एक्स्प्लोर

Chitra Wagh : भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरुनच मेहबूब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला; पीडित तरुणीचा सनसनाटी आरोप

भाजपच्या चित्रा वाघ (chitra wagh) आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehebub Shaikh) यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे.

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehebub Shaikh) यांच्यावर काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने आता नवीन खुलासा केला आहे. भाजपच्या चित्रा वाघ (chitra wagh) आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे. एवढंच नाही तर याप्रकरणी तरुणीने औरंगाबादच्या जिंसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.    

काय म्हटलं आहे 'एफआयआर'मध्ये 

तरुणीने पोलिसांत दिलेल्या फिर्यादनुसार, नदमोद्दीन शेख याने लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर अत्याचार करून माझा व्हिडीओ बनवला. त्यानंतर हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन मी जसे सांगेन तसं केल्यास आपण खूप पैसे कमवू असे सांगितले. त्यानंतर सुरवातीला नाशिक येथे मेहबूब शेख यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करायला सांगितली. मात्र, तेथील पोलिसांना खोटी तक्रार असल्याचा संशय आल्याने त्यांनी हाकलून दिले. त्यानंतर नदमोद्दीन शेख याच्या सांगण्यानुसार औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख विरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचं तरुणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे. 

धस-चित्रा वाघ यांच्यावरही आरोप...

यावेळी तरुणीने एफआयआर'मध्ये चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप केले आहेत. मेहबूब शेख यांना खोट्या गुन्ह्यात फसवण्यासाठी नदमोद्दीन शेख याला सुरेश धस यांनी सांगितले होते,असा आरोप तिने केला आहे. सोबतच गुन्हा दाखल केल्यानंतर चित्रा वाघ यांच्यासोबत माझी भेट घालून देण्यात आली. त्यावेळी चित्रा वाघ यांना मला खोटी तक्रार द्यायला लावली असून मला यात पडायचं नसल्याचं तरुणीने म्हटलं आहे. मात्र आता तक्रार माघे घेतल्यास जेलमध्ये सडशील, त्यामुळे एफआयआरमध्ये जसं आहे तसेच बोलायचं असे चित्रा वाघ यांनी म्हटल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्यानंतर त्यांनी तरुणीचा एक व्हिडीओ बनवून माध्यमांशी कसे बोलायचं हे सांगितले, असे  तक्रारदार तरुणीने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी अत्याचार केल्याचा आरोप औरंगाबाद शहरातील 29 वर्षीय तरुणीने केला आहे. या तरुणीचे बीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या आरोपानुसार, "ती घरगुती शिकवणी घेते. त्या तरुणीला औरंगाबाद शहरातील बायपास परिसरात शिकवणी सुरु करायची असल्याने ती तिथे खोली भाड्याने घेण्यासाठी आली होती. त्याठिकाणी तिची भेट बीड जिल्ह्यातील शिरुर कासारमधील महबूब इब्राहिम शेख यांच्याशी झाली. त्यानंतर शिक्षण किती झाले असं विचारुन तुला मुंबईत नोकरी लावतो असे आमिष मेहबूब शेख यांनी दाखवलं. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत त्या तरुणीला जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. रात्री नऊच्या सुमारास रामगिरी हॉटेलसमोर पोहोचले असता मेहबूब कार घेऊन त्या ठिकाणी उभे होते. तरुणीला मागील सीटवर बसवून गाडी सुरु केली. यानंतर वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुठे वाच्यता केली तर तुला सोडणार नाही असे म्हणून तिला कारमधून उतरवले, असा आरोप पीडित तरुणीने केला आहे. या घटनेनंतर तरुणीच्या मावशीने धीर दिल्यानंतर तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
Latur News : मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
Kalyan Police : कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
Manoj Jarange : जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Powai Filterpada  : वाहून जाताना तरुण थोडक्यात वाचला, पवईतल्या फिल्टरपाड्यातील धक्कादायक घटना
Mumbai Rain Filterpada Powai : हात सुटला, तरुण वाहून गेला! मुंबईतील धडकी भरवणारा व्हिडीओ
Maharashtra Rains | Raigad ला Red Alert, शाळा बंद; Mumbai-Goa Highway ठप्प, 15 जणांना वाचवले
Chiplun Floods | चिपळूणमध्ये Vashishthi, Shiviya नद्यांना पूर, Parshuram Ghat मध्ये भीषणता
Maharashtra Rains | चिपळूणमध्ये पूरस्थिती, नद्या धोका पातळीवर, प्रशासनाचा इशारा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
धक्कादायक! 10 वर्षांच्या मुलाला टायफॉईडची लागण, डॉक्टरांनी मात्र डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचं औषध दिलं
Latur News : मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
मराठा आरक्षणाची ठिणगी पेटणार; लातुरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, सरकारच्या वेळकाढूपणामुळे विष प्राशन केल्याची चिठ्ठी
Kalyan Police : कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
कल्याण पोलिसांचे फिल्मी स्टाईल सर्च ऑपरेशन, 22 दिवस अन् विशाखापट्टनम जंगलापर्यंतचा 1800 किमी प्रवास, गांजा तस्करांचा पर्दाफाश
Manoj Jarange : जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
जरांगे मुंबईकडे तर एकनाथ शिंदे दरे गावाकडे; मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना शिंदेंचा गावाकडे दौरा
Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?  
Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या दर्शनासाठी 1 कोटीहून अधिक लोक येण्याची शक्यता, कशी आहे सुरक्षा व्यवस्था?  
गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट
गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट
जयस्वाल, अय्यरला भारताच्या टीममध्ये संधी न मिळाल्यानं चर्चा, टीममध्ये बदल करण्याची अजून एक संधी, आशिया कपचा नियम काय?
आशिया कपसाठी टीममध्ये 'या' तारखेपर्यंत बदल करता येणार, जाणून घ्या महत्त्वाचा नियम 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 ऑगस्ट 2025 | मंगळवार
Embed widget