एक्स्प्लोर

Aurangabad Water Issue :औरंगाबादचा पाणी प्रश्न पेटला, भाजपच्या 'जल आक्रोश मोर्च्या'आधी राष्ट्रवादीचा 'घागर मोर्चा'

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज सकाळी भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत घोषणाबाजी केली.

Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. 23 तारखेला भाजपकडून भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढला जाणार असताना त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून भाजप आमदाराच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून घागर आंदोलन करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

शहरातील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याने सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे आज सकाळी राष्ट्रवादीकडून भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे, घागर घेऊन अनोखं आंदोलन केलं. यावेळी महिलांची मोठ्याप्रमाणत उपस्थिती पाहायला मिळाली. तर भाजपच्या नेत्यांमुळेच गेल्या 20 वर्षांपासून शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला.आतापर्यंत शहरातील पाणी प्रश्नावरून भाजप आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र आता राष्ट्रवादीने सुद्धा यात उडी घेतल्याने आगामी काळात शहरातील पाणी प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न..

शहरातील पाणी प्रश्नावरून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून सोमवारी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस महाविकास आघाडी सरकारवर पाणी प्रश्नावरून हल्ला चढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षाकडून प्रयत्न सुरु आहे. सुरवातीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणी पट्टी 50 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून पाणी प्रश्नावरून भाजप आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीतील पक्षांनी धसका घेतल्याचं बोललं जात आहे.  

निवडणुकीच्या तोंडावर राजकारण... 

आगामी काळात औरंगाबाद महानगरपालिका निवडणूका होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पाणी प्रश्न आघाडीवर असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेले अनेकवर्षे शिवसेनेसोबत महानगरपालिकेत भाजप सत्तेत सोबत असतानाही, पाणी प्रश्न दोन्ही पक्षाला सोडवता आला नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपडकून पाणी प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सर्वच पक्षाकडून राजकारण केल्या जाण्याची शक्यता आहे. 

 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट

व्हिडीओ

Amit Thackeray Majha Katta : दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
तेव्हा म्हणत होता सिंचन घोटाळ्याचे बैलगाडी भरून पुरावे आहेत, आता म्हणता केस कोर्टात आहे, अरे मग द्या ना पुरावे? राज ठाकरेंचा सीएम फडणवीसांना खोचक टोला
Pune Crime : पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
पुण्यात ऐन निवडणुकीत वडगाव शेरीत दोन गटांमध्ये राडा,  सोपाननगरमध्ये दगडफेक, कारवाईची मागणी
Rahul Narvekar BMC Election 2026: राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
राहुल नार्वेकरांनी धमकावल्याचा आरोप, त्याच महिला उमेदवाराच्या ठाकरे बंधूंनी उभी केली ताकद, मुंबईतील वॉर्ड क्रमांक 226 मध्ये नेमकं काय घडलं?
Agnivesh Agarwal: अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांच्या मुलाच्या अमेरिकेत दुर्दैवी अंत; लेकाला अकाली गमावल्यानंतर बापाची काळीज चिरणारी पोस्ट
Thane Election 2026: ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
ठाणे महानगरपालिकेतील सर्वात गरीब उमेदवाराचे उत्पन्न फक्त 20,500 रुपये; 381 कोटींची प्रॉपर्टी असलेला सर्वात श्रीमंत उमेदवार कोण?
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Raj Thackeray on Mumbai: मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीस नागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत: राज ठाकरे
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Embed widget