एक्स्प्लोर

village does not sell milk : महाराष्ट्रातलं असं गाव जिथं दुधाची विक्री केली जात नाही, वाचा नेमका प्रकार काय?

Village Does Not Sell Milk : महाराष्ट्रात एक असंही गाव आहे, की जिथं दुधाचे उत्पादन घेतलं जातं मात्र, त्या गावात दुधाची विक्री केली जात नाही.

Village Does Not Sell Milk : शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडं (Milk Business) बघितलं जातं. मात्र महाराष्ट्रात एक असंही गाव आहे, की जिथं दुधाचे उत्पादन घेतलं जातं. मात्र, त्या गावात दुधाची विक्री केली जात नाही. या गावात प्रत्येकाच्या घरी दुध देणारी जनावरे आहेत. मात्र ते दुधाची विक्री करत नाहीत. हे गाव आहे हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील येळेगाव गवळी (Yelegaon Gawali). नेमकी या गावात दुधाची विक्री का केली जात नाही? त्यामागचे कारण काय? याबद्दलची माहिती पाहुयात...
  
गावातील नागरिक स्वतः ला श्रीकृष्णाचे वंशज मानतात

शेतीला एक महत्त्वाचा पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाकडं बघितलं जातं. परंतू, हिंगोली जिह्यातील येळेगाव गवळी या गावात दुधाचे उत्पादन घेतलं जातं पण दुधाची विक्री केली जात नाही. ज्या घरी दूधाचे उत्पादन घेतलं जात नाही, त्या घरात दूध मोफत दिलं जातं. या गावातील नागरिक स्वतः ला श्रीकृष्णाचे वंशज मानतात. गोकुळातील दूध विक्रीला श्रीकृष्णाचा विरोध होता. त्यामुळं गवळणीच्या मडक्यात असलेले दूध मथुरेला जाऊ नये यासाठी श्रीकृष्णाने गवळणीच्या कमरेवरील दुधाचे घडे फोडले होते. दूध मथुरेला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले होते. हीच परंपरा हिंगोली जिल्ह्यातील येळेगाव गवळी या गावातील नागरिकांनी कायम ठेवली आहे. तीन हजार लोकसंख्या असलेलं येळेगाव गवळी या गावात प्रत्येक घरी दुग्धजन्य जनावरे आहेत. परंतू या गावात एकही नागरिक दूध विकत नाही. 


village does not sell milk :  महाराष्ट्रातलं असं गाव जिथं दुधाची विक्री केली जात नाही, वाचा नेमका प्रकार काय?

श्रीकृष्णाने दिलेला संदेश तंतोतंत पाळणारं गाव

येळेगाव गवळी येथील ग्रामस्थ स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज मानतात. त्यामुळं ही परंपरा ग्रामस्थ आजपर्यंत कायम ठेवून आहेत. आपलं गोकुळ सुदृढ आणि निरोगी राहावं म्हणून श्रीकृष्णाने दिलेला संदेश तंतोतंत पाळणारे हे येळेगाव गवळी गाव आहे. 

गावातील गवळ्यांना नंद राजाचे वंशज असल्याचे संबोधलं जातं

येळेगाव गवळी हे गाव संपूर्ण गवळी समाजाचे आहे. या गावात दोनशे ते सव्वादोनशे घरं ही गवळ्याची आहेत. या गावातील गवळ्यांना नंद राजाचे वंशज असल्याचे संबोधले जाते. त्यावरुनचं गावाचे नाव देखील येळेगाव गवळी पडले असल्याची माहिती गावकरी राजाभाऊ मंदारे यांनी दिली. संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची ख्याती आहे. गवळी समाज आहे पण या गावात एकाही घरी दूध विकले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget