![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
Uddhav Thackeray : आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचां अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल.
![आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया Ashok Chavan join BJP to hide Adarsh scam Uddhav Thackeray first reaction on Ashok Chavan BJP entry Maharashtra politics आदर्श घोटाळा लपवण्यासाठी अशोक चव्हाण भाजपमध्ये; उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/12/7e780c71d90f0c1ee7b1b8e14090a6f61707728260756737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला असून, ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रीया दिली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी निवडणूक आयोगाने चोरांच्या हातात दिली. आता काँग्रेस देखील अशोक चव्हाण यांच्या हातात देणार की काय? असा टोला ठाकरे यांनी लगावला. तर, अशोक चव्हाण यांचा आदर्श घोटाळा लपविण्यासाठी ते भाजपमध्ये गेले की काय असे म्हणत त्यांनी चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
भाजप भाडोत्री लोकं घेत असून सतरंज्या उचलणाऱ्याच्या बोकांडी बसवत आहेत. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफाडी करत आहेत. आणखीन काही वर्षानंतर भाजपचां अध्यक्ष सुद्धा काँग्रेसमधून आलेला असेल. एकाने शिवसेना भाजपच्या ताब्यात दिली. मी आव्हान केले असून, पोलिसांना बाजूला ठेवा लोकांना गोळा करू आणि विचारू शिवसेना कुणाची आहे. मला अशोक चव्हाण यांचे आश्चर्य वाटत आहे. आजपर्यंत सगळ्या जागा वाटपात वाटून घेण्यासाठी प्रयत्न करत होते आणि आता गेले, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अशोक चव्हाण यांच्यासह भाजपवर हल्लाबोल केला आहे.
सगळे भाडोत्री आणले जात आहे...
दरम्यान पुढे बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ तुम्ही भ्रष्टचार करा आणि आम्ही तुम्हाला आमदार खासदार करणार. तुमच्या योजना भारत सरकारच्या आहेत की मोदी सरकारच्या? सगळे भाडोत्री आणले जात आहे. मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांना फसवण्याचा प्रयत्न करून कर्जमुक्ती जाहीर करू शकलो असतो. पण मी तसे केले नाही. 80 कोटी लोकांना फुकट धान्य देत असाल, तर मग गरिबी कुणाची हटवली. देशातील सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
नाना पटोलेंची प्रतिक्रिया..
"काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू.
इतर महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)