एक्स्प्लोर

Talathi Bharti : पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत अन् औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र; गोंधळ संपता संपेना

Talathi Bharti : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे.

मुंबई : राज्यात तलाठी भरतीसाठी (Talathi Bharti) परीक्षा सुरू असून, या परीक्षेतील विघ्न काही संपता संपत नसल्याचे चित्र आहे.  नाशिकमध्ये (Nashik) तलाठी भरतीच्या परीक्षेत हायटेक कॉपीचा प्रकार उघडकीस आल्यावर, आज सर्व्हरच्या तांत्रिक बिघाडामुळे परीक्षा वेळेवर सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे तलाठी भरतीच्या परीक्षेसाठी पुण्याच्या विद्यार्थ्याचा औरंगाबादेत (Aurangabad) अन् औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना चक्क नागपूर, अमरावतीत परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. 

राज्य सरकारकडून तलाठ्यांच्या जागा भरण्यासाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली असून, यासाठी महसूल विभागांतर्गत गट क संवर्गातील 4 हजार 644 तलाठी पदांच्या भरती केली जात आहे. ज्यात भरतीचा पहिला टप्पा 17 ऑगस्टपासून सुरू झाला आहे. मात्र, पहिल्याच टप्प्यात परीक्षार्थीचे परीक्षा केंद्रच कुठेच्या कुठे आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. अर्ज करताना तीन केंद्र निवडण्याची संधी होती. परंतु, निवड केलेले परीक्षा केंद्र विद्यार्थ्यांना देण्यात आलेच नसल्याचा आरोप होत आहे.  औरंगाबाद आणि नांदेड या दोन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना चक्क नागपूर आणि अमरावती जिल्ह्यातील परीक्षा केंद्र् देण्यात आले आहे. तर पुण्यातील विद्यार्थ्यांना औरंगाबादमध्ये परीक्षा केंद्र देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. 

रिटर्न तिकीट रद्द होणार, विद्यार्थ्यांवर खर्चाचा बोजा 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे. त्यामुळे पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर,नाशिक शहरात राहून परीक्षेची तयारी करणाऱ्या हे विद्यार्थी मोजक्याच पैशात दिवस काढतात. त्यात आजच्या तलाठी परीक्षेसाठी कुठेच्या कुठे परीक्षा केंद्र आल्याने अनेकांनी पैश्याची बचतीसाठी रिटर्नचे तिकीट देखील काढले होते. मात्र, 9 वाजता सुरु होणारी परीक्षा 11 वाजेपर्यंत सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे रिटर्नचे तिकीट रद्द होणार आहे. त्यामुळे त्यांना परत जातांना पुन्हा तिकीट काढावे लागणार आहे. रूपा-रुपयांची पदरमोड करून हे विद्यार्थी दिवस काढत असतात. त्यामुळे आजच्या  भोंगळ कारभाराचा आर्थिक फटका त्यांना बसणार आहे. 

आता कोणावर कारवाई करणार? 

राज्यात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेत केंद्रावर येणाऱ्या विध्यार्थ्यांना वेळेत हजर राहण्याचे निर्देश दिले जातात. तसेच एक मिनटांचा उशीर झाल्यावर त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात नाही. मात्र, आता तलाठी परीक्षा केंद्रावर चक्क दोन तास उशिरा परीक्षा घेतली जात आहे. त्यामुळे आता कोणावर कारवाई करणार असा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे. तसेच मुलांचे होणारे नुकसान कोण भरून देणार असाही प्रश्न विचारला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Talathi Exam: तलाठी भरती परीक्षेत मोठं विघ्न, सर्व्हर डाऊन झाल्यानं लाखो परीक्षार्थी खोळंबले

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: वॉरंट घेऊन आले अन्... परराज्यातील पोलिसांवर दगडांचा मारा; गांजा तस्कराला पळवलं, छ. संभाजीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या
वॉरंट घेऊन आले अन्... परराज्यातील पोलिसांवर दगडांचा मारा; गांजा तस्कराला पळवलं, छ. संभाजीनगरमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
तांब्यात डोकं अडकताच माकडाचं पिल्लू जीवाच्या आकांताने फिरू लागलं; प्राणीमित्राच्या कुशलतेनं अखेर 'मोकळा श्वास'
छत्रपती संभाजीनगर हादरलं! गळाभेट घेण्याचा बहाणा करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर हादरलं! गळाभेट घेण्याचा बहाणा करत शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर जीवघेणा हल्ला, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha
Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News: वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
वडिलांसह भावाची कोर्टात संपवल्याची कबुली, मृतदेहही जाळला; 20 दिवसांनी शिवानी म्हणाली, मी जिवंत..., पोलिसांसह सगळे चक्रावले, नेमकं प्रकरण काय?
Vaibhav Sooryavanshi RR vs GT IPL 2026: पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
पराभव होताच चेहरा उतरला, डोळ्यात अश्रू; जडेजाला मनातलं बोलत बसला, वैभव सूर्यवंशीला पाहून सगळे भावूक, PHOTO
Pune Hooch Tragedy : पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
पुण्यात विषारी दारूमुळे 14 जणांचा मृत्यू; पोलीस आयुक्तांची मोठी कारवाई, हडपसरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 3 पोलीस निलंबित
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Embed widget