![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Aurangabad: भाजप आमदाराच्या संपत्तीच्या चौकशी अर्जाकडे दुर्लक्ष, औरंगाबाद खंडपीठाची थेट ईडीला नोटीस
Aurangabad News: एका याचिकेवर सुनावणी करतांना औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावून संचालक ईडी (ED) यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.
![Aurangabad: भाजप आमदाराच्या संपत्तीच्या चौकशी अर्जाकडे दुर्लक्ष, औरंगाबाद खंडपीठाची थेट ईडीला नोटीस maharashtra News High Court Of Bombay Aurangabad Bench notice to ED BJP MLA wealth inquiry application ignored Aurangabad: भाजप आमदाराच्या संपत्तीच्या चौकशी अर्जाकडे दुर्लक्ष, औरंगाबाद खंडपीठाची थेट ईडीला नोटीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/25/f0013dea673cf1fed827d27d12cb3889166139749658989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Aurangabad News: आतापर्यंत अनेकांना नोटीस देऊन खळबळ उडवून देणाऱ्या ईडीलाच (सक्तवसुली संचालनालय) आता नोटीस मिळाली आहे. एका भाजप आमदाराच्या (BJP MLA) बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्यासाठी करण्यात आलेल्या अर्जाची दखल न घेतल्याने अर्जदाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव (High Court Of Bombay-Aurangabad Bench) घेतली आहे. त्यामुळे औरंगाबाद खंडपीठाने नोटीस बजावून संचालक ईडी (ED) यांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.
काही दिवसांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी ईडीकडे एक अर्ज करत, पुणे येथील एमआयटी ग्रुपचे संचालक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड त्यांचे पुतणे भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यासह कुटुंबातील पाच जणांच्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी केली होती.मात्र त्यांच्या अर्जाचा कोणताही विचार ईडीकडून करण्यात आला नाही. त्यामुळे कराड यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती.
यांच्या चौकशीची मागणी...
सामाजिक कार्यकर्ते विनायक श्रीपती कराड यांनी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, पुतणे आ. रमेश कराड, राजेश काशिराम कराड, काशिराम दादाराव कराड आणि तुळशीराम दादाराव कराड यांच्या बेहिशोबी मालमत्तेसंबंधी सक्तवसुली संचलनालय दिल्ली व मुंबई येथील कार्यालयात अर्ज सादर केला होता. मात्र त्यांच्या अर्जाकडे ईडीकडून दुलर्क्ष करण्यात आले आणि त्याची दाखल घेण्यात अली नसल्याचा आक्षेप श्रीपती कराड यांनी घेतला आहे.
पुढील सुनावणी 20 सप्टेंबरला
याप्रकरणी खंडपीठाचे न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. राजेश पाटील यांनी ईडीला नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहे. पुढील सुनावणी 20 सप्टेंबर 2022 रोजी होणार असून, तोपर्यंत कराड कुटुंबियांच्या बेहिशोबी मालमत्तेसंबंधी म्हणणे सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.
ईडीला नोटीस
श्रीपती कराड यांनी दाखल केलेल्या याचिकेत, याचिकाकर्ता हा शेतकरी असून त्यांनी अनेक तक्रारी कराड कुटुंबीयांच्या विरोधात केल्या आहेत. मात्र केवळ भाजपचे आमदार असल्यामुळे ईडीकडून त्यांची चौकशी केली जात नसल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला आहे. तर याप्रकरणी खंडपीठाने नोटीस बजावून ईडी संचालकयांना आपले म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहे.
महत्वाच्या बातम्या...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)