एक्स्प्लोर

Child Marraige: कोरोनामुळे जगभरात बालविवाहाच्या प्रमाणात वाढ, भारतात 2.66 कोटी बालविवाहाच्या घटना; UNICEF च्या अहवालातून स्पष्ट

Child Marraige: कोरोना काळात अविकसित आणि विकसनशील देशांमध्ये, खासकरुन दक्षिण आशियामध्ये मुलींची कमी वयात लग्न झाल्याचं युनिसेफच्या अहवालात म्हटलं आहे.

Child Marraige: कोरोना काळात जगामध्ये अनेक उलथापालथी झाल्याचं दिसून आलं, त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक समस्या निर्माण झाल्याचं दिसून आलं. या काळात दक्षिण आशियातील घसरलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे मुलींची लग्न कमी वयात झाल्याचं युनिसेफने त्याच्या एका अहवालात म्हटलं आहे. या काळात शाळा बंद असल्यामुळे ही परिस्थिती ओढावल्याचं या अहवालात म्हटलं आहे. भारतात या काळात 2.66 कोटी मुलींची बालविवाह करण्यात आल्याची धक्कादायक माहिती या अहवालात देण्यात आली आहे. 

युनिसेफच्या (unisef) माहितीनुसार, दक्षिण आशियातील बालविवाह केलेल्या मुलींची संख्या 29 कोटी असून ही संख्या जगातील बालविवाहाच्या संख्येच्या 45 टक्के इतकी आहे. त्यामुळे जगातील बालविवाह रोखण्यासाठी जे काही प्रयत्न करण्यात आले होते ते अयशस्वी झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युनिसेफच्या प्रादेशिक संचालक नोआला स्किनर यांनी सांगितले की, दक्षिण आशियातील वाढती बालविवाहाची समस्या ही अत्यंत निराशाजनक असून त्यावर योग्य ते नियंत्रण आणलं जावं अशी मागणी करण्यात येत आहे. 

अभ्यासात असे देखील समोर आले की, कोविड महामारीमुळे कुटुंबावर आर्थिक संकटे आली, त्यामुळे घरखर्च चालवणे देखील कठीण झाले. म्हणून अल्पवयातच मुलींचे लग्न लावून देण्याकडे या कुटुंबांचा कल वाढला.

नेपाळमध्ये मुलींच्या लग्नाचे वय 20 वर्षे आहे, तर भारत आणि श्रीलंकेत 18 आणि अफगणिस्तान, पाकिस्तानात 16 वर्षे आहे. 

आर्थिक परिस्थिती ठरली बालविवाहाचे महत्त्वाचे कारण..

युनिसेफ संस्थेने यासंदर्भात सामान्य नागरिकांशी देखील चर्चा केली. यावर लोकांनी प्रतिक्रिया देत, गरिबीविरोधात सुरक्षा देणे, प्रत्येक मुलीच्या शिक्षणाच्या अधिकाराचे रक्षण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बालविवाह केलेल्या मुलींना सर्वात जास्त धोका हा प्रसुती दरम्यान असतो. याशिवाय या मुलींना घरगुती हिंसाचार देखील सहन करावा लागतो. 

प्यु रिसर्चच्या वृत्तानुसार, अमेरिकेसह 117 देशांत अजूनही बालविवाह केले जातात. प्यु रिसर्चने बालविवाह ही एक आतंरराष्ट्रीय समस्या आहे असे ठळकपणे नमूद केलं आहे.

सर्वात जास्त बालविवाह या देशांत होतात.. 

भारत

बालविवाहाची संख्या: 2,66,10,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 47 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 21 / मुलगी - 18

इथियोपिया 
बालविवाहाची संख्या: 19,74,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 41 टक्के

इथियोपियात अशी देखील प्रथा आहे की, चुलत भाऊ आपल्या बहिणीचे अपहरण करून जबरदस्तीने तिच्याशी  लग्न करू शकतो. त्यामुळे पाच पैकी एका तरी मुलीचे 18 वयाच्या आतच लग्न केले जाते. 

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 18 / मुलगी 18

ब्राझील

बालविवाहाची संख्या:  29,28,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 36 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 18 / मुलगी - 18 - पालकांच्या संमतीने - 16

नायजेरिया 

बालविवाहाची संख्या: 33,06,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 43 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 18/ मुलगी - 18

बांग्लादेश

बालविवाहाची संख्या: 39,31,000
18 व्या वर्षी लग्न करणाऱ्या मुलींचे प्रमाण: 52 टक्के

लग्न करण्याचे कायदेशीर वय: मुलगा - 21 / मुलगी - 18

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Vidya Balan Viral Marathi Reel: विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
विद्या बालनचा मराठी गाण्यावर ठसकेबाज अंदाज; दादा कोंडकेंच्या चित्रपटातील गाण्यावर तयार केला रिल, नेटकरी घायाळ
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, पैसा, करिअर, नोकरीत नशिबाचे दार उघडणार? साप्ताहिक राशीभविष्य
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
Sanjay Shirsat: अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...
अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget