Nagpur : प्रियकराच्या विरहात प्रेयसीचीही आत्महत्या, म्हणाली आम्ही स्वर्गात सुखाने नांदू
प्रियकराचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे विरहात असलेली प्रेयसी नैराश्यात होती. तिने ब्लेडने चिरे मारल्याच्या खुणा हात आणि मनगटावर होत्या. तिने उंबराच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूरः दिवसरात्र एखाद्याशी बोलणे, त्याला प्रत्येक गोष्टी सांगणे. त्याचेही ऐकूण घेणे अशी सवय झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावर जगणे म्हणजे जणू एक शिक्षाच वाटते. याच परिस्थितीमुळे नैराश्यात गेलेल्या एका तरुणीने नागपूरातील अंबाझरी परिसरातील उंबराच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तीन महिन्यापूर्वी या तरुणीच्या प्रियकराचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे ती नैराश्यात होती. त्याची आठवण येत असल्याने तिने यापूर्वीही जीव देणार असल्याचे कुटुंबियांना बोलून दाखवले होते. मात्र नुकतेच तिने टोकाचे पाऊल उचलून आपली जीवनयात्रा संपविली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाझरी गार्डन जवळील, सौभाग्य रेस्टारेंटच्या गच्चीला लागून असलेल्या उंबराच्या झाडाला एका तरुणीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तरुणीने हाताला व मनगटाला धारदार ब्लेडने चिरे मारलेले होते. पोलिसांना तिच्याजवळ एक चिठ्ठी मिळाली. त्यावरून तिची ओळख पटली. तिचे नाव अनामिका दंदरे असल्याचे पोलिसांना समजले. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत अनामिकाने 'जीवनाला कंटाळली असून माझ्या आत्महत्येला कोणाला जबाबदार धरू नये' असे लिहीलेले होते. तरुणी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात इंजिनीअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होती.
BJP Parliamentary Board Meeting: उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार निवडीसाठी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक; शाह, गडकरी यांच्यासह अनेक नेते पोहोचले
चिठ्ठीवरुन पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनामिकाचा प्रियकराचा तीन महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती नैराश्यात होती. तेव्हापासून तिच्या वागण्यात फरक पडला होता. तिने यापूर्वीही जगण्यात अर्थ नसल्याचे सांगून आत्महत्या करण्याबाबत विचार बोलून दाखवला होता. आईवडिलांना एकुलती असलेली अनामिका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षांला शिक्षण घेत होती. याप्रकरणी हॉटेलमालक कमलेश मनोहर राऊत (वय 42) यांनी दिलेल्या सूचनेवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. प्रियकराच्या जाण्याने ती पूर्णपणे खचली होती. त्यामुळे मला जगण्याची इच्छा नाही. आता स्वर्गात गेलेल्या माझ्या अक्षयसोबत मी सुखाने जगू शकेल, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी लिहून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
महत्त्वाच्या बातम्या





















