहत होते. आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी मुख्यमंत्रिपदाचीही त्यांना पर्वा नव्हती. आताही राजीनामा देत त्यांनी हाच संदेश दिला आहे की, पदासाठी तत्त्वांची तडजोड केली जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Singh Badal : सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, सुनियोजित राजकीय षड्यंत्राचा आरोप
सुखबीर सिंह बादल यांच्यावरील हल्ल्याबाबत हरसिमरत कौर यांचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाल्या?
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
धक्कादायक! ऑटो आणि कंटेनरची समोरासमोर धडक, भीषण अपघातात सात जणांचा जागीच अंत, अनेकजण जखमी
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?
देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी सोन्याला किती होता दर? आजचे दर काय? 80 वर्षात नेमकी किती झाली वाढ?

व्हिडीओ

Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
Embed widget