एक्स्प्लोर

Aurangabad Water Issue :औरंगाबादचा पाणी प्रश्न पेटला, भाजपच्या 'जल आक्रोश मोर्च्या'आधी राष्ट्रवादीचा 'घागर मोर्चा'

राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी आज सकाळी भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयावर मोर्चा काढत घोषणाबाजी केली.

Aurangabad Water Issue: औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न अधिकच गंभीर बनला असून यावरून आता राजकीय वातावरण तापताना पाहायला मिळत आहे. 23 तारखेला भाजपकडून भव्य असा 'जल आक्रोश मोर्चा' काढला जाणार असताना त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून भाजप आमदाराच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास भाजप आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीकडून घागर आंदोलन करण्यात आलं.यावेळी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. 

शहरातील अनेक भागात आठ-आठ दिवस पाणी येत नसल्याने सर्वसामान्य लोकांचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे आज सकाळी राष्ट्रवादीकडून भाजपचे आमदार अतुल सावे यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर रिकामे हंडे, घागर घेऊन अनोखं आंदोलन केलं. यावेळी महिलांची मोठ्याप्रमाणत उपस्थिती पाहायला मिळाली. तर भाजपच्या नेत्यांमुळेच गेल्या 20 वर्षांपासून शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आला.आतापर्यंत शहरातील पाणी प्रश्नावरून भाजप आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळाले होते. मात्र आता राष्ट्रवादीने सुद्धा यात उडी घेतल्याने आगामी काळात शहरातील पाणी प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे. 

भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्याचा प्रयत्न..

शहरातील पाणी प्रश्नावरून फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून सोमवारी भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस महाविकास आघाडी सरकारवर पाणी प्रश्नावरून हल्ला चढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाची हवा काढून घेण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षाकडून प्रयत्न सुरु आहे. सुरवातीला पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणी पट्टी 50 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली. त्यानंतर आता राष्ट्रवादीकडून पाणी प्रश्नावरून भाजप आमदाराच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाचा महाविकास आघाडीतील पक्षांनी धसका घेतल्याचं बोललं जात आहे.  

निवडणुकीच्या तोंडावर राजकारण... 

आगामी काळात औरंगाबाद महानगरपालिका निवडणूका होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पाणी प्रश्न आघाडीवर असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेले अनेकवर्षे शिवसेनेसोबत महानगरपालिकेत भाजप सत्तेत सोबत असतानाही, पाणी प्रश्न दोन्ही पक्षाला सोडवता आला नाही. मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपडकून पाणी प्रश्नावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावरून सर्वच पक्षाकडून राजकारण केल्या जाण्याची शक्यता आहे. 

 

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी

व्हिडीओ

Parali Election Result : परळी नगराध्यक्षपदी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारींचा 15, 662 मतांनी विजय
BJP Win Palika Election : पालिका निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा तुफान जल्लोष Special Report
Nanded Election Result : नांदेडमध्ये भाजपला मोठा धक्का, मतदारांना सगळ्यांनाच घरी बसवलंSpecial Report
Jejuri Fire : जेजुरीत भंडाऱ्याचा भडका होऊन 16 जण भाजले!
Ambernath Palika Election : शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, भाजपच्या तेजश्री करंजुळे नगराध्यक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : 2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा 
2023 मध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होतो,  वनडे वर्ल्ड कप फायनलचा पराभव जिव्हारी लागलेला : रोहित शर्मा
Rohit Patil : सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण..., तासगाव नगरपालिकेतील पराभवानंतर आमदार रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया
सहकाऱ्यांनी जीवापाड मेहनत घेतली पण...पराभवानंतर रोहित पाटील यांनी तासगाव शहरातील जनतेला कोणता शब्द दिला?
Ajit Pawar: महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना अजित पवार म्हणतात...
महापालिकेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत एकत्र निवडवणूक लढवणार का? मतविभागणीचा संदर्भ देत अजित पवार म्हणाले...
Maharashtra Election : सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
सहाजणांचं कुटुंब हरलं, आमदाराच्या घरचे पडले, माळेगावात ईश्वर चिठ्ठीवर तर भद्रावतीत एका मतांनी विजय; नगरपालिका निवडणुकीतील 10 रंजक घडामोडी
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
भाजपचे अमोल मोहिते 42,032 मतांनी विजयी; नगराध्यक्षपदी आमदारकीएवढं मतदान, नवा विक्रम
Narendra Modi : महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे! नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांचं कौतुक
महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे!, महायुतीच्या विजयावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
बार्शीत भाजपचे कमळ खुलले, सोपल गटाला 'दे धक्का'; विधानसभेच्या पराभवानंतर राजेंद्र राऊतांचे कमॅबक
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
मोठी बातमी : राज्यात सर्वाधिक मताने निवडून आलेला नगराध्यक्ष, पठ्ठ्याचं 42 हजारांचं लीड, कोणत्या पक्षाचा उमेदवार?
Embed widget