Bhandara News : शिवसैनिकानं स्वत:च्या रक्तानं लिहिलं उद्धव ठाकरेंना पत्र, एकनिष्ठ असल्याची दिली हमी
एका कट्टर शिवसैनिकाने चक्क स्वत:च्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी पत्र लिहिले आहे.
Bhandara News : एका कट्टर शिवसैनिकाने चक्क स्वत:च्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी पत्र लिहिले आहे. हे पत्र लिहून त्यानं आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्याची हमी दिली आहे. सध्या हे पत्र भंडारा (Bhandara ) जिल्ह्यात चांगलचं व्हायरल होत आहे. पवन खवास (Pavan Khavas) असे या शिवसैनिकाचे नाव आहे. या पत्राद्वारे त्यांनी शिवसेना पक्षासोबत आपण आजही निष्ठेने सोबत राहू अशा आशयाचे भावनिक पत्र त्यांनी लिहिलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या उलथापालथ झाली आहे. सातत्यानं नवनवीन घडामोडी सुरु आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन गटात खरी शिवसेना आमचीच असे दावे सुरु आहेत. त्यामुळं शिवसेनेची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे. शिवसेनेला आता खरी शिवसेना हीच आहे, हे सिध्द करण्याचं आव्हान आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत प्रत्येक तालुक्यातून शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र लिहून देण्याचं आवाहन केलं होतं. याच आवाहनाला साथ देत तुमसर तालुक्यातील परसवाडा येथील युवा शिवसैनिक पवन खवास तरुणानं स्वतःच्या रक्तानं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षनिष्ठेनं प्रेमपूर्वक निष्ठेनं पत्र लिहलं आहे.
पवन खवास या तरुणान रक्तानं लिहलेलं हे पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. त्या पत्राची शिवसैनिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. सदर पत्राची दखल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुध्दा घेतली आहे. पवन खवास या शिवसैनिकावर पक्ष निष्ठेचे कौतुकाची थाप दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळं शिवसेनेत फुट पडली आहे. एक नाही दोन नाही तर तब्बल 40 आमदारांनी त्यांच्याविरोधात बंड केले आहे. एवढेच नाहीतर आता खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळं शिवसेनेकडून आता सावध पवित्रा घेतला जात आहे. आतापर्यंत शिवबंधन बांधले जात होते पण यानंतर शिवसैनिकांना एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रच द्यावे लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असल्याचे ते प्रतिज्ञापत्र असणार आहे. बंडखोरांच्या भूमिकेवरुन आता असे बदल पक्षामध्ये केले जात आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रति मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. असा मजकूर या पत्रावर असणार आहे. त्यामुळे कोणी पक्ष सोडला तरी त्यापेक्षा वेगळा काही रोल घेऊ नये म्हणून ही काळजी पक्षाकडून घेतली जात आहे. आमदार, माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखाप्रमुखांना अशाप्रकारचे पत्र द्यावे लागणार आहे. भविष्यात कोणी पक्षाबाबत वेगळा असा दावा करु नये शिवाय शिवसैनिकांची वज्रमूठ कायम आहे हे दाखवून देण्यासाठी हा फंडा राबवला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Shiv Sena : शिवसेना- शिंदे गटाच्या वादाचा पहिला अंक नाशिकमधून, शिवसेना पदाधिकारी हल्ल्यात शिंदे गटाचा हात?
- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना 'शिवसेना पक्षप्रमुख' म्हणणं टाळलं! बंडखोरांनी मात्र थेटच म्हटलं...
- Exclusive : 'मुंबई ते सुरत एकनाथ शिंदेंच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, पण...' आमदार शहाजीबापू पाटील यांची स्फोटक मुलाखत
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा






















