एक्स्प्लोर

Marathwada Rain Update: अवकाळीमुळे मराठवाड्यात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू, 62 हजार 480 हेक्टर पिकांचे नुकसान

Marathwada Rain Update: अवकाळीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आकडा  33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 

Marathwada Rain Update: राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसताना पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टरवरील पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहेत. तर याच अवकाळी पावसामुळे विभागात वेगवेगळ्या दुर्घटनेत सहा लोकांचा मृत्यू  झाला असून, 36 जण जखमी झाले आहेत.  तसेच 76 लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. गेल्या 24 तासात सरासरी 10. 44 मिलिमीटर पावसाची नोंद विभागात झाली आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आकडा  33 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. 

अवकाळी पावसामुळे सर्वाधिक फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. 1 मार्च ते 19 मार्च दरम्यान मराठवाड्यात एकूण 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले आहे. ज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9 हजार 314 शेतकऱ्यांचे एकूण 7 हजार 762.50 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील 4 हजार 500 शेतकऱ्यांचे एकूण 2 हजार 400 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 286 शेतकऱ्यांचे एकूण 5 हजार 604 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या नांदेड जिल्ह्यातील 19  हजार 899 शेतकऱ्यांचे एकूण 23 हजार 554 हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 286   शेतकऱ्यांचे एकूण 5 हजार 604  हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे.  तर लातूर जिल्ह्यातील 16  हजार 842  शेतकऱ्यांचे एकूण 11 हजार 794  हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे. 

पंचनामे रखडले! 

अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील 62 हजार 480 हेक्टरचे नुकसान झाले आहे. मात्र असे असताना प्रशासनाकडून पंचनामे होताना दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या संपात तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह इतर महसूल कर्मचारी सहभागी आहेत. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे वेळेवर पंचनामे न झाल्यास याचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. तसेच वेळेत नुकसानभरपाई देखील मिळणार नाही. 

रब्बीचे हंगामदेखील हातून गेले...

गेली तीन वर्षांपासून मराठवाड्यात सतत अतिवृष्टी पाहायला मिळत आहे. तर यंदाही खरीप सुरु होताच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे किमान रब्बीच्या हंगामात तरी काही हाती येईल अशी अपेक्षा बळीराजाला लागली होती. परंतु रब्बीच्या हंगामात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. त्यातच नुकसानीचे पंचनामे देखील होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Marathwada Rain: मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही गारपीट, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rohit Sharma Meet Family at Wankhede : विश्वविजेत्या लेकाला जेव्हा आईबाप भेटले, रोहितची मायेची भेटHingoli Manoj Jarange : मनोज जरांगे मराठवाड्याचा दौऱ्यावर, हिंगोलीतून शांतता रॅलीने दौऱ्याची सुरुवातTop News in 9 Seconds | 9 सेकंदात 9 बातम्या | 05 July 2024 | ABP MajhaRahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
अभिनेते नव्हे तर अभिनेत्रींमुळे ब्लॉकबस्टर झालेत 'हे' दाक्षिणात्य चित्रपट, ओटीटीवर पाहता येतील
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
Embed widget