एक्स्प्लोर

पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा

शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आजही शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑफलाईन पीकविमा भरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल पीकविमा भरण्याची शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता.

मुंबई : शेतकऱ्यांना पीकविमा अर्ज भरता यावा यासाठी सरकारने आणखी एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आजही बिगर कर्जदार शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑफलाईन पीकविम्यासाठी अर्ज भरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल पीकविमा भरण्याची शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता. दरम्यान आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत फक्त पीकविम्यासाठी अर्ज भरावा लागणार आहे. यावेळी कोणतीही रक्कम भरण्याची आवश्यकता नाही. पीकविमा योजनेला राज्य सरकारनं मुदतवाढ दिली असली, तरीही त्याला केंद्र सरकारनं अद्याप हिरवा कंदील देण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकारनं आज 5 ऑगस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ फक्त पीकविम्याच्या अर्जासाठी आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची दोन आठवड्यांमध्ये छाननी केली जाईल. अर्जांची छाननी झाल्यानंतरच पीकविम्याचा हफ्ता शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. अर्जांची छाननी आणि पीकविम्याच्या भरण्यानंतर शेतकरी पीकविम्यासाठी पात्र असेल. पीकविम्यासाठी दोनवेळा मुदतवाढ 31 जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी बँकांसमोर रांगा लावल्या होत्या. मात्र अनेक शेतकऱ्यांना या मुदतीत पीकविमा भरणं शक्य झाला नाही. त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भात राज्य सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आज 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं शेतकऱ्यांना गेल्या चार दिवसात अर्ज भरता आलेले नाहीत. खालील अटी आणि शर्तींवर आज पीकविमा भरता येणार आहे. पीकविमा आज संध्याकाळी 5 पर्यंत भरता येणार, शेतकऱ्यांना दिलासा सर्व्हर डाऊन, शेतकऱ्यांना मनस्ताप पीक विमा भरण्याची काल 4 ऑगस्ट ही शेवटची मुदत होती, मात्र पीकविम्याची वेबसाईट डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. पीकविम्यासाठी सरकारनं 31 जुलै ही मुदत दिली होती. मात्र अनेक शेतकऱ्यांना आपला अर्ज या मुदतीत दाखल करता आला नाही, त्यामुळे केंद्राकडे विनंती करत 4 ऑगस्टपर्यंत पीकविमा भरण्याची मुदतवाढ मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली होती. आता आजही शेतकऱ्यांना पीकविमा भरता येणार आहे, पण संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पीकविमा भरण्याचं आव्हान शेतकऱ्यांसमोर असेल. याआधी म्हणजे 31 जुलै 2017 रोजी सरकारने 5 ऑगस्टपर्यंत पीक विम्याची मुदत वाढवली होती. मात्र, 1 ऑगस्ट 2017 रोजी सुधारित शासन निर्णय सरकारने जारी केला आणि 4 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरण्याची मुदत वाढवल्याचे जाहीर केलं. बिगर कर्जदार शेतकरी आज 4 ऑगस्टपर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने पीक विम्याच्या पोर्टलवर अर्ज भरु शकतील किंवा स्वत: शेतकऱ्यांनी थेट भरलेले अर्जही स्वीकारले जातील. याचसोबत शेतकऱ्यांकडे 31 जुलै किंवा त्यापूर्वीचं पीक पेरणी प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर, बँका शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारू शकणार नाहीत. सरकारच्या जनसुविधा केंद्रांवर अर्ज स्वीकारले जातील. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा नियमित प्रक्रियेनुसार भरला जातो. याआधी पीक विम्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2017 ही होती. मात्र, बँकांबाहेर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागू लागल्या, त्याशिवाय ऑफलाईन-ऑनलाईनच्या घोळामुळे आणखीच अडथळे निर्माण झाले. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने पीक विमा भरण्याची मुदत वाढवली होती. संबंधित बातमी : पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून आर्थिक पिळवणूक पीकविम्याचे अर्ज स्वीकारण्याची मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
ABP Majha Top 10, 6 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 6 July 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
Shraddha Kapoors Eetha: 'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
'ईठा'बाबत मोठी अपडेट! श्रद्धा कपूरसोबत स्क्रीन शेअर करणार 'ही' भोजपुरी अभिनेत्री; भूमिकेबाबत सस्पेन्स कायम
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Sanju Samson : वैभव सूर्यवंशीची एंट्री होताच संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
संजू सॅमसनला घरचा रस्ता, झिम्बाब्वेविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, श्रेयस अय्यरचा लाडका विकेटकीपर संघात दाखल
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
ह्रदयद्रावक... भिवंडीत पावसाच्या पाण्यामुळे नाल्यात वाहून गेला चिमुकला; अहिल्यानगरमध्ये करंट लागून चिमुकली ठार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Embed widget