एक्स्प्लोर

Ajit Pawar : 'राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो'; अजित पवारांचे बीडच्या सभेत वक्तव्य

Ajit Pawar : बीड जिल्ह्यात झालेल्या सभेत अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे.

बीड : अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकरणात यावरून जोरदार चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान आता बीड जिल्ह्यात झालेल्या सभेत अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे. 'राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो' असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, राजकीय जीवनात चढउतार येतात, त्याना सामोरे जायचं असतं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. बीडच्या सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे की, आम्ही जरी युतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ म्हणाले. त्यामुळे अलीकडच्या काही सभेत अजित पवार जातीय सलोख्या बाबत हे सातत्यानं बोलताना पाहिला मिळत आहेत. 

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, विरोधक सातत्याने दिशाभूल करत आहेत. कांदा प्रश्न झाला त्यावेळी आम्ही धनंजय मुंडे यांना दिल्लीत जाऊन पियुष गोयल यांची भेट घेण्याचे सांगितले. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने पियूष गोयल यांच्यशी बोलतं होतो. त्यानंतर 2410 किलो प्रती क्विंटल भाव काढला. 2 लाख क्विंटल कांदा आम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असल्याचं अजित पवार म्हणाले. तर, शेतकऱ्याचा शिवारात पाणी आल्याशिवाय शांत बसणार नाही. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही. 1 लाख कोटी रुपये लागले तरी चालतील मराठवाड्याला पाणी द्यायचा निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजचे आहे. म्हणुन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले. 

धनंजय मुंडेंवर कायम संघर्ष करण्याची वेळ आली

काहीजणांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परंतू, मी त्यावर बोलणार नाही. मी काम करणारा माणूस आहे. कामाला पहाटे सुरुवात करतो, काम करण अपली पँशन आहे. 2012 पासुन धनंजय माझ्यासोबत काम करत आहे. कायम त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ आली. 2014 पासुन आदर्श विरोधी पक्षनेता म्हणुन काम करतो. महाविकास आघाडीत मंत्री असतांना त्याने वाड्यावस्त्यांची जातीवादी नावं बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला, असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. 

विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये गेलो 

आम्ही निवडणूकी पुरती आश्वासन देणार नाही. निवडणुका येतील जातील. मागचा अनुभव पाहाता आम्ही कायम कामावर लक्ष दिलं आहे. केंद्र आणि राज्य एका विचाराचे आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. याचा फायदा करायचा आहे. चांगली कामं करायची आहेत. आम्ही विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये गेलो आहोत. आमचा कुठला स्वार्थ नाहीं. कारण नसताना वेगळ्या चर्चा करतात यामध्ये तथ्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : ‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'
‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल
सरकारी नोकरीचं आमिष, कोर्टात नोकरीला असलेल्या मामानेच भाचाला 19 लाखांना फसवले; गुन्हा दाखल

व्हिडीओ

Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
मोठी बातमी: सोनम वांगचूक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय, मेदांता रुग्णालयात हलवण्याचे आदेश
Maharashtra Weather Update: मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
मुंबईसह पुणे घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट; पुढील पाच दिवस जोरदार पावसाचे इशारे; IMD चा महत्वाचा अंदाज 
CJP Protest in Mumbai : CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
CJP आंदोलनावर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 8 पोलीस ठाण्यांत गुन्हे, 900 हून अधिक आंदोलकांवर FIR दाखल
Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Raj Thackeray on Delhi LathiCharge: दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
दिल्लीत पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं, पंतप्रधान मोदींबाबत महत्त्वाची टिप्पणी
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Embed widget