एक्स्प्लोर

Bageshwar Dham : वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या 'बागेश्वर बाबां'चा संभाजीनगरात दरबार भरणार

Bageshwar Dham : पुढील महिन्यात म्हणजेच, 5, 6, 7 जानेवारी बागेश्वर धाम यांचा छत्रपती संभाजीनगर शहरात दरबार भरणार आहेत.

Bageshwar Dham in Chhatrapati Sambhajinagar : अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आणि नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे बागेश्वर धाम (Bageshwar Dham) यांचा दरबार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये (Chhatrapati Sambhajinagar) भरणार आहे. दोन महिन्यांनी म्हणजेच, 5, 6, 7 जानेवारी हा दरबार शहरात भरणार आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मध्यप्रदेशातील छत्रपूर येथे जाऊन बागेश्वर महाराज यांची भेट घेतली होती. तसेच, बागेश्वर धाम यांना छत्रपती संभाजीनगर शहरात दरबार भरवण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता बागेश्वर धाम यांनी 5, 6, 7 जानेवारीची तारीख दिली असल्याची माहिती कराड यांच्या कार्यालयातून कळवण्यात आली आहे. 

बागेश्वर धाम हे मध्य प्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यातील गारा गावातील आहे. दरम्यान, भागवत कराड मागील सहा महिन्यापासून बागेश्वर धाम यांच्या संपर्कात होते. तसेच, त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे दरबार भरवण्याचे निमंत्रणही दिले होते. त्यांचे निमंत्रण बागेश्वर बाबा यांनी स्वीकारले असून, जानेवारी महिन्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे ते येणार आहे .

बागेश्वर धाम यांचा भव्य दिव्य असा स्वरूपाचा हा कार्यक्रम असणार असून, तब्बल 100 एकर परिसरावरती भव्य मंडप आणि किमान दहा लाख नागरिकांना भाविकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच, तीन दिवस भरगच्च कार्यक्रम असून या तीन दिवसांमध्ये बाबांचा दरबार भरणार आहे. सध्या सण उत्सवाचे दिवस सुरू असून, दिवाळीच्या अगोदरच बागेश्वर धाम छत्रपती संभाजीनगर येथे येत आहे. 

साईबाबांबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य

बागेश्वर धाम अनकेदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहतात. यापूर्वी देखील त्यांनी साईबाबांबाबत असेच वक्तव्य केल्याने चर्चेत आले होते. यावेळी बोलतांना धीरेंद्र शास्त्री म्हणाले होते की, "साईबाबा हे देव नाहीत. साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठं स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचं स्थान दिलेलं नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही."असे बागेश्वर धाम म्हणाले होते. विशेष म्हणजे त्यांच्या याच वक्तव्यानंतर मुंबईच्या वांद्रे पोलिसांत त्यांच्याविरोधात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा विरोध?

यापूर्वी राज्यात झालेल्या बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नेहमी विरोध केला आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईला लागून असलेल्या मीरा रोड परिसरात आयोजित करण्यात आलेल्या त्यांच्या कार्यक्रमाला देखील असाच विरोध झाला होता. सोबतच, महाराष्ट्र काँग्रेसने देखील यावेळी विरोध केला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांना हत्येची धमकी; आरोपी अटकेत

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad : कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
कारखाना समिती बरखास्त करणार, ठाकरेंच्या उमेदवाराला नोटीस; देवयानी डोनगावकरांनी उमेदवारी मागे का घेतली? Inside Story
Shivsena : ठाकरे गटाला आधीच कुणकुण, अखेरच्या क्षणी डाव पलटला, छ. संभाजीनगरमध्ये देवयानी डोनगावकरांची ऐनवेळी माघार, पण अपक्षाने इज्जत राखली
ठाकरे गटाला आधीच कुणकुण, अखेरच्या क्षणी डाव पलटला, छ. संभाजीनगरमध्ये देवयानी डोनगावकरांची ऐनवेळी माघार, पण अपक्षाने इज्जत राखली
Maharashtra Rain Updates: मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून केरळमध्ये दाखल, महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Abdul Sattar: शिंदेंच्या आदेशानंतर अब्दुल सत्तारांच्या मुलाची विधान परिषदेतून माघार, आता जिल्हा बँकेसाठी ठोकला शड्डू; मंत्री अतुल सावेंचीही एन्ट्री, नेमकं काय घडलं?
शिंदेंच्या आदेशानंतर अब्दुल सत्तारांच्या मुलाची विधान परिषदेतून माघार, आता जिल्हा बँकेसाठी ठोकला शड्डू; मंत्री अतुल सावेंचीही एन्ट्री, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
Embed widget