एक्स्प्लोर

बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर काका-पुतण्याचा वाद रंगणार; जयदत्त क्षीरसागर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा, आ. संदीप क्षीरसागर यांची मागणी

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नवगण शिक्षण संस्था असून याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्‍यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करून मोठा भ्रष्टाचार केल्याने या कर्मचार्‍यांवर अन्याय झालेला आहे.

बीड : बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यावर लाखो रुपयांच्या भृष्टाचाराचे आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. बीडमध्ये पुन्हा एकदा काका पुतण्याचा वाद रंगणार असल्याचे चित्र पाहायला मिळतय

बीडमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी नवगण शिक्षण संस्था असून याच संस्थेच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कर्मचार्‍यांकडून सक्तीने एका महिन्याचा पगार वसूल करून मोठा भ्रष्टाचार केल्याने या कर्मचार्‍यांवर अन्याय झालेला आहे. या प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाला असून याची रितसर चौकशी करण्यात यावी व अन्याय झालेल्या या कर्मचार्‍यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी केली आहे. जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी उच्च व तंत्र शिक्षण सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या संस्थेवर प्रशासक नेमण्यात यावा  तसेच अन्याय झालेल्या कर्मचार्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची आर्थिक व मानसिक नुकसानीपासून सुटका करण्याचे आश्वासन संदीप क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहे  

आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेले आरोप

नवगण शिक्षण संस्थेने प्रशासन चालवण्यासाठी एक असंवैधानिक समिती स्थापन केली असून समितीमध्ये डॉ.एस.एल.गुट्टे, डॉ.एस.एस.जाधव, डॉ.व्ही.टी.देशमाने आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. हे कर्मचारी बीड येथील सौ.के.एस.के.महाविद्यालयात वेगवेगळ्या पदावर कार्यरत असूनही महाविद्यालयात न थांबता दररोज वेगवेगळ्या ठिकाणच्या संस्थेअंतर्गत येणार्‍या महाविद्यालयांना तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना दररोज भेटी देऊन तेथील कर्मचार्‍यांवर दबाव आणून प्रतिवर्षी मार्च एंडींग म्हणून एक पगार सक्तीने, दम देऊन वसूल करतात. या प्रकारामुळे संस्थेतील सर्व कर्मचारी भयभीत झाले असून सदरील समिती प्रत्येक दिवशी एका महाविद्यालयाला भेट देऊन प्रत्येक कर्मचार्‍याला स्वतंत्ररित्या बोलवून पैशाची मागणी करत आहे. 

आपण पैसे न दिल्यास आपली बदली करण्यात येईल, पदोन्नती रोखण्यात येईल, वेतनवाढी रोखण्यात येतील, रजा मंजुर करण्यात येणार नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे कर्मचार्‍यांचे खच्चीकरण होत असून प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहेत. तसेच युजीसीकडून मिळणार्‍या विविध अनुदानात अपहार होत असून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली असून कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन न करण्याचे आवाहन त्यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Maharashtra Nagarparishad Nagradhyaksha Reservation : 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष, संपूर्ण यादी
राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष, संपूर्ण यादी
Manikrao Kokate on Rohit Pawar: मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
Gopichand Padalkar : बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Floods | Dharashiv मधील पूरग्रस्तांना मदत नाही, Dhanyakumar Patil यांची खंत
TV Ads Complaint | आजींची Supriya Sule कडे मालिकांतील जाहिरातींवर तक्रार
Flood Relief | पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, खंडोबा देवस्थानाचा मदतीचा हात
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 06 ऑक्टोबर 2025
TOP 50 Superfast News | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा | 6 OCT 2025 | ABP Majha

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
क्लिनर अपहरण प्रकरणात दिलीप खेडकरचा जामिनासाठी प्रयत्न; मनोरमा खेडकर सहकार्य करेना, सुनावणी कधी?
Maharashtra Nagarparishad Nagradhyaksha Reservation : 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष, संपूर्ण यादी
राज्यातील 247 नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रवर्गाचा नगराध्यक्ष, संपूर्ण यादी
Manikrao Kokate on Rohit Pawar: मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
मला कृषीमंत्रीपद गमवावं लागलं, रोहित पवारांकडे 'तो' व्हिडीओ कुठून आला? न्यायालयात माणिकराव कोकाटेंचा युक्तिवाद; चौकशीची मागणी
Gopichand Padalkar : बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
Nashik Crime News : नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
Bihar Election Dates : बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? 'या' मार्गाचा वापर करा अन् पैसे परत मिळवा
पैसे पाठवताना चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? टेन्शन घेऊ नका या मार्गांचा वापर करा
Bihar Election 2025: मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
Embed widget